शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीचे प्रस्ताव नसल्याने ‘स्वाभिमान’ बारगळली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 01:35 IST

भूमिहीन शेतमजुरांना कसण्यासाठी हक्काची  जमीन मिळावी, यासाठी राज्यात सुरू असलेली  कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना  ‘स्वाभिमान’ नावाने सुरू झाली. पाच वर्षांनंतर जमीन  विक्रीसाठी प्रस्तावच येत नसल्याने सामाजिक न्याय,  आदिवासी विकास विभागाकडे निधी मागणे बंद  असल्याची माहिती आहे. त्यामुळे ही योजनाच  गुंडाळण्यात जमा आहे. सामाजिक न्याय विभागाच्या  अकोला सहायक आयुक्त कार्यालयात २0११ पासून  योजना ठप्प आहे. 

ठळक मुद्देकिमती वाढल्याच्या कारणाने जमीन खरेदी अशक्यजिल्हय़ात अल्प लाभार्थी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : भूमिहीन शेतमजुरांना कसण्यासाठी हक्काची  जमीन मिळावी, यासाठी राज्यात सुरू असलेली  कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना  ‘स्वाभिमान’ नावाने सुरू झाली. पाच वर्षांनंतर जमीन  विक्रीसाठी प्रस्तावच येत नसल्याने सामाजिक न्याय,  आदिवासी विकास विभागाकडे निधी मागणे बंद  असल्याची माहिती आहे. त्यामुळे ही योजनाच  गुंडाळण्यात जमा आहे. सामाजिक न्याय विभागाच्या  अकोला सहायक आयुक्त कार्यालयात २0११ पासून  योजना ठप्प आहे. ग्रामीण भागातील भूमिहीन, शेतमजुरांचे जीवनमान  उंचावण्यासाठी त्यांना कसण्यासाठी मालकी हक्काने  जमीन देण्याची योजना राज्य शासनाने सुरू केली.  २00५ पासून २00८-0९ पर्यंत काही प्रमाणात  योजनेचा लाभ देण्यात आला. त्यानंतर जमिनीचे भाव  सातत्याने वाढल्याने शासकीय शीघ्र गणक दर आणि  त्यावर वाढीव देय रकमेच्या र्मयादेत जमीन मिळणे  अशक्य झाले. त्यासाठी सामाजिक न्याय विभागाने  जमीन विक्रीसाठी उत्सुक शेतकर्‍यांचे प्रस्ताव  मागवण्याची औपचारिकता पूर्ण केली. त्यामध्ये प्राप्त  प्रस्तावातील जमिनीचे दर वाटाघाटीनुसार ठरवून ती  खरेदी करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांना भाव वाढवून  देण्याचे अधिकार आहेत. ते वापरण्यातच आले नाहीत.  त्यामुळे योजनेसाठी जमीन खरेदीची प्रक्रियाच सुरू  झाली नाही. त्याचवेळी खासगी शेतकर्‍यांचे जमीन  विक्रीचे प्रस्तावच नसल्याने ती खरेदी करण्यासाठी  शासनाकडून निधी मागवण्याचाही प्रश्न नाही, असा  पवित्रा सामाजिक न्याय विभागाकडून घेतला जात  आहे. त्यामुळे काही प्रमाणात शासनाची उदासीनता  आणि दुसरीकडे प्रशासनाचा कानाडोळा यामुळे ही  योजनाच आता बारगळण्याची शक्यता आहे. 

जिल्हय़ात अल्प लाभार्थीअकोला जिल्हय़ात योजना सुरुवातीपासूनच वादात  सापडली होती. जमीन खरेदी करण्यासाठी असलेल्या  समितीने पुरेशी खातरजमा न करता निकृष्ट जमीन  खरेदी केल्याचेही प्रकार घडले आहेत. त्यामुळे  योजनेची फलश्रुती फारशी झाली नाही. जिल्हय़ात  योजनेची लाभार्थी संख्या बोटावर मोजण्याएवढीच  आहे. सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त  कार्यालय त्याबद्दल फारसे गंभीर नसल्याचे चित्र दिसून  येते.

माहिती देण्यासही टाळाटाळसामाजिक न्याय विभागाच्या योजनेतून किती लाभा र्थींना जमीन देण्यात आली. किती निधी खर्च झाला,  याबाबतची माहिती सहायक आयुक्त अमोल  यावलीकर यांना मागितली. ते महत्त्वाच्या व्हिडिओ  कॉन्फरन्सिंगमध्ये असल्याने त्यांनी संबंधित माहिती  जोशी यांच्याकडून घ्या, असे सांगितले. त्यावर जोशी  यांच्याशी संपर्क साधला असता, साहेबांना विचारा,  असा पवित्रा त्यांनी घेतला. त्यामुळे शासकीय योजनांची  माहिती देण्यासही टाळाटाळ होत असल्याचे स्पष्ट होत  आहे.