शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

वादळी वाऱ्यात तूर उत्पादक शेतकऱ्यांची तारांबळ!

By admin | Updated: May 26, 2017 02:52 IST

खरेदी केंद्रांवर तुरीचे नुकसान टाळण्यासाठी धावपळ

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : वादळी वारे आणि अवकाळी पावसाच्या भीतीने जिल्ह्यातील ‘नाफेड’ खरेदी केंद्रांवर तुरीचे नुकसान टाळण्यासाठी गुरुवारी रात्री तूर उत्पादक शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. ट्रॅक्टरमधील तूर ताडपत्रीने झाकण्यासाठी शेतकऱ्यांना धावपळ करावी लागली. शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत हमीदराने ‘नाफेड’द्वारे जिल्ह्यातील पाच खरेदी केंद्रांवर तूर खरेदी करण्यात येत आहे. पावसाळा तोंडावर आला; मात्र तुरीचे मोजमाप संथ गतीने सुरू असल्याने, खरेदी केंद्रांवर ट्रॅक्टरमधील तुरीचे मोजमाप केव्हा होणार, याबाबत शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती या खरेदी केंद्रावर २५ मेपर्यंत ४९६ ट्रॅक्टरमधील तुरीचे मोजमाप होणे बाकी आहे. अशीच परिस्थिती जिल्ह्यातील उर्वरित चार खरेदी केंद्रांवर आहे. गुरुवारी रात्री ८ ते ८.३० वाजताच्या सुमारास वादळी वारे आणि अवकाळी पावसाचे वातावरण निर्माण झाले. वादळी वारे सुरू झाल्याने आणि अवकाळी पावसात तूर भिजण्याच्या भीतीने तुरीचे नुकसान होऊ नये म्हणून खरेदी केंद्रांवरील मोजमापाच्या प्रतीक्षेत ट्रॅक्टरमधील तूर ताडपत्रीने झाकण्यासाठी तूर उत्पादक शेतकऱ्यांना धावपळ करावी लागली. त्यामुळे खरेदी केंद्रांवर तुरीचे नुकसान टाळण्यासाठी वादळी वाऱ्यामध्ये शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.अवकाळी पावसाची शक्यता; तूर भिजण्याचे शेतकऱ्यांपुढे संकट!गुरुवारी दुपारपासून शुक्रवारी दुपारपर्यंत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाच्या नागपूर येथील वेध शाळेमार्फत गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला. या पृष्ठभूमीवर वादळी वारे आणि अवकाळी पावसात जिल्ह्यातील ‘नाफेड’च्या खरेदी केंद्रांवरील मोजमापाच्या प्रतीक्षेत असलेली तूर भिजण्याची शक्यता असल्याचे संकट तूर उत्पादक शेतकऱ्यांपुढे निर्माण झाले आहे.वादळी वारे आणि अवकाळी पावसात भिजल्याने तुरीचे नुकसान होऊ नये, यासाठी अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोजमापाच्या प्रतीक्षेत असलेल्या तूर उत्पादक शेतकऱ्यांना ताडपत्री उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.- शिरीष धोत्रे, सभापती, अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती.