शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्त गावांमधील विद्यार्थ्यांचा पूरक आहार आजपासून होणार बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 11:02 IST

ओला दुष्काळाची झळ पोहोचत असताना, शिक्षण विभागाने पौष्टिक आहार बंद करून विद्यार्थ्यांच्या तोंडचा घास पळविला आहे.

- नितीन गव्हाळे लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त आंबेजोगाई, परांडा तालुके वगळता, गतवर्षीच्या सर्वच तालुक्यांमधील शालेय विद्यार्थ्यांना अंडी, दूध, फळे हा पौष्टिक आहार बंद करण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षण विभागाने ८ नोव्हेंबर रोजी दिले आहेत. विदर्भासह अकोला जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे. ओला दुष्काळाची झळ पोहोचत असताना, शिक्षण विभागाने पौष्टिक आहार बंद करून विद्यार्थ्यांच्या तोंडचा घास पळविला आहे.संपूर्ण राज्यातच ओला दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या हातातून सर्वच पिके निघून गेली आहे. आर्थिकदृष्ट्या शेतकरी खचला आहे. मुलांचे शिक्षण, उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत प्राथमिक शिक्षण संचालनालयाने राज्यात दुष्काळ नसल्याचे अनुमान लावत, दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी गतवर्षी सुरू केलेली पौष्टिक आहार योजना ११ नोव्हेंबरपासून बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. यातून बीड व उस्मानाबाद जिल्ह्यातील आंबेजोगाई व परांडा हे दोन तालुके वगळण्यात आले आहेत. या दोन तालुक्यांमध्ये शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. गतवर्षी अकोला जिल्ह्यात सात तालुक्यांमध्ये शासनाने दुष्काळ जाहीर केला होता. या तालुक्यामधील प्राथमिक शाळांमध्ये शिकणाºया विद्यार्थ्यांना आठवड्यातून तीन दिवस पूरक आहार म्हणून अंडी, दूध, फळे देण्यात येत होती; परंतु आता दुष्काळ नसल्याचे परस्पर गृहीत धरून प्राथमिक शिक्षण संचालनालयाने ही पूरक आहार योजना बंद केली आहे. राज्यात सर्वत्रच पावसाने कहर केला आहे. अकोला जिल्ह्यातसुद्धा ओल्या दुष्काळाची परिस्थिती आहे. सर्वच पिकांची नासाडी झाल्याने, शेतकरी हवालदिल झाला आहे. त्या पृष्ठभूमीवर शासनाने शेतकरी आणि त्याच्या पाल्यांसाठी पूरक आहार योजना सुरू ठेवण्याची गरज आहे. शेतकरी आर्थिक संकटात असताना, पाल्यांना अंडी, दूध व फळे आहार बंद करण्याची गरज नसल्याचे मत शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. शासनाच्या निर्णयामुळे शेतकºयांच्या मुलांच्या तोंडचा घास हिरावून घेतल्याची भावना निर्माण झाली आहे.

आहार योजना बंद करून माहिती सादर करा!प्राथमिक शिक्षण संचालनालयाने आठवड्यातून तीन पूरक आहार म्हणून अंडी, दूध, फळे देण्याची योजना बंद करून शाळा स्तरावर झालेल्या खर्चाची रक्कम अदा करण्यासाठी आवश्यक निधीची माहिती १५ नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.निसर्गाने शेतकºयांच्या तर शिक्षण विभागाने पाल्यांच्या तोंडचा घास हिरावला!अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात शेतकºयांच्या पिकांची नासाडी झाली आहे. निसर्गाने शेतकºयांच्या तोंडचा घास काढून घेतला आहे आणि ओल्या दुष्काळात दिलासा देण्याची गरज असताना, प्राथमिक शिक्षण विभागाने शेतकºयांच्या पाल्यांच्या तोंडचा पूरक आहाराचा घास हिरावला आहे.पूरक आहार बंद केल्याची माहिती नाही; परंतु दुष्काळी परिस्थिती असताना, पूरक आहार योजना बंद करणे चुकीचे आहे. याबाबत माहिती घेऊन ही योजना पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करू.- विशाल सोळंकी,राज्य आयुक्त, शिक्षण विभाग

टॅग्स :AkolaअकोलाStudentविद्यार्थीEducation Sectorशिक्षण क्षेत्र