शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
3
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
4
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
5
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
6
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
7
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
8
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
9
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
10
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
11
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
12
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
13
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
14
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
15
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
16
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
17
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
18
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
19
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
20
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात

पातूर तालुक्यातील सायवणी, मळसूर, चान्नी शिवारात बिबट्याची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 02:26 IST

चान्नी/मळसूर: पातूर तालुक्यातील सायवणी, चान्नी, मळसूर परिसरात बिबट्याचा वावर असल्याने परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. शेतकरी व शेतमजूर शेतात काम करण्यासाठी जाण्यास घाबरत आहेत. ऐन हंगामात बिबट्याच्या दर्शनाने शेतकरी चिंतेत पडले आहेत.

ठळक मुद्देशेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्कचान्नी/मळसूर: पातूर तालुक्यातील सायवणी, चान्नी, मळसूर परिसरात बिबट्याचा वावर असल्याने परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. शेतकरी व शेतमजूर शेतात काम करण्यासाठी जाण्यास घाबरत आहेत. ऐन हंगामात बिबट्याच्या दर्शनाने शेतकरी चिंतेत पडले आहेत.सायवाणी शेतकरी सुपाती अमृता गटुले हे १९ डिसेंबरच्या सायंकाळी ६.३0 वाजता शेतातून घरी येत असताना पुंडलीक जानकीराम काळे यांच्या शेताजवळ त्यांना बिबट्या दिसला. गटुले यांनी आरडाओरड केल्याने व तेवढय़ात त्या रस्त्याने मोटारसायकल आल्याने बिबट्या पळून गेला. यापूर्वीसुद्धा १३ डिसेंबरला सुपाजी गटुले यांच्यावर पिसाळलेल्या लांडग्याने हल्ला करून त्यांना जबर जखमी केले होते. चान्नी येथेसुद्धा रामकृष्ण श्यामराव येनकर या शेतकर्‍याला तीन दिवसांपूर्वी सुकळी शिवारातील त्यांच्या शेतात बिबट्या दिसला होता. यापूर्वीसुद्धा चतारी शिवारातसुद्धा नीलगायींना बिबट्याने ठार मारले, तरी वन विभागाने कार्यवाही करून शेतमजुरांना अभय द्यावे, अशी मागणी परिसरातील शेतकरी, शेतमजुरांनी केली आहे.

बिबटच्या वास्तव्याने शिर्लाचे ग्रामस्थ भयभीत शिर्ला येथील अमोल विठोबा गवई यांच्या शेतात बिबटने डरकाळ्या फोडल्याने गावातील वातावरण भयभीत झाले असून, दहशतीने आबालवृद्ध घरात तर तरुण गावाबाहेर मिळेल ते हत्यार घेऊन बिबट्याच्या शोधात घराबाहेर पडले होते. बिबट्याने शिर्ला गावालगत येण्याची पहिली वेळ आहे. कारणही तसेच आहे, गावाच्या चहूबाजूंनी जलयुक्त शिवारचे पाणवठे आहेत. त्याबरोबरच शिकारीसाठी पशुधन आहे. सायंकाळी आठच्या सुमारास आलेल्या बिबट्याच्या बातमीने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वन विभागाने त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. 

गुरुवारी पुन्हा  आढळला बिबट! सायवणी येथील सुरेश पाटील यांच्या केळीच्या शेतात मोतीराम ताले यांना बिबट दिसला. त्यांनी सरपंच स्नेहल ताले यांना माहिती दिली. सरपंच ताले यांनी ही माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी नालिंदे यांना दिली. परिसरात वन विभागाचे कर्मचारी एच.आर. राठोड, ताकझुरे, जाधव, दामोदर, कळंद आदींनी भेट देऊन पाहणी केली.

 सध्या तूर, कपाशी, गहू , हरभरा यांचा हंगाम असल्याने शेतकर्‍यांना शेतात जाणे गरजेचे आहे. बिबट्याच्या भीतीने परिसरातील शेतकर्‍यांनी शेतात जाणे बंद केले आहे. याचा परिणाम उत्पादनावर होणार असल्याने वन विभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची गरज आहे. तसेच रात्रीचे भारनियमन बंद करण्याचे गरज आहे.-स्नेहल धनंजय ताले,सरपंच, सायवणी 

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीण