शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

साचलेल्या मातीवर डांबरीकरण; शिवसेनेने काम थांबविले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:17 IST

महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी मनपा क्षेत्राची हद्दवाढ करण्याचा प्रस्ताव २०१६ मध्ये राज्य शासनाकडे सादर केला हाेता. सप्टेंबर ...

महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी मनपा क्षेत्राची हद्दवाढ करण्याचा प्रस्ताव २०१६ मध्ये राज्य शासनाकडे सादर केला हाेता. सप्टेंबर २०१६ मध्ये शासनाने हद्दवाढीला मंजुरी दिली. त्यामध्ये भाैरद ग्रामपंचायतमधील लक्ष्मीनगर, गजानननगर, लुंबिनीनगर, डाबकी आदी भाग मनपा क्षेत्रात समाविष्ट झाला. दरम्यान, हद्दवाढ केल्यानंतर संबंधित भागातील विकासकामांसाठी शासनाकडून निधी दिला जाताे. शासनाने यासाठी ९६ काेटी २० लाख रुपये निधी मंजूर केला. या निधीतून भाजपच्या लाेकप्रतिनीधींनी विकासकामे सुचविली. यामध्ये प्रामुख्याने रस्ते, नाल्या, सभागृह, उद्यानांचे साैंदर्यीकरण आदी कामांचा समावेश आहे. हद्दवाढ क्षेत्रातील विकासकामे सुरुवातीपासूनच निकृष्ट व दर्जाहीन बांधकामामुळे वादाच्या भाेवऱ्यात सापडली आहेत. प्रभाग क्रमांक ८ मध्ये कॅनाॅल ते राधिका ऑइल मिलपर्यंत मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम नुकतेच सुरू करण्यात आले. परंतु रस्त्यावरची माती न उचलताच त्यावर डांबराचा थर अंथरला जात असल्याचा प्रकार शिवसेनेने उघडकीस आणत सदर काम बंद केले आहे.

दर्जेदार रस्त्यासाठी सेना आग्रही

मातीवर टाकलेला डांबरी थर काढून घ्यावा,अन्यथा काम सुरू हाेऊ देणार नसल्याची भूमिका सेनेचे शहरप्रमुख राजेश मिश्रा, शहरप्रमुख अतुल पवनिकर यांनी घेतली आहे. सेनेच्या इशाऱ्यानंतर गाेल्डी नामक कंत्राटदार दर्जेदार काम करताे की नाही, याकडे लक्ष लागले आहे.

अभियंता म्हणाले, कंत्राटदाराने चूक केली!

प्रभाग क्रमांक ८ मधील रस्ता रुंदीकरणाच्या कामावर मनपाने नियुक्त केलेल्या अभियंत्याने कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे काम केल्याचे शिवसैनिकांसमाेर स्पष्ट केले. हा थर काढून घेत नव्याने काम करण्याचे निर्देश दिले जातील, असे त्यांनी नमूद केले.