शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

खरिपात १३९८ कोटी पीक कर्ज वाटपाचे ‘टार्गेट’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 13:43 IST

अकोला: यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १ हजार ३९८ कोटी ७८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट (टार्गेट) ठरविण्यात आले आहे.

- संतोष येलकर

अकोला: यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १ हजार ३९८ कोटी ७८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट (टार्गेट) ठरविण्यात आले आहे. पीक कर्ज वाटपाचा आराखडा तयार करण्यात आला असून, ८ मे रोजी जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीत या आराखड्यास मंजुरी देण्यात येणार आहे.सन २०१९-२० या वर्षातील खरीप व रब्बी हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाचा आराखडा जिल्हा अग्रणी बँकेमार्फत तयार करण्यात आला आहे. त्यानुसार येत्या खरीप आणि रब्बी हंगामात जिल्ह्यात १ हजार ४७२ कोटी ४० लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. त्यामध्ये २०१९-२० या वर्षातील खरीप हंगामात जिल्ह्यात १ लाख ७४ हजार ८४७ शेतकºयांना १ हजार ३९८ कोटी ७८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट (टार्गेट) निश्चित करण्यात आले आहे. यासंदर्भात तयार करण्यात आलेल्या आराखड्यास ८ मे रोजी जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली होणाºया जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात येणार आहे.बँकनिहाय खरीप पीक कर्ज वाटपाचे असे उद्दिष्ट!बँक                                                         शेतकरी                 रक्कम (कोटीमध्ये)राष्ट्रीयीकृत बँका                                     ६५०९९                   ५२०.७०जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक                 ८४९०६                   ६७९.२५ग्रामीण बँक                                             १७४५६                     १३९.६५खासगी बँका                                             ७३८६                    ५९.०९.................................................................................................एकूण                                                      १७४८४७                 १३९८.७८कर्ज वाटपाच्या उद्दिष्टात ६३.९५ कोटींची वाढ!गतवर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकºयांना १ हजार ३३४ कोटी ८३ लाख रुपये पीक कर्जाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. यावर्षीच्या खरीप हंगामात १ हजार ३९८ कोटी ७८ लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी खरीप पीक कर्ज वाटपाच्या उद्दिष्टात ६३ कोटी ९५ लाख रुपयांची वाढ करण्यात आल्याचे चित्र आहे.गतवर्षीच्या हंगामातील असे आहे पीक कर्जाचे वाटप!गतवर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकºयांना १ हजार ३३४ कोटी ८३ लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. त्यापैकी केवळ ४१९ कोटी ४७ लाख रुपयांचे पीक कर्जाचे वाटप करण्यात आले होते. त्यामुळे गतवर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकºयांना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट अपूर्ण होते.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrop Loanपीक कर्जbankबँकFarmerशेतकरी