शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

Teachers Day special : आई-वडिलांची प्रेरणा अन् शिक्षकांमुळे घडले आयुष्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 12:07 IST

- संतोष येलकर  लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : ‘भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) मी अधिकारी व्हावे, ही आई-वडिलांची इच्छा आणि ...

- संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ‘भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) मी अधिकारी व्हावे, ही आई-वडिलांची इच्छा आणि शिक्षकांकडून मिळालेल्या मार्गदर्शनात आयुष्य घडले. त्यामुळे आज मी जे काही आहे, ते आई-वडील आणि शिक्षकांमुळे आहे’.

सर्वसामान्य कुटुंबाची पृष्ठभूमी!आई गृहीणी, वडील सरकारी नौकरी अशा सर्व साधारणा मध्यमवर्गीय कौटुंबिक पृष्ठभूमीत माझे बालपण गेले. लहानपणापासूनच आई-वडिलांनी शिक्षणावर भर दिला. शिक्षणच आयुष्याला कलाटणी देवू शकते, हा संस्कार दिला. यामुळे साहजिकच शिक्षणाची गोडी वाढली व चांगल्या शिक्षकांमुळे ही गोडी वृद्धींगत झाली.लखनऊमध्ये झाले शिक्षण!लखनऊमधील पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता पहिली ते बारावीपर्यंचे शिक्षण घेतले. शाळेत हुशार असल्याचे पाहून शिक्षक मृदुल अवस्थी व शलब सक्सेना यांनी केलेल्या मार्गदर्शनात उत्तर प्रदेशातील कानपूर येथे ‘आयआयटी’चे शिक्षण पूर्ण केले.आयआयटी उत्तीर्ण झाल्यानंतर भारतीय प्रशासकीय सेवेत (आएएएस) अधिकारी होण्याची इच्छा आई विद्या कटियार व वडील अमरनाथ कटियार यांनी व्यक्त केली होती. आई-वडिलांच्या इच्छेनुसार तयारी सुरू केली आणि परीक्षा उत्तीर्ण करून २०१६ मध्ये ‘आयएएस’ अधिकारी झालो.त्यामुळे ‘आयुष्यातील आतापर्यंतच्या प्रवासात मी जे काही आहे. जे काही ते आई-वडिलांची इच्छा, त्यांचे भरीव योगदान आणि शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळेच आहे’

शिक्षक कधीच रागावले नाही!शाळेत मी नेहमी अभ्यास करीत होतो. त्यामुळे शिक्षक माझ्यावर कधीच रागावले नाही; परंतु वर्गातील माझे मित्र अभ्यास न करता मस्करी, मस्ती करीत होते. त्यामुळे शिक्षक त्यांच्यावर रागावत होते. त्यामुळे सहाजिकच माझ्यावर जबाबदारी वाढली होती.

सहावीत सातव्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो अन्...!इयत्ता पहिलीपासून शाळेत मी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालो; परंतु इयत्ता सहावीमध्ये सातव्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो, त्यावेळी खूप वाईट वाटले होते. तेव्हापासून पहिल्या क्रमांकानेच उत्तीर्ण होण्याचे ठरविले. त्यानुसार सातवीनंतर पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो तो आनंद आजही विसरू शकत नाही. यावेळी मला ध्येय गाठण्यासाठी परिश्रम करावे लागतात, ही मिळालेली शिकवण आयुष्यभर मोलाची ठरली.आयएएस व्हायचे होते, त्यामुळे तेच ध्येय ठेऊन अभ्यास केला. कुठल्याही दुसऱ्या नोकरीचा विचारही केला नाही. ध्येय समोर ठेवले अन् परिश्रम केले तर यश निश्चितच मिळते.- सौरभ कटियार, सीइओ

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषदTeachers Dayशिक्षक दिन