शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

तेल्हारा तालुका खरेदी विक्री संस्थेवर अवसायक येणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:18 IST

या संस्थेच्या संचालक मंडळाचे अंतर्गत वाद आहेत. कित्येक महिन्यापासून हे वाद सुरू असून शेतमाल खरेदी त्याचे मोजमाप मालाची वाहतूक ...

या संस्थेच्या संचालक मंडळाचे अंतर्गत वाद आहेत. कित्येक महिन्यापासून हे वाद सुरू असून शेतमाल खरेदी त्याचे मोजमाप मालाची वाहतूक त्याचे चुकारे हमालाची मजुरी यासह अनेक कामांमध्ये अडथळे येत असल्याने या सर्वांना त्याचा आर्थिक फटका बसत आहे. तसेच संस्थेचे ऑडिट सुद्धा बाकी असून संस्थेमधील कर्मचारी सुद्धा कामावर येत नाहीत. संस्थेची अनेक महिन्यापासून संचालक मंडळाची सभा झाली नाही. सर्व कारभार ठप्प आहे. त्यामुळे हे संचालक मंडळ बरखास्त करून शासनामार्फत या संस्थेवर प्रशासकीय मंडळ बसविण्याचा घाट काही जणांनी रचला होता. त्याबाबत शासनाकडून हालचाली सुद्धा झाल्या होत्या. मात्र ज्यांनी हे केले त्यांना कदाचित हे माहिती नाही की, संचालक मंडळाच्या बरखास्तच्या आदेशाला विभागीय सह निबंधकांनी स्थगिती दिली आहे. संचालक मंडळ आज कायम आहे. त्यामुळे जोपर्यंत संचालक मंडळ बरखात होत नाही तोपर्यंत प्रशासक मंडळ नियुक्त केल्या जात नाही. त्यामुळे तो निर्णय थंडबस्त्यात पडला आहे. मात्र सहायक निबंधक तेल्हारा यांनी संचालक मंडळ व कर्मचारी कामकाज करीत नसल्याने संस्थेवर अवसायक का नेमण्यात येऊ नये, अशी नोटीस नुकतीच बजावली आहे. याबाबत काय म्हणणे आहे ते सादर करावे. समाधान न झाल्यास अंतिम आदेश काढून संस्थेवर अवसायक नियुक्त केल्या जाईल असा नोटीसमध्ये उल्लेख आहे.