शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
5
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
6
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
7
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
8
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
9
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
10
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
11
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
12
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
13
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
14
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
15
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
16
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
17
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
18
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
19
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
20
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले

वऱ्हाडात टॅँकरची मागणी वाढली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 12:34 PM

अकोला: पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) पाच जिल्ह्यातील धरणात केवळ १८ टक्के जलसाठा शिल्लक असून, टंचाईने उग्ररू प धारण केले आहे.

अकोला: पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) पाच जिल्ह्यातील धरणात केवळ १८ टक्के जलसाठा शिल्लक असून, टंचाईने उग्ररू प धारण केले आहे. एकट्या बुलडाणा जिल्ह्यात १०० हून अधिक टॅँकर सुरू करण्यात आली असून, अकोला जिल्ह्यात ९ ट्रक पाण्यासाठी अधिग्रहित करण्यात आली आहेत.वºहाडातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यात लघू, मध्यम व मोठे मिळून ५०२ सिंचन प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये आजमितीस केवळ १८ टक्केच साठा उपलब्ध आहे. बुलडाणा जिल्ह्यातील स्थिती भीषण आहे. या जिल्ह्यातील एक मोठा व तीन मध्यम प्रकल्पातील साठा संपला असून, पेणटाकळीत ०.७३ तर तोरणा प्रकल्पात १.२७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अकोला जिल्ह्यातील घुंगशी धरणाचा साठा शून्य असून, निर्गुणा प्रकल्पात केवळ ३.०५ टक्के साठा उपलब्ध आहे. वाशिम जिल्ह्यातील सोनल प्रकल्पाचा साठा ०.८९ टक्केच आहे. बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा या मोठ्या धरणातही केवळ ९.९७ टक्केच साठा असून, ज्ञानगंगा मध्यम प्रकल्पात १०.३७, पलढग १३.५८,मन १८.११, तर उतावळी प्रकल्पात २४.०५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा मोठ्या धरणात २०.४७,वान ४०.७७, मोर्णा १५.८५, उमा प्रकल्पात ६.३४ टक्के जलसाठा आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाण प्रकल्पात १७.३२, एकबुर्जीमध्ये २१.७५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणात केवळ २० टक्के साठा असून, यवतमाळच्या पूस प्रकल्पात ३३.३२, अरुणावती १९.९३, बेबळामध्ये २३.८५ टक्के जलसाठा शिल्लक आहे.पाच जिल्ह्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील स्थिती विदारक आहे. मागच्या वर्षीचा पाऊस कमी झाल्याने या जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये अल्प जलसाठा संचयित झाला होता. इतर चारही जिल्ह्याची स्थिती नाजूक आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाwater scarcityपाणी टंचाई