शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

 अधीक्षक कृषी अधिकारी रजेवर, शेतकरी वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 14:59 IST

कृषी विभागाचे अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ दीर्घ रजेवर गेले आहेत.

अकोला : जिल्ह्यात अवकाळी पावसासारख्या नैसर्गिक आपत्तीशी शेतकरी झुंज देत असताना शेतीशी संबंधित सर्व विषय हाताळणाºया राज्याच्या कृषी विभागाचे अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ दीर्घ रजेवर गेले आहेत. त्यातच कृषी विभागाच्या कार्यालयात शेतकऱ्यांच्या चकरा सुरू आहेत. विम्याची रक्कम मिळण्यासाठी शेतकºयांना दिलासा देत मार्गदर्शन करण्याचे सोडून अधीक्षक कृषी अधिकाºयांनी शेतकºयांना वाºयावर सोडण्याचा प्रकार घडला आहे.राज्यात सर्वत्र १८ आॅक्टोबरपासून अवकाळी पाऊस पडत आहे. त्या पावसामुळे उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यामध्ये कापूस, तूर, सोयाबीनचा समावेश आहे. तसेच सोयाबीनच्या काढणी पश्चात मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. या सर्व बाबी पाहता विमा कंपनीला नुकसान भरपाईसाठी ४८ तासांच्या आत माहिती देणे आवश्यक आहे. त्यासाठी कृषी विभागाला तातडीने पंचनामे करावे लागत आहेत. विशेष म्हणजे, त्यासाठी प्रत्येक शेतकºयाच्या शेतात जाऊन पंचनामा होणार आहे. नैसर्गिक आपत्ती बाबी अंतर्गत गारपीट, भूस्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास ढगफुटी, वीज कोसळून लागणारी आग, या आपत्तींमध्ये नुकसाग्रस्त क्षेत्राचे वैयक्तिक पंचनामे करावे लागतात. शेतात पसरवून ठेवलेल्या पिकांच्या काढणीनंतर दोन आठवड्यांच्या आत १४ दिवसांत गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे आलेल्या पावसामुळे नुकसान झाल्यास त्याचेही वैयक्तिक पातळीवर पंचनामे केले जातात. पंचनाम्यातून पुढे आलेल्या माहितीनुसार पीक नुकसान सूचना फॉर्म भरून विमा कंपनीच्या अधिकृत मेलवर टाकावा लागतो. या संपूर्ण प्रक्रियेत कृषी सहायक, पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, ग्रामविकास विभाग, महसूल विभागाच्या अधिकारी-कर्मचाºयांशी समन्वय ठेवून तातडीने काम करावे लागते. त्यासाठी कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय यंत्रणेची प्रमुख व महत्त्वाची भूमिका आहे; मात्र ती जबाबदारी पार पाडण्याचे सोडून अधीक्षक कृषी अधिकारी वाघ २६ आॅक्टोबरपासून ५ ते ६ नोव्हेंबरपर्यंत रजेवर गेल्याची माहिती आहे. या काळात शेतकºयांनी कोणाशी संपर्क साधावा, असा प्रश्न आता आपत्तीग्रस्तांना पडत आहे.

 

टॅग्स :Akolaअकोला