शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

पातूर तालुक्यातील सायवणी, मळसूर, चान्नी शिवारात बिबट्याची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 02:26 IST

चान्नी/मळसूर: पातूर तालुक्यातील सायवणी, चान्नी, मळसूर परिसरात बिबट्याचा वावर असल्याने परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. शेतकरी व शेतमजूर शेतात काम करण्यासाठी जाण्यास घाबरत आहेत. ऐन हंगामात बिबट्याच्या दर्शनाने शेतकरी चिंतेत पडले आहेत.

ठळक मुद्देशेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्कचान्नी/मळसूर: पातूर तालुक्यातील सायवणी, चान्नी, मळसूर परिसरात बिबट्याचा वावर असल्याने परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. शेतकरी व शेतमजूर शेतात काम करण्यासाठी जाण्यास घाबरत आहेत. ऐन हंगामात बिबट्याच्या दर्शनाने शेतकरी चिंतेत पडले आहेत.सायवाणी शेतकरी सुपाती अमृता गटुले हे १९ डिसेंबरच्या सायंकाळी ६.३0 वाजता शेतातून घरी येत असताना पुंडलीक जानकीराम काळे यांच्या शेताजवळ त्यांना बिबट्या दिसला. गटुले यांनी आरडाओरड केल्याने व तेवढय़ात त्या रस्त्याने मोटारसायकल आल्याने बिबट्या पळून गेला. यापूर्वीसुद्धा १३ डिसेंबरला सुपाजी गटुले यांच्यावर पिसाळलेल्या लांडग्याने हल्ला करून त्यांना जबर जखमी केले होते. चान्नी येथेसुद्धा रामकृष्ण श्यामराव येनकर या शेतकर्‍याला तीन दिवसांपूर्वी सुकळी शिवारातील त्यांच्या शेतात बिबट्या दिसला होता. यापूर्वीसुद्धा चतारी शिवारातसुद्धा नीलगायींना बिबट्याने ठार मारले, तरी वन विभागाने कार्यवाही करून शेतमजुरांना अभय द्यावे, अशी मागणी परिसरातील शेतकरी, शेतमजुरांनी केली आहे.

बिबटच्या वास्तव्याने शिर्लाचे ग्रामस्थ भयभीत शिर्ला येथील अमोल विठोबा गवई यांच्या शेतात बिबटने डरकाळ्या फोडल्याने गावातील वातावरण भयभीत झाले असून, दहशतीने आबालवृद्ध घरात तर तरुण गावाबाहेर मिळेल ते हत्यार घेऊन बिबट्याच्या शोधात घराबाहेर पडले होते. बिबट्याने शिर्ला गावालगत येण्याची पहिली वेळ आहे. कारणही तसेच आहे, गावाच्या चहूबाजूंनी जलयुक्त शिवारचे पाणवठे आहेत. त्याबरोबरच शिकारीसाठी पशुधन आहे. सायंकाळी आठच्या सुमारास आलेल्या बिबट्याच्या बातमीने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वन विभागाने त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. 

गुरुवारी पुन्हा  आढळला बिबट! सायवणी येथील सुरेश पाटील यांच्या केळीच्या शेतात मोतीराम ताले यांना बिबट दिसला. त्यांनी सरपंच स्नेहल ताले यांना माहिती दिली. सरपंच ताले यांनी ही माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी नालिंदे यांना दिली. परिसरात वन विभागाचे कर्मचारी एच.आर. राठोड, ताकझुरे, जाधव, दामोदर, कळंद आदींनी भेट देऊन पाहणी केली.

 सध्या तूर, कपाशी, गहू , हरभरा यांचा हंगाम असल्याने शेतकर्‍यांना शेतात जाणे गरजेचे आहे. बिबट्याच्या भीतीने परिसरातील शेतकर्‍यांनी शेतात जाणे बंद केले आहे. याचा परिणाम उत्पादनावर होणार असल्याने वन विभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची गरज आहे. तसेच रात्रीचे भारनियमन बंद करण्याचे गरज आहे.-स्नेहल धनंजय ताले,सरपंच, सायवणी 

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीण