शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

अस्तित्वावरच घाला घालणा-या 'टीईटी' रद्द करण्याची शिक्षकांची मागणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 13:36 IST

अकोला: शिक्षकांच्या अस्तित्वावर घाला घालणारा २४ आॅगस्ट २0१८ चा शासननिर्णय रद्द करण्यात यावा व २ फेब्रुवारी २0१३ नंतर रुजू झालेल्या शिक्षकांना सेवासंरक्षण देण्यात यावे अशी मागणी शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी शिक्षण उपसंचालक अंबादास पेंदोर साहेब यांच्या मार्फत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे शुक्रवारी केली.

अकोला: शिक्षकांच्या अस्तित्वावर घाला घालणारा २४ आॅगस्ट २0१८ चा शासननिर्णय रद्द करण्यात यावा व २ फेब्रुवारी २0१३ नंतर रुजू झालेल्या शिक्षकांना सेवासंरक्षण देण्यात यावे अशी मागणी शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी शिक्षण उपसंचालक अंबादास पेंदोर साहेब यांच्या मार्फत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे शुक्रवारी केली.शासनाच्या २८ आॅगष्ट २0१८ च्या शासन निर्णयानुसार १३ फेब्रुवारी २0१३ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांनी टीईटी उत्तीर्ण केली नसेल तर त्यांची सेवा समाप्त करण्यात येईल असे शासननिर्णयात नमुद होते. परंतू या शासन निर्णयाला आव्हान देत काही शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठामध्ये रिट पिटिशन १९१३ याचिका दाखल केली असता, शिक्षकांच्या नियुक्त्या शिक्षण विभागानेच केल्यामुळे व त्यास मान्यताही दिल्यामुळे अशा नियुक्त्या शासनाला रद्दबातल ठरविता येणार नाही. नागपूर खंडपिठाने दिलेल्या या निर्णयाचे पालन करुन अशा शिक्षकांच्या सेवा समाप्त करण्यात येणार नाहित असे म्हटले असले तरी शासनाने याबाबत अद्यापपर्यंत कोणताच निर्णय घेतला नाही. शिक्षकांच्या नियुक्त्या या शिक्षण विभागाची रितसर परवानगी मिळाल्यानंतरच व मान्यता मिळाल्या नंतरच झालेल्या आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्या सेवा समाप्त करणे कितपत योग्य आहे? असा सवाल शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी उपस्थित करून शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला. त्यावेळी शिक्षक महासंघाचे अमरावती जिल्हाध्यक्ष मनोज कडू, मोहन ढोके, प्रा.सुधाकर गावंडे, पी.आर.ठाकरे, नितीन टाले, राहुल मोहोड, सूर्यकांत बाजड, अजयसिंह बिसेन, अतुल ठाकरे, रविंद्र मोहोड, किशोर नवले आदी शिक्षक बांधव उपस्थि होते.(प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाTeacherशिक्षकEducation Sectorशिक्षण क्षेत्र