शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

ठावा...मनाचा ठाव घेणारा वऱ्हाडी गीत प्रकार

By admin | Updated: August 6, 2016 13:10 IST

विदर्भात मात्र याच सापावर अर्थात नागावर चक्क स्वतंत्र भजनांचीच परंपरा आहे. ‘ठावा’ नावाने ओळखला जाणारा हा गितप्रकार

राजेश शेगोकार, ऑनलाइन लोकमत
अकोला
नागीण सारख्या चित्रपटांनी साप या प्राण्याविषयी अंधश्रद्धेचे मोठे वारूळ तयार केले आहे त्यामध्ये पुढे अनेक चित्रटपटांनी भर टाकल्यामुळे ‘साप’ अजूनही त्या वारूळातून बाहेर आला नाही. विदर्भात मात्र याच सापावर अर्थात नागावर चक्क स्वतंत्र भजनांचीच परंपरा आहे. ‘ठावा’ नावाने ओळखला जाणारा हा गीतप्रकार विदर्भातील अनेक गावांमध्ये आजही परंपरेने सुरू असून नागाच्या गाण्यावर ठाव्याचा ठेक्यात रात्रभर रंगुन जाणाऱ्या मंडळींसाठी नागपंचमी ही पर्वणीच ठरते. 
‘ठावा’ हा प्रकार विदर्भात आढळतो. नागांचे गाणी या लोकप्रकारात गायिली जातात. या लोकप्रकारात गायिल्या जाणाºया लोकसगीतांना वºहाडी बोलीत ‘बाºया’ असे म्हणतात आणि ती गणाºया भक्तांना ‘अरबडी किंवा अरबडे’ , ‘अरबळे’ म्हणतात. ही नागाची गाणे म्हणणारे किंवा नागदेवतांची पूजा करणारे असतात. या लोककला प्रकारात ‘अरबड्यांची’ संख्या निश्चित ठरलेली नसते. तरी सहा-सात लोकांच्या वरच अरबडे सहभागी होतात. अरबड्यांचे वय आणि सामाजिक स्थरही असा निश्चित नाही. वीस वर्षापासून ते मरणाला टेकलेले अरबडे असतात. ‘बाºया’ म्हणताना यांच्यात एकप्रकारे स्फुरण चढलेले आढळते.
विदर्भात आज या लोककला प्रकाराचा प्रयोग नागपंचमी सणाच्या दिवशी रात्री आठ वाजतपासून सुरू होतो. विदर्भातील प्रत्येक गावात ‘ठावा’ होतो.ज्या गावात नागदेवाचे ‘ठाणे’ आहे. म्हणजेच मंदिर आहे, त्या गावात पाच दिवस ‘ठावा’ बसविला जातो तर काही गावात दर सोमवारी ठावा होतो.
ठाव्याततील वाद्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते दुसरीकडे कुठेच वापरण्यात येत नाही. हे वाद्य घरगुती भांड्याच्या सहाय्याने तयार केलेले असते. पाण्यासाठी वापरात असलेला तांब्याचा मोठा गुंड म्हणजेच हंडा व त्यावर तांब्याची नाहीतर पितळचे ताट पालथे  ठेवल्या जातो. तो एका हाताने चापट मारून वाजविला जातो तर दुसºया हाताने जाड कडे घेमन वाजवून विशिष्ट नाद निर्माण केला जातो. अशी वाजविणाºयंची संख्या किमान दोन तरी असतेच.यासोबतच काही अरबडे पावा, तुणतुणे वापरताना दिसतात. गाणी किंवा बाºया म्हणण्याचे एक विशिष्ट पद्धत आहे. या लोकप्रकारात सहभागी होणाऱ्या लोककलावंताचे आपसूक दोन गट तयार होतात. एक गट नागांची गाणी म्हणतो तर दुसरा गट त्यांनी म्हटलेल्या ओळी पुन्हा म्हणतात. पहिल्या गटाचे गाणे संपल्यावर दुसरा ‘अरबडी’ गाणे म्हणतो. तेव्हा ज्यांना ते गाणे योग्य प्रकारे ते म्हणणाºयांच्या गटात सहभागी होतात. बाकीचे त्यांची जील ओढतात. या गटाबद्दल निश्चित नियम सांगता येत नाही. मात्र, प्रथम गाणाºयांची संख्या एकापासून तीनपर्यंत आढळते तर त्याला साथ देणाºयांची संख्या ही बाकीचे सर्व. ती काही मोजून वगैरे नसते. नागबाऱ्या म्हणण्याची वेळ ही रात्रीची असते. जेवण वगैरे झाल्यानंतर म्हणजे रात्रीचे आठनंतर चालू होतात. संपूर्ण रात्रभर गाणी म्हटल्या जातात.
नागदेवाच्या मंदिरात कळसाची स्थापना करतात. नऊ ग्रहाची किंवा नऊ धान्याची पूजा करतात. वरीलप्रमाणे नागबाºया म्हटल्या जातात. गळा साफ होण्यासाठी अधुनमधून गूळ खातात. शेवटी नागाची आरती म्हणून प्रसाद वाटतात.
-----------
ही लोकगीतेच 
नागबाºयात जी गाणी म्हटल्या जातात ती लोकगीते आहेत. म्हणजे ती समाजाने निर्माण करून एका पिढीपासून दुसºया पिढीपर्यंत चालत येतात.ही लोकगीते दोन प्रकारची आहेत. काही गीतांमध्ये कथा गुंफलेली असल्याने त्या गीतांना कथागीत असे म्हणतात तर काही लोकगीते आहेत.
या कथागीतामध्ये ‘एक राजा असतो. त्याला असाध्य व्याधी असते. तो एक दिवस वारूळात हात घालतो तर सापाच्या पाठीवरचे खांडूक फुटते म्हणून नागदेव प्रसन्न होतो. नागदेवाच्या आशीर्वादाने त्या राजाच्या व्याधी दूर होतो’ अशा कथा गुंफलेल्या असतात.
 
नागबाऱ्यांची सुरुवात नमनाने होते.
 
पहिले नमन हो नमन धरतीला
हो नमन धरतीला
दुसरी नमन हो नमन पांढरीला
हो नमन पांढरीला
पांढरीला म्हटल्यानंतर गणपती, हनुमंत, पाची पांडव, साती आसरा, भैरव, नवकुळी नाग इत्यादींना नमन केले जाते.
 
या गोष्टींचे होते पालन 
नागपंचमीच्या दिवशी माती उकरणे निषिद्ध मानतात. त्या दिवशी कोणताच कास्तकार शेतात औत धरत नाही. कोणी निंदन लावत नाही. फार पूर्वी असा एक कास्तकार नागपंचमीच्या दिवशी शेतात नांगर घेऊन जातो. नांगर चालू असताना तासात वारूळ लागते. त्या नांगराच्या फळाने वारूळ फुटते. त्या वारूळात असलेला साप बैलाला दंश करतो. बैलाला पान लागते. तेव्हापासून नागपंचमीला कोणताच कास्तकार शेतात काम करीत नाही.
-----------
लोककलांचा अभ्यास करतांना  ‘ठावा’ हा प्रकार विशेष भावला. विदर्भात हा प्रकार सर्वश्रृत असून यामधील गाणी ही परंपरेने चालत आलेली आहे. अनेक ठाव्यांमध्ये सहभागी झालो कुठलाही सामाजिक भेदभाव या लोककला प्रकारात आढळला नाही. म्हणजे या प्रकारात गावात स्थानिक असलेल्या अठरापगड जातीपैकी कोणीही सहभागी होऊ शकतो. या याचे वैशीष्ट आहे. सामाजीक भावना वृद्धींगत करीत ही परंपरा अव्याहतपणे सुरू आहे विशेष म्हणजे पुढच्या पिढीतही ती सरकत असून आता काही ठिकाणी हंडा व परातीसोबत ढोलकीचाही वापर होतो एवढाच काय तो बदल
डॉ.रावसाहेब काळे
अभ्यासक, लोककला
अकोला