शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

कृषी सहायकाच्या दांडीमुळे सर्वेक्षण रद्द! चोंढी परिसरातील चित्र!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 02:11 IST

चोंढी : गारपीटमुळे चोंढी, अंधारसांगवी, चारमोळी, पांढुर्णा परिसरात मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने नुकसानग्रस्त भागाचा पंचनामा करून सर्वेक्षण करण्याचे आदेश तलाठी, कृषी सहायक आणि ग्रामसेवकांना दिले आहेत. चोंढी परिसरात कृषी सहायकाने दांडी मारल्याने १३ फेब्रुवारी रोजी नुकसानग्रस्त शेतीचे सर्वेक्षणच होऊ शकले नाही. त्यामुळे या कृषी सहायकावर कारवाई करण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. 

ठळक मुद्देग्रामसेवक, तलाठी नुकसानग्रस्त शेतातून गेले परत!

लोकमत न्यूज नेटवर्कचोंढी : गारपीटमुळे चोंढी, अंधारसांगवी, चारमोळी, पांढुर्णा परिसरात मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने नुकसानग्रस्त भागाचा पंचनामा करून सर्वेक्षण करण्याचे आदेश तलाठी, कृषी सहायक आणि ग्रामसेवकांना दिले आहेत. चोंढी परिसरात कृषी सहायकाने दांडी मारल्याने १३ फेब्रुवारी रोजी नुकसानग्रस्त शेतीचे सर्वेक्षणच होऊ शकले नाही. त्यामुळे या कृषी सहायकावर कारवाई करण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. पातूर तालुक्यातील चोंढी, चारमोळी, अंधारसांगवी, पांढुर्णा आदी गावांमध्ये ११ फेब्रुवारी रोजी गारपीट झाल्याने शेतकर्‍यांचे गहू, हरभरा, कांदा या पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.  नुकसानाची पाहणी करून सर्व्हे करण्याचे आदेश कृषी मंत्री फुंडकर यांनी दिले. त्यावरून तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांना १३ फेब्रुवारीला शेतीची पाहणी करून सर्व्हे करण्याचे आदेश दिले. त्यानुसार तलाठी, ग्रामसेवक हे चोंढी परिसरातील नुकसानीचे सर्वेक्षण करण्यासाठी पोहोचले; परंतु कृषी सहायक शेळके हे चक्क गैरहजर राहिले. त्यामुळे घटनास्थळी शेतीची पाहणी करायला आलेले तलाठी खंडारे, हेडाऊ व ग्रामसेवक कापकर यांनी कृषी सहायक शेळके हे गैरहजर असल्यामुळे शेतीचा सर्व्हे करण्याचे रद्द केले.  त्यामुळे मदतीची आस असलेल्या चोंढी, चारमोळी, पांढुर्णा येथील शेतकर्‍यांची कृषी सहायकांच्या बेजबाबदारपणे निराशा झाली.त्यामुळे शेतकर्‍यांना मदतीपासून वंचित ठेवणार्‍या कृषी सहायकावर कारवाई करण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी केली आहे. दरम्यान, याप्रकरणी कृषी सहायक आर.आर.शेळके यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मोबदला मिळवून देऊ - हरीश पिंपळेमूर्तिजापूर तालुक्यात ११ फेब्रुवारी रोजी झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान झाले आहे. शासनाच्या दरबारात पाठपुरावा करून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मोबदला मिळवून देऊ, असे मूर्तिजापूर मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना धीर देताना बोलत होते.४मूर्तिजापूर मतदारसंघातील काही परिसरात शेतकर्‍यांचे गहू, हरभरा, कांदा, भाजीपाला व फळवर्गीय पिकांचे अतोनात नुकसान झाले. संबंधित विभागाला तातडीने सर्व्हे करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. ४कृषी विभाग व महसूल विभागाचे अधिकारी ताबडतोब प्रत्येक नुकसानग्रस्त ठिकाणी भेट देऊन पाहणीसोबत पंचनामा करणार आहेत. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाची मदत केली जाईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी दिले आहे. शेतकर्‍यांनी घाबरून जाऊ नये, शासन त्यांच्या पाठीशी आहे, असेही पिंपळे म्हणाले. 

नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मोबदला मिळवून देऊ - हरीश पिंपळेमूर्तिजापूर तालुक्यात ११ फेब्रुवारी रोजी झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान झाले आहे. शासनाच्या दरबारात पाठपुरावा करून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मोबदला मिळवून देऊ, असे मूर्तिजापूर मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना धीर देताना बोलत होते.मूर्तिजापूर मतदारसंघातील काही परिसरात शेतकर्‍यांचे गहू, हरभरा, कांदा, भाजीपाला व फळवर्गीय पिकांचे अतोनात नुकसान झाले. संबंधित विभागाला तातडीने सर्व्हे करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. कृषी विभाग व महसूल विभागाचे अधिकारी ताबडतोब प्रत्येक नुकसानग्रस्त ठिकाणी भेट देऊन पाहणीसोबत पंचनामा करणार आहेत. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाची मदत केली जाईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी दिले आहे. शेतकर्‍यांनी घाबरून जाऊ नये, शासन त्यांच्या पाठीशी आहे, असेही पिंपळे म्हणाले. 

 

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीण