शहरं
Join us  
Trending Stories
1
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
2
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
3
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
4
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
5
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
6
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
7
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
8
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
9
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
10
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
11
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
12
'झुरळे गोपीनाथ' मंदिर ! ३०० वर्षांपूर्वीच्या मंदिरात झुरळांच्या रूपात गोपिकांचा वास
13
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
14
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
15
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
16
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
17
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
18
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
19
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
20
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका

 अधीक्षक कृषी अधिकारी रजेवर, शेतकरी वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 14:59 IST

कृषी विभागाचे अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ दीर्घ रजेवर गेले आहेत.

अकोला : जिल्ह्यात अवकाळी पावसासारख्या नैसर्गिक आपत्तीशी शेतकरी झुंज देत असताना शेतीशी संबंधित सर्व विषय हाताळणाºया राज्याच्या कृषी विभागाचे अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ दीर्घ रजेवर गेले आहेत. त्यातच कृषी विभागाच्या कार्यालयात शेतकऱ्यांच्या चकरा सुरू आहेत. विम्याची रक्कम मिळण्यासाठी शेतकºयांना दिलासा देत मार्गदर्शन करण्याचे सोडून अधीक्षक कृषी अधिकाºयांनी शेतकºयांना वाºयावर सोडण्याचा प्रकार घडला आहे.राज्यात सर्वत्र १८ आॅक्टोबरपासून अवकाळी पाऊस पडत आहे. त्या पावसामुळे उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यामध्ये कापूस, तूर, सोयाबीनचा समावेश आहे. तसेच सोयाबीनच्या काढणी पश्चात मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. या सर्व बाबी पाहता विमा कंपनीला नुकसान भरपाईसाठी ४८ तासांच्या आत माहिती देणे आवश्यक आहे. त्यासाठी कृषी विभागाला तातडीने पंचनामे करावे लागत आहेत. विशेष म्हणजे, त्यासाठी प्रत्येक शेतकºयाच्या शेतात जाऊन पंचनामा होणार आहे. नैसर्गिक आपत्ती बाबी अंतर्गत गारपीट, भूस्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास ढगफुटी, वीज कोसळून लागणारी आग, या आपत्तींमध्ये नुकसाग्रस्त क्षेत्राचे वैयक्तिक पंचनामे करावे लागतात. शेतात पसरवून ठेवलेल्या पिकांच्या काढणीनंतर दोन आठवड्यांच्या आत १४ दिवसांत गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे आलेल्या पावसामुळे नुकसान झाल्यास त्याचेही वैयक्तिक पातळीवर पंचनामे केले जातात. पंचनाम्यातून पुढे आलेल्या माहितीनुसार पीक नुकसान सूचना फॉर्म भरून विमा कंपनीच्या अधिकृत मेलवर टाकावा लागतो. या संपूर्ण प्रक्रियेत कृषी सहायक, पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, ग्रामविकास विभाग, महसूल विभागाच्या अधिकारी-कर्मचाºयांशी समन्वय ठेवून तातडीने काम करावे लागते. त्यासाठी कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय यंत्रणेची प्रमुख व महत्त्वाची भूमिका आहे; मात्र ती जबाबदारी पार पाडण्याचे सोडून अधीक्षक कृषी अधिकारी वाघ २६ आॅक्टोबरपासून ५ ते ६ नोव्हेंबरपर्यंत रजेवर गेल्याची माहिती आहे. या काळात शेतकºयांनी कोणाशी संपर्क साधावा, असा प्रश्न आता आपत्तीग्रस्तांना पडत आहे.

 

टॅग्स :Akolaअकोला