शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

दुष्काळग्रस्त गावांमधील विद्यार्थ्यांचा पूरक आहार आजपासून होणार बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 11:02 IST

ओला दुष्काळाची झळ पोहोचत असताना, शिक्षण विभागाने पौष्टिक आहार बंद करून विद्यार्थ्यांच्या तोंडचा घास पळविला आहे.

- नितीन गव्हाळे लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त आंबेजोगाई, परांडा तालुके वगळता, गतवर्षीच्या सर्वच तालुक्यांमधील शालेय विद्यार्थ्यांना अंडी, दूध, फळे हा पौष्टिक आहार बंद करण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षण विभागाने ८ नोव्हेंबर रोजी दिले आहेत. विदर्भासह अकोला जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे. ओला दुष्काळाची झळ पोहोचत असताना, शिक्षण विभागाने पौष्टिक आहार बंद करून विद्यार्थ्यांच्या तोंडचा घास पळविला आहे.संपूर्ण राज्यातच ओला दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या हातातून सर्वच पिके निघून गेली आहे. आर्थिकदृष्ट्या शेतकरी खचला आहे. मुलांचे शिक्षण, उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत प्राथमिक शिक्षण संचालनालयाने राज्यात दुष्काळ नसल्याचे अनुमान लावत, दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी गतवर्षी सुरू केलेली पौष्टिक आहार योजना ११ नोव्हेंबरपासून बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. यातून बीड व उस्मानाबाद जिल्ह्यातील आंबेजोगाई व परांडा हे दोन तालुके वगळण्यात आले आहेत. या दोन तालुक्यांमध्ये शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. गतवर्षी अकोला जिल्ह्यात सात तालुक्यांमध्ये शासनाने दुष्काळ जाहीर केला होता. या तालुक्यामधील प्राथमिक शाळांमध्ये शिकणाºया विद्यार्थ्यांना आठवड्यातून तीन दिवस पूरक आहार म्हणून अंडी, दूध, फळे देण्यात येत होती; परंतु आता दुष्काळ नसल्याचे परस्पर गृहीत धरून प्राथमिक शिक्षण संचालनालयाने ही पूरक आहार योजना बंद केली आहे. राज्यात सर्वत्रच पावसाने कहर केला आहे. अकोला जिल्ह्यातसुद्धा ओल्या दुष्काळाची परिस्थिती आहे. सर्वच पिकांची नासाडी झाल्याने, शेतकरी हवालदिल झाला आहे. त्या पृष्ठभूमीवर शासनाने शेतकरी आणि त्याच्या पाल्यांसाठी पूरक आहार योजना सुरू ठेवण्याची गरज आहे. शेतकरी आर्थिक संकटात असताना, पाल्यांना अंडी, दूध व फळे आहार बंद करण्याची गरज नसल्याचे मत शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. शासनाच्या निर्णयामुळे शेतकºयांच्या मुलांच्या तोंडचा घास हिरावून घेतल्याची भावना निर्माण झाली आहे.

आहार योजना बंद करून माहिती सादर करा!प्राथमिक शिक्षण संचालनालयाने आठवड्यातून तीन पूरक आहार म्हणून अंडी, दूध, फळे देण्याची योजना बंद करून शाळा स्तरावर झालेल्या खर्चाची रक्कम अदा करण्यासाठी आवश्यक निधीची माहिती १५ नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.निसर्गाने शेतकºयांच्या तर शिक्षण विभागाने पाल्यांच्या तोंडचा घास हिरावला!अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात शेतकºयांच्या पिकांची नासाडी झाली आहे. निसर्गाने शेतकºयांच्या तोंडचा घास काढून घेतला आहे आणि ओल्या दुष्काळात दिलासा देण्याची गरज असताना, प्राथमिक शिक्षण विभागाने शेतकºयांच्या पाल्यांच्या तोंडचा पूरक आहाराचा घास हिरावला आहे.पूरक आहार बंद केल्याची माहिती नाही; परंतु दुष्काळी परिस्थिती असताना, पूरक आहार योजना बंद करणे चुकीचे आहे. याबाबत माहिती घेऊन ही योजना पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करू.- विशाल सोळंकी,राज्य आयुक्त, शिक्षण विभाग

टॅग्स :AkolaअकोलाStudentविद्यार्थीEducation Sectorशिक्षण क्षेत्र