शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाभिमानी’ची वाटचाल पुन्हा ‘एनडीए’कडे; सत्ताधाऱ्यांनी शब्द फिरविल्याने कार्यकर्ते संभ्रमास्थेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2021 07:08 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांना विधान परिषदेवर पाठविण्यासाठी राष्ट्रवादीने ऐनवेळी नकार देत १२ आमदारांच्या यादीतून नाव कापल्याची माहिती समाेर आल्यावर स्वाभिमानीचे कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत.

- राजेश शेगाेकारअकाेला :   गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या विराेधात राजू शेट्टी यांनी घेतलेली आक्रमक भूमिका अन् आता राष्ट्रवादीने फिरवलेला शब्द पाहता ‘स्वाभिमानी’ची पावले पुन्हा एकदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे  (एनडीए) वळू शकतील, अशी चर्चा सुरू झाली आहे. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांना विधान परिषदेवर पाठविण्यासाठी राष्ट्रवादीने ऐनवेळी नकार देत १२ आमदारांच्या यादीतून नाव कापल्याची माहिती समाेर आल्यावर स्वाभिमानीचे कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत. गेल्या लाेकसभा निवडणुकीपासून शेट्टी यांनी एनडीएसाेबत फारकत घेत काँग्रेस, राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली हाेती. आघाडीने दिलेल्या जागेवर शेट्टी यांचा पराभव झाल्याने स्वाभिमानीचा वारू थंडावला हाेता.

शेट्टी राष्ट्रवादीसाेबत बसल्यामुळे संघटनेवरही परिणाम झाला. त्यामुळे शेट्टी यांनी पुन्हा आंदाेलनाची हाक देत ‘शेतकरी नेता’ ही प्रतिमा ठळक करण्याचा प्रयत्न सुरू केला. त्याची किंमत त्यांना माेजावी लागली, असे कार्यकर्ते बाेलत आहेत.  दुसरीकडे, भाजपासाेबत गेल्याने शेट्टींना खासदारकी, सदाभाऊ खाेत यांना मंत्रीपद तसेच रविकांत तुपकर यांना महामंडळाचे अध्यक्षपद मिळाले हाेतेे. त्यामुळे राजकीय ताकदीसाठी शेट्टी पुन्हा एनडीएकडे झुकतील, अशी चर्चा सुरू झाली आहे. 

‘एनडीए’साेबतच फायदा, कार्यकर्त्यांचे गणित

शेट्टी यांनी लाेकसभेसाठी काँग्रेस आघाडीकडे हातकणंगले व बुलडाणा या दाेन  जागा मागितल्या हाेत्या. मात्र, त्यावेळी हातकणंगलेसाेबत सांगलीची जागा ऐनवेळी देण्यात आली. आगामी निवडणुकीसाठी महाविकास आघाडी कायम राहिली, तर शेट्टी यांचा प्रभाव असलेल्या हातकणंगले व बुलडाणा या दाेन्ही जागा स्वाभिमानीला मिळण्याची शक्यता कमी आहे, कारण या दाेन्ही जागांवर सध्या शिवसेनेचे खासदार आहेत. त्यामुळे भाजपासाेबत गेले तरच राजकीय फायदा हाेऊ शकताे, असे गणित कार्यकर्ते मांडत आहेत.

राजू शेट्टींचे नाव वगळले नाही : अजित पवार 

राज्यपालांकडे दिलेल्या यादीतील बारा आमदारांपैकी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यासह काहींची नावे वगळल्याची चर्चा आहे. याबाबत विचारले असता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “यात कोणतेही तथ्य नाही. राज्य सहकारी बँकेच्या संबंधितांवर ईडी तपास यंत्रणेकडून छापे टाकण्यात आल्याची बातमी एका वृत्तवाहिनीने दाखवली. परंतु ही बातमी धादांत खोटी, निराधार होती. अशा निराधार बातम्यांमुळे प्रसारमाध्यमांबाबत जनतेच्या मनातील असलेली विश्वासार्हता कमी होईल.”

 ...अन्यथा जलसमाधी घेणारच : राजू शेट्टी

 महापुराने शेतकऱ्यांची वाताहत झाली असून, हे आपत्कालीन संकट शासनास कळत नाही का? सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा अन्यथा जलसमाधी घेणारच, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. रुकडी येथे ‘आक्रोश शेतकऱ्यांचा परिक्रमा पंचगंगेची’ या पदयात्रेप्रसंगी ते बोलत होते.

पूरग्रस्तांना विविध मागण्यांसाठी निघालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदयात्रेस शुक्रवारी चांगला प्रतिसाद मिळाला. पदत्रात्रेमुळे पूरग्रस्तांच्या मदतीच्या आशा पल्लवित झाल्याचे पाहायला मिळाले. पदयात्रेच्या तिसऱ्या दिवशी गावागावातील शेतकरी सहभागी झाले होते.  रुकडी येथे अंबाबाई मंदिरामध्ये पदयात्रा आली असता तेथे सभा झाली. केंद्रीय अर्थमंत्री बजेट सादर करीत असताना आपत्कालीन निधी या आयोगाकडे वर्ग करीत असते. केंद्र सरकारने आपत्कालीन निधीमधून महाराष्ट्राला मदत अद्यापही दिलेली नाही. मग महाराष्ट्र भारताच्या बाहेर आहे का, असा सवाल शेट्टी यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीBJPभाजपा