शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

ताकवाले समितीने केली होती जिल्हानिहाय विद्यापीठाची शिफारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 10:45 IST

प्रा. राम ताकवाले यांच्या समितीने जिल्हास्तरावर विद्यापीठ स्थापन करण्याची शिफारस केली होती; मात्र समितीच्या या शिफारसीकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्यातील विद्यापीठांवरील कामाचा भार कमी करण्यासाठी सन २०१३ मध्ये आघाडी सरकारने स्थापन केलेल्या प्रा. राम ताकवाले यांच्या समितीने जिल्हास्तरावर विद्यापीठ स्थापन करण्याची शिफारस केली होती; मात्र समितीच्या या शिफारसीकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे.विद्यापीठांमधील कामाचा ताण वाढत असल्याने तसेच कार्यक्षेत्र मोठे असल्याने महाविद्यालयांच्या शैक्षणिक कार्यांवर नियंत्रण ठेवणे विद्यापीठांना अशक्य आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी सन २०१३ मध्ये आघाडी सरकारने प्रा. राम ताकवाले यांची समिती स्थापन केली होती. या समितीने जिल्हास्तरावर विद्यापीठ स्थापन करण्याची शिफारस केली होती. सद्यस्थितीत अनेक विद्यापीठांचे कार्यक्षेत्र चार ते पाच जिल्ह्यांमध्ये आहे. तसेच ४०० ते ५०० महाविद्यालये असल्याने विद्यापीठांचा एकही अधिकारी प्रत्यक्ष महाविद्यालयांना भेट देऊ शकत नाही. त्यामुळे महाविद्यालयांच्या अकॅडमिक कामांवर विद्यापीठ नियंत्रण ठेवू शकत नाही. यावर तोडगा काढण्यासाठी प्रा. राम ताकवाले यांच्या समितीने जिल्हास्तरावर विद्यापीठ स्थापन करण्याची शिफारस केली होती. ही शिफारसही दुर्लक्षित राहिली आहे.

अकोल्यातून उभा राहिला होता लढा1 अमरावती विद्यापीठाचे विभाजन करून स्वतंत्र विद्यापीठ निर्मितीसाठी अकोल्यातून २००७ मध्ये मोठा लढा उभा राहिला होता. प्रा. धैर्यवर्धन पुंडकर, प्रा. सुभाष भडांगे, प्रा. मांडवगणे, प्रमोद बोर्डे, प्रा.अंबादास कुलट, प्रा. विजय नानोटी, सदाशिवराव शेळके आदी मंडळी यामध्ये अग्रेसर होती.2 विद्यार्थ्यांसह अनेक राजकीय नेत्यांनीही स्वतंत्र विद्यापीठाच्या मागणीला पाठिंबा दिला होता. तब्ब्ल तीन वर्ष ही मागणी लावून धरल्यावर तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी ११ फेब्रुवारी २००९ रोजी स्वतंत्र विद्यापिठाची मागणी मंजूरही केली होती; मात्र पुढे या मागणीचा विसर शासनाला पडला अन् विद्यापीठाची मागणी दुर्लक्षित राहिली.

ताकवाले समितीने बोलविलेल्या सभेत मी उपस्थित होतो. या समितीच्या शिफारसी उपयुक्त आहेत. सध्या अमरावती विद्यापीठाची स्थिती पाहता आणखी एक विद्यापीठ स्थापन करण्याची गरज आहे.-प्राचार्य डॉ.आर.डी. सिकची

लहान विद्यापीठे ही गुणवत्तावृद्धीसाठी अतिशय उपयुक्त ठरतात, हे सिद्ध झाले आहे. यशपाल कमिटीनेही याबाबत स्पष्ट शिफारस केली होती. त्यामुळे पश्चिम वºहाडासाठी स्वतंत्र विद्यापीठ असणे उपयुक्तच ठरेल-प्राचार्य डॉ.जे.एम. साबू  

टॅग्स :Akolaअकोलाuniversityविद्यापीठEducation Sectorशिक्षण क्षेत्र