शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे; ५ जुलैला होणारा ठाकरे बंधुंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

दोन अल्पभूधारक शेतक-यांच्या आत्महत्या

By admin | Updated: January 6, 2015 00:17 IST

संग्रामपूर व खामगाव तालुक्यातील घटना.

बुलडाणा : वेगवेगळ्या दोन घटनेत संग्रामपूर येथील एका अल्पभूधारक शेतकरी व खामगाव तालुक्यातील किन्ही महादेव येथील अल्पभूधारक शेतकरी पुत्राने आत्महत्या केल्याची घटना ५ जानेवारीला उघडकीस आली. संग्रामपूर येथील ४५ वर्षीय अल्पभूधारक शेतकरी ज्ञानेश्‍वर रामभाऊ राजनकर यांनी ५ जानेवारीला बटाईच्या शेतात काम सुरू असताना विष घेतले. ही बाब काही मजुरांच्या लक्षात येताच त्यांनी धावपळ करून त्यांना उपचारार्थ संग्रामपूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता वरवट बकाल येथे हलविण्याचा सल्ला देण्यात आला. त्यामुळे त्यांना वरवट बकाल येथे रुग्णालयात आणत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. मृतक ज्ञानेश्‍वर राजनकर यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, मुली असा परिवार आहे. तर दुसर्‍या घटनेत खामगाव तालुक्यातील किन्ही महादेव येथील डिगांबर नथ्थू तायडे (वय ३८) यांच्या आईच्या नावे ४ एकर शेती आहे. आई वृद्ध असल्याने डिगांबर तायडे हेच शेतीचे काम करीत होते. दरम्यान, काल ४ जानेवारी रोजी ते घराबाहेर गेले; मात्र परत आले नाही. तर ५ जानेवारी रोजी डिगांबर तायडे यांनी शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी कलम १७४ जाफौनुसार आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृतकाच्या पश्‍चात वृद्ध आई, पत्नी, २ मुले, मुलगी असा आप्त परिवार आहे.