शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

तेरवीला तिलांजली; स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्रासाठी मदत

By admin | Updated: September 3, 2016 02:12 IST

नवा पायंडा: मळसूरच्या देवकते कुटुंबीयांचा निर्णय.

अतुल जयस्वाल अकोला, दि. २: मनुष्य जन्मभर रुढी, परंपरा आणि कर्मकांडाच्या फेर्‍यात अडकलेला असतो. इहलोकाची यात्रा संपवल्यानंतरही त्याची या फेर्‍यातून मुक्तता होत नाही. देह ठेवल्यानंतरही तेरवी, दसवा यासारख्या पारंपरिक विधीच्या जोखडातून माणसाची मुक्ती नाही. शेकडो वर्षांपासून सुरू असलेल्या या परंपरा अजूनही सुरूच आहेत. पातूर तालुक्यातील मळसूर येथील देवकते कुटुंबीयांनी मात्र तेरवीसारख्या रुढी, परंपरेला तिलांजली दिली आहे. वडिलांची तेरवी न करता त्यासाठी होणारा खर्च स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र उभारण्यासाठी सत्कारणी लावण्याचा निर्णय घेऊन विठ्ठल देवकते यांनी एक नवा पायंडा पाडला आहे.मळसूर हे पातूर तालुक्यातील आडवळणाचे एक गाव. अतिशय दुर्गम भागात असलेले या गावातील लोक जुन्या विचारांचे. या गावात शिकून मोठे झालेले मनपाचे सहायक माहिती अधिकारी विठ्ठलराव देवकते यांचे वडील संपतराव देवकते यांचे ३१ ऑगस्ट रोजी वृद्धापकाळाने वयाच्या ७८ व्या वर्षी निधन झाले. अंत्यविधीनंतर देवकते कुटुंबीय एकत्र बसले. व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर तेरवी, दसवा हे विधी ठरलेलेच. देवकते कुटुंबातील प्रमुख या नात्याने विठ्ठलराव देवकते यांनी वडिलांची तेरवी न करता तो खर्च स्पर्धा परीक्षा केंद्र उभारण्यासाठी सत्कारणी लावण्याचा निर्णय घेतला. त्यांनी हा निर्णय आप्त स्वकीयांना बोलून दाखविला. सर्व कुटुंबीयांनी तो निर्णय मान्य केला. तेरवीसाठी साधारणपणे २५ ते ३0 हजार रुपयांचा खर्च गृहित धरून त्या पैशातून गावातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी सोपीनाथ संस्थानचे अध्यक्ष दिलीप काळे यांनीही मंदिराच्या परिसरात जागा उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त केला. विठ्ठल देवकते हे युवा राष्ट्र या संघटनेशी जुळलेले आहेत. संघटनेचे धनंजय मिश्रा व इतर सदस्यांनी अभ्यास केंद्र उभारण्यासाठी मदत करणार असल्याचे सांगितले.