शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

...अन् धावत्या जोड मालगाडीचे डबे झाले इंजिनपासून वेगळे; अकोला स्थानकावरील घटना

By atul.jaiswal | Updated: March 22, 2023 16:22 IST

अर्धी मालगाडी थांबली बिर्ला गेट परिसरात

अकोला : नागपूर-वर्धाकडून काेळसा भरून भुसावळच्या दिशेने जात असलेल्या जोड मालगाडीचे (लॉंग हॉल) डबे कपलिंग निखळल्याने इंजिनपासून वेगळे झाल्याची घटना अकोला रेल्वेस्थानक ते बिर्ला गेट परिसरादरम्यान बुधवारी (२२ मार्च) सकाळी अप लाइनवर घडली. सुदैवाने हा प्रकार लवकर लक्षात आल्याने संभाव्य दुर्धटना टळली.

मध्य रेल्वेच्या अकोला रेल्वेस्थानकावरील सुत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, नागपूरच्या दिशेने एक १२० डब्ब्यांची जोड मालगाडी कोळसा घेऊन भुसावळकडे निघाली होती. सकाळी ११.२३ वाजता बिर्ला गेट परिसरात या जोड मालगाडीपैकी मागच्या गाडीचे २० व २१ क्रमांकाचे डबे कपलिंग निखळल्याने आपसात धडकले. परिणामी अर्धी गाडी बिर्ला गेट जवळ तर अर्धी मालगाडी अकोला स्थानकापर्यंत येऊन पोहोचली.

हा प्रकार मालगाडीमध्ये असलेल्या गार्डच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने अकोला रेल्वेस्थानकावर संपर्क साधून माहिती दिली. रेल्वेस्थानक प्रबंधक एस. डी. कवडे यांनी तातडीने समन्वय साधत यातायात विभागाच्या कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठविले. रेल्वे कर्मचाऱ्यांनी वेगात हालचाली करत निखळलेल्या कपलिंग जोडल्या. तोपर्यंत पुढे निघून गेलेली अर्धी मालगाडी बिर्ला गेटपर्यंत आली व जोडणी केल्यानंतर दुपारी १२. २० वाजता पूर्ण मालगाडी भुसावळकडे रवाना करण्यात आली.

तासभर वाहतुकीचा खोळंबा

अपलाईनवर घडलेल्या या घटनेमुळे नागपूरहुन-भुसावळकडे जाणारी रेल्वे वाहतुक तासभर विस्कळीत झाली होती. सकाळी ११.२३ ते दुपारी १२.२० या वेळेत नियोजित असलेल्या अपलाईनवरील प्रवासी गाड्या आधीच उशिरा धावत असल्याने फारसा परिणाम झाला नसला, तरी काही मालगाड्या थांबवून ठेवाव्या लागल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेAkolaअकोला