शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
4
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
5
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
6
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
7
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
8
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
9
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
10
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
11
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
12
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
13
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
14
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
15
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
16
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
17
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
18
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
19
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
20
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य

ताकवाले समितीने केली होती जिल्हानिहाय विद्यापीठाची शिफारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 10:45 IST

प्रा. राम ताकवाले यांच्या समितीने जिल्हास्तरावर विद्यापीठ स्थापन करण्याची शिफारस केली होती; मात्र समितीच्या या शिफारसीकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्यातील विद्यापीठांवरील कामाचा भार कमी करण्यासाठी सन २०१३ मध्ये आघाडी सरकारने स्थापन केलेल्या प्रा. राम ताकवाले यांच्या समितीने जिल्हास्तरावर विद्यापीठ स्थापन करण्याची शिफारस केली होती; मात्र समितीच्या या शिफारसीकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे.विद्यापीठांमधील कामाचा ताण वाढत असल्याने तसेच कार्यक्षेत्र मोठे असल्याने महाविद्यालयांच्या शैक्षणिक कार्यांवर नियंत्रण ठेवणे विद्यापीठांना अशक्य आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी सन २०१३ मध्ये आघाडी सरकारने प्रा. राम ताकवाले यांची समिती स्थापन केली होती. या समितीने जिल्हास्तरावर विद्यापीठ स्थापन करण्याची शिफारस केली होती. सद्यस्थितीत अनेक विद्यापीठांचे कार्यक्षेत्र चार ते पाच जिल्ह्यांमध्ये आहे. तसेच ४०० ते ५०० महाविद्यालये असल्याने विद्यापीठांचा एकही अधिकारी प्रत्यक्ष महाविद्यालयांना भेट देऊ शकत नाही. त्यामुळे महाविद्यालयांच्या अकॅडमिक कामांवर विद्यापीठ नियंत्रण ठेवू शकत नाही. यावर तोडगा काढण्यासाठी प्रा. राम ताकवाले यांच्या समितीने जिल्हास्तरावर विद्यापीठ स्थापन करण्याची शिफारस केली होती. ही शिफारसही दुर्लक्षित राहिली आहे.

अकोल्यातून उभा राहिला होता लढा1 अमरावती विद्यापीठाचे विभाजन करून स्वतंत्र विद्यापीठ निर्मितीसाठी अकोल्यातून २००७ मध्ये मोठा लढा उभा राहिला होता. प्रा. धैर्यवर्धन पुंडकर, प्रा. सुभाष भडांगे, प्रा. मांडवगणे, प्रमोद बोर्डे, प्रा.अंबादास कुलट, प्रा. विजय नानोटी, सदाशिवराव शेळके आदी मंडळी यामध्ये अग्रेसर होती.2 विद्यार्थ्यांसह अनेक राजकीय नेत्यांनीही स्वतंत्र विद्यापीठाच्या मागणीला पाठिंबा दिला होता. तब्ब्ल तीन वर्ष ही मागणी लावून धरल्यावर तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी ११ फेब्रुवारी २००९ रोजी स्वतंत्र विद्यापिठाची मागणी मंजूरही केली होती; मात्र पुढे या मागणीचा विसर शासनाला पडला अन् विद्यापीठाची मागणी दुर्लक्षित राहिली.

ताकवाले समितीने बोलविलेल्या सभेत मी उपस्थित होतो. या समितीच्या शिफारसी उपयुक्त आहेत. सध्या अमरावती विद्यापीठाची स्थिती पाहता आणखी एक विद्यापीठ स्थापन करण्याची गरज आहे.-प्राचार्य डॉ.आर.डी. सिकची

लहान विद्यापीठे ही गुणवत्तावृद्धीसाठी अतिशय उपयुक्त ठरतात, हे सिद्ध झाले आहे. यशपाल कमिटीनेही याबाबत स्पष्ट शिफारस केली होती. त्यामुळे पश्चिम वºहाडासाठी स्वतंत्र विद्यापीठ असणे उपयुक्तच ठरेल-प्राचार्य डॉ.जे.एम. साबू  

टॅग्स :Akolaअकोलाuniversityविद्यापीठEducation Sectorशिक्षण क्षेत्र