शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अकोल्यातील चिमुकल्या तनवीरला हवी किडनी, आई तयार मात्र; शस्त्रक्रीयेसाठी पैशांची अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 12:14 IST

अकोला: येथील वाशिम बायपास परिसरातील रहिवासी असलेल्या ११ वर्षीय मोहम्मद तनवीर या मुलाच्या दोन्ही किडनी निकामी झाल्या असून त्याला कीडनी देण्यासाठी त्याची आई तयार झाली. परंतु, प्रत्यारोपन शस्त्रक्रीया व ‘डायलेसीस’साठी लागणारा ८ ते ९ लाख रुपयांचा खर्च त्यांच्या ऐपतीपलीकडचा असल्याने या मुलाच्या भवितव्यासाठी दानदात्यांनी समोर येण्याची गरज आहे.

ठळक मुद्देदोन्ही कीडनी निकामी झाल्याचे कळल्यावर त्याच्या कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले. प्रत्यारोपणासाठी ६ लाख रुपयांचा खर्च असून डायलीसीससाठी आणखी दोन ते तीन लाख रुपयांचा खर्च येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगीतले. प्रत्यारोपनाच्या खर्चासाठी समाजातील सहृदयी दानदात्यांनी पुढाकार घेतल्यास तनवीरला तातडीने उपचार मिळतील.

- सचिन राऊतअकोला: येथील वाशिम बायपास परिसरातील रहिवासी असलेल्या ११ वर्षीय मोहम्मद तनवीर या मुलाच्या दोन्ही किडनी निकामी झाल्या असून त्याला कीडनी देण्यासाठी त्याची आई तयार झाली. परंतु, प्रत्यारोपन शस्त्रक्रीया व ‘डायलेसीस’साठी लागणारा ८ ते ९ लाख रुपयांचा खर्च त्यांच्या ऐपतीपलीकडचा असल्याने या मुलाच्या भवितव्यासाठी दानदात्यांनी समोर येण्याची गरज आहे.मो. तनवीर याचे वडील मोलमजुरीचे काम करतात. त्यांचा मुलगा तनवीरच्या दोन्ही कीडनी निकामी झाल्याचे कळल्यावर त्याच्या कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले. मात्र तनवीरच्या कुटुंबीयांनी धीर न सोडता, त्याच्यावर उपचार सुरु केले. हातमजुरी करून तनवीरचे ‘डायलीसीस’ करण्यात येत आहेत. आतापर्यंत गोळा केलेली पै-अन-पै त्यांनी तनवीरच्या उपचारासाठी व डायलीसीससाठी खर्च केले. मात्र त्याचे वय केवळ ११ वर्ष असल्याने हे डायलीसीस त्याच्या जिवाला धोकादायक आहे. त्यामुळे तनवीरला किडनी देण्यासाठी त्याची आई तयार झाली. चाचण्या सुरु केल्यानंतर किडनी प्रत्यारोपण होणार असल्याचे डॉक्टरांनी सांगीतले, मात्र किडनी प्रत्यारोपन शस्त्रक्रीयेचा खर्च सांगताच तनवीरच्या कुटुंबीयांवर पुन्हा एकदा संकट कोसळले. प्रत्यारोपणासाठी ६ लाख रुपयांचा खर्च असून डायलीसीससाठी आणखी दोन ते तीन लाख रुपयांचा खर्च येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगीतले. तनवीरला सोमवारी मुंबईतील जसलोक व जेजे हॉस्पीटलमध्ये नेण्यात आले आहे. त्याच्या प्रत्येक डायलीसीससाठी तीन हजार रुपयांचा खर्च येत आहे. जिवाला धोका असतांनाही त्याचे कुटुंबीय डायलीसीस करीत आहे. मात्र प्रत्यारोपनाच्या खर्चासाठी समाजातील सहृदयी दानदात्यांनी पुढाकार घेतल्यास तनवीरला तातडीने उपचार मिळतील, आणि त्याच्या आईच्या किडनी प्रत्योरापनानंतर त्याला नवजीवन मिळणार असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले, मात्र गरज आहे ती आता त्याला समाजाच्या आर्थिक मदतीची.दानदात्यांनी पुढाकार घेण्याची गरज मुंबईतील सामाजिक संस्था व शासनाकडून किडनी प्रत्यारोपनासह डायलीसीससाठी तनवीरला मदत मिळणार आहे. मात्र या दोन्ही ठिकाणच्या प्रक्रीया प्रचंड वेळ लागणाऱ्या आहेत. आणि तनवीरची किडनी प्रत्यारोपन शस्त्रक्रीया तातडीने करणे गरजेचे असल्याने या सामाजिक संस्था व शासनाची मदत त्याला वेळेत मिळणार नसल्याचे दिसून येत आहे. त्यामूळेच समाजातील दानदात्यांनी तनवीरला आर्थिक मदत देण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. तनवीरचे कुटुंबीय वाशिम बायपास परिसरातील इन्स्पेक्टर कॉलनीत रहिवासी आहे.

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्य