शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

भारत राखीव बटालियनसाठी तेल्हारा-अकोटवासी आक्रमक; पालकमंत्र्यांशी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 12:31 IST

अकोट व तेल्हारा तालुक्यातील बटालियन कॅम्प बचाव कृती समितीसह नागरिकांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देत पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याशी केली.

अकोला : जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात तळेगाव वडनेर व मनात्री येथे मंजूर असलेला भारत राखीव बटालियन क्र .५ अकोला तेल्हारा तालुक्यातच कायम ठेवण्याच्या मागणीसाठी अकोट व तेल्हारा तालुक्यातील बटालियन कॅम्प बचाव कृती समितीसह नागरिकांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देत पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याशी केली.तेल्हारा तालुक्यातील तळेगाव वडनेर व मनात्री येथील २०० एकर जमिनीवर भारत राखीव बटालियन क्र .५ च्या निर्मितीसाठी यापूर्वीच मंजुरी मिळाली असताना, अकोला तालुक्यातील शिसा उदेगाव व हिंगणा शिवार येथे भारत बटालियन क्र .५ ची निर्मिती करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गत ७ आॅगस्ट रोजी मान्यता देण्यात आली. त्यानुसार तेल्हारा तालुक्यात होणारा भारत राखीव बटालियन कॅम्प क्र .५ हलविण्यात आल्याने तालुक्यातील विकास थांबणार असून, सुशिक्षित बेरोजगार तरुणांना उपलब्ध होणारा रोजगार थांबणार आहे. तसेच यापूर्वी मंजुरी मिळालेल्या तेल्हारा तालुक्यातील भारत राखीव बटालियन कम्प दुसरीकडे हलविण्यात आल्याने, अकोट विधानसभा मतदारसंघातील जनतेवर अन्याय झाला आहे. त्यामुळे यापूर्वीच्या मंजुरीनुसार भारत राखीव बटालियन कॅम्प तेल्हारा तालुक्यातच कायम ठेवण्यात यावा, अशी मागणी करीत बटालियन करीत, बटालियन कॅम्प बचाव कृती समितीसह अकोट व तेल्हारा तालुक्यातील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याशी कृती समितीच्या सदस्यांनी संबंधित मुद्यावर चर्चा करून मागणीचे निवेदन सादर केले. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्यासह बटालियन कॅम्प बचाओ कृती समितीचे रमेश ताथोड, देवानंद नागले, गजानन थोरात, किरण अवताडे, अनुप मार्के, विवेक खारोडे, दिलीप बोचे, प्रदीप वानखडे, संजय आठवले, चंदू दुबे, सारंग कराळे, गणेश दुबे, विजय शिंदे, सागर राऊत, विजय माटोडे, डॉ. संजीवनी बिहाडे, अ‍ॅड. महेश गणगणे, अजय गावंडे, गोवर्धन डाबेराव, अनंता मनतकार, रामभाऊ फाटकर, अनंत अहेरकर, चद्रकांत मोरे, राजेश काटे, नरेंद्र गावंडे, रामकृष्ण मनतकार, विनीत हिंगणकर, ज्ञानेश्वर गव्हाळे, प्रा. संजय बोडखे, प्रकाश वाकोडे, संदीप वसतकार यांच्यासह इतर अकोट व तेल्हारा तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.मंगळवारी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; पालकमंत्र्यांचे आश्वासन!भारत राखीव बटालियन तेल्हारा तालुक्यात कायम ठेवण्याच्या मुद्यावर तोडगा काढण्यासाठी मंगळवार, १३ आॅगस्ट रोजी मुंबई येथील मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बटालियन बचाओ कृती समितीच्या शिष्टमंडळाची बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्र्यांसमोर भावना मांडून मागणीवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी बटालियन कॅम्प बचाओ कृती समितीला दिले. या विषयाचे राजकारण करायचे नसून, अकोट व तेल्हारा तालुक्यातील रस्ते कामांसाठी अधिक निधी देण्याची मागणीही मुख्यमंत्र्यांकडे बैठकीत करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

अकोट-तेल्हारा बंदचे आवाहन स्थगित!भारत राखीव बटालियन कॅम्प तेल्हारा तालुक्यात कायम ठेवण्याच्या मागणीसाठी बटालियन कॅम्प बचाओ कृती समितीच्यावतीने मंगळवार, १३ आॅगस्ट रोजी अकोट-तेल्हारा बंदचे आवाहन करण्यात आले होते; मात्र या मुद्यावर १३ आॅगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले. त्यामुळे अकोट-तेल्हारा बंदचे आवाहन स्थगित करण्यात आल्याचे कृती समितीच्यावतीने यावेळी जाहीर करण्यात आले.

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Ranjit patilडॉ. रणजित पाटील