शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

वादळी वाऱ्यात तूर उत्पादक शेतकऱ्यांची तारांबळ!

By admin | Updated: May 26, 2017 02:52 IST

खरेदी केंद्रांवर तुरीचे नुकसान टाळण्यासाठी धावपळ

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : वादळी वारे आणि अवकाळी पावसाच्या भीतीने जिल्ह्यातील ‘नाफेड’ खरेदी केंद्रांवर तुरीचे नुकसान टाळण्यासाठी गुरुवारी रात्री तूर उत्पादक शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. ट्रॅक्टरमधील तूर ताडपत्रीने झाकण्यासाठी शेतकऱ्यांना धावपळ करावी लागली. शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत हमीदराने ‘नाफेड’द्वारे जिल्ह्यातील पाच खरेदी केंद्रांवर तूर खरेदी करण्यात येत आहे. पावसाळा तोंडावर आला; मात्र तुरीचे मोजमाप संथ गतीने सुरू असल्याने, खरेदी केंद्रांवर ट्रॅक्टरमधील तुरीचे मोजमाप केव्हा होणार, याबाबत शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती या खरेदी केंद्रावर २५ मेपर्यंत ४९६ ट्रॅक्टरमधील तुरीचे मोजमाप होणे बाकी आहे. अशीच परिस्थिती जिल्ह्यातील उर्वरित चार खरेदी केंद्रांवर आहे. गुरुवारी रात्री ८ ते ८.३० वाजताच्या सुमारास वादळी वारे आणि अवकाळी पावसाचे वातावरण निर्माण झाले. वादळी वारे सुरू झाल्याने आणि अवकाळी पावसात तूर भिजण्याच्या भीतीने तुरीचे नुकसान होऊ नये म्हणून खरेदी केंद्रांवरील मोजमापाच्या प्रतीक्षेत ट्रॅक्टरमधील तूर ताडपत्रीने झाकण्यासाठी तूर उत्पादक शेतकऱ्यांना धावपळ करावी लागली. त्यामुळे खरेदी केंद्रांवर तुरीचे नुकसान टाळण्यासाठी वादळी वाऱ्यामध्ये शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.अवकाळी पावसाची शक्यता; तूर भिजण्याचे शेतकऱ्यांपुढे संकट!गुरुवारी दुपारपासून शुक्रवारी दुपारपर्यंत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाच्या नागपूर येथील वेध शाळेमार्फत गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला. या पृष्ठभूमीवर वादळी वारे आणि अवकाळी पावसात जिल्ह्यातील ‘नाफेड’च्या खरेदी केंद्रांवरील मोजमापाच्या प्रतीक्षेत असलेली तूर भिजण्याची शक्यता असल्याचे संकट तूर उत्पादक शेतकऱ्यांपुढे निर्माण झाले आहे.वादळी वारे आणि अवकाळी पावसात भिजल्याने तुरीचे नुकसान होऊ नये, यासाठी अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोजमापाच्या प्रतीक्षेत असलेल्या तूर उत्पादक शेतकऱ्यांना ताडपत्री उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.- शिरीष धोत्रे, सभापती, अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती.