शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
2
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
3
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
4
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
5
आयसीसीनं लॉरावर केली मर्जी बहाल! वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतवर अन्याय?
6
उत्पन्न वाढीसाठी एसटी रिटेल इंधन विक्री करणार, निविदा प्रक्रिया सुरू, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती 
7
एअर इंडियाच्या विमानात गडबड! दिल्लीहून बांगळुरूला जाणाऱ्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग
8
Relationship Tips: भांडणानंतर बायको रडत राहते आणि नवरा झोपी जातो, असे का?
9
महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिक, सत्कार होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
10
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
11
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
12
Astro Tips: कडक मंगळाची पत्रिका म्हणजे नेमके काय? ती व्यक्ती तापदायकच असते का? वाचा 
13
‘एक बुथ, १० युथ’ या सुत्रानुसार युवक काँग्रेसने काम करा, जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवा, नसीम खान यांचं आवाहन
14
Mumbai: "जेवण का आणलं नाही?" रूममेट्सकडून टॅक्सी ड्रायव्हरची हत्या, साकीनाका येथील घटना!
15
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
16
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
17
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
18
रागाच्या भरात परेश रावल यांनी चक्क केली होती हाणामारी! म्हणाले, "एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड..."
19
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
20
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो

पातूर तालुक्यातील सायवणी, मळसूर, चान्नी शिवारात बिबट्याची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 02:26 IST

चान्नी/मळसूर: पातूर तालुक्यातील सायवणी, चान्नी, मळसूर परिसरात बिबट्याचा वावर असल्याने परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. शेतकरी व शेतमजूर शेतात काम करण्यासाठी जाण्यास घाबरत आहेत. ऐन हंगामात बिबट्याच्या दर्शनाने शेतकरी चिंतेत पडले आहेत.

ठळक मुद्देशेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्कचान्नी/मळसूर: पातूर तालुक्यातील सायवणी, चान्नी, मळसूर परिसरात बिबट्याचा वावर असल्याने परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. शेतकरी व शेतमजूर शेतात काम करण्यासाठी जाण्यास घाबरत आहेत. ऐन हंगामात बिबट्याच्या दर्शनाने शेतकरी चिंतेत पडले आहेत.सायवाणी शेतकरी सुपाती अमृता गटुले हे १९ डिसेंबरच्या सायंकाळी ६.३0 वाजता शेतातून घरी येत असताना पुंडलीक जानकीराम काळे यांच्या शेताजवळ त्यांना बिबट्या दिसला. गटुले यांनी आरडाओरड केल्याने व तेवढय़ात त्या रस्त्याने मोटारसायकल आल्याने बिबट्या पळून गेला. यापूर्वीसुद्धा १३ डिसेंबरला सुपाजी गटुले यांच्यावर पिसाळलेल्या लांडग्याने हल्ला करून त्यांना जबर जखमी केले होते. चान्नी येथेसुद्धा रामकृष्ण श्यामराव येनकर या शेतकर्‍याला तीन दिवसांपूर्वी सुकळी शिवारातील त्यांच्या शेतात बिबट्या दिसला होता. यापूर्वीसुद्धा चतारी शिवारातसुद्धा नीलगायींना बिबट्याने ठार मारले, तरी वन विभागाने कार्यवाही करून शेतमजुरांना अभय द्यावे, अशी मागणी परिसरातील शेतकरी, शेतमजुरांनी केली आहे.

बिबटच्या वास्तव्याने शिर्लाचे ग्रामस्थ भयभीत शिर्ला येथील अमोल विठोबा गवई यांच्या शेतात बिबटने डरकाळ्या फोडल्याने गावातील वातावरण भयभीत झाले असून, दहशतीने आबालवृद्ध घरात तर तरुण गावाबाहेर मिळेल ते हत्यार घेऊन बिबट्याच्या शोधात घराबाहेर पडले होते. बिबट्याने शिर्ला गावालगत येण्याची पहिली वेळ आहे. कारणही तसेच आहे, गावाच्या चहूबाजूंनी जलयुक्त शिवारचे पाणवठे आहेत. त्याबरोबरच शिकारीसाठी पशुधन आहे. सायंकाळी आठच्या सुमारास आलेल्या बिबट्याच्या बातमीने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वन विभागाने त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. 

गुरुवारी पुन्हा  आढळला बिबट! सायवणी येथील सुरेश पाटील यांच्या केळीच्या शेतात मोतीराम ताले यांना बिबट दिसला. त्यांनी सरपंच स्नेहल ताले यांना माहिती दिली. सरपंच ताले यांनी ही माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी नालिंदे यांना दिली. परिसरात वन विभागाचे कर्मचारी एच.आर. राठोड, ताकझुरे, जाधव, दामोदर, कळंद आदींनी भेट देऊन पाहणी केली.

 सध्या तूर, कपाशी, गहू , हरभरा यांचा हंगाम असल्याने शेतकर्‍यांना शेतात जाणे गरजेचे आहे. बिबट्याच्या भीतीने परिसरातील शेतकर्‍यांनी शेतात जाणे बंद केले आहे. याचा परिणाम उत्पादनावर होणार असल्याने वन विभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची गरज आहे. तसेच रात्रीचे भारनियमन बंद करण्याचे गरज आहे.-स्नेहल धनंजय ताले,सरपंच, सायवणी 

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीण