शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

दाम्पत्याची गळफास घेऊन आत्महत्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:47 IST

अडीच वर्षांपूर्वी झाला प्रेमविवाह : नेहमीच उडायचे खटके

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: किरकोळ वादातून पती, पत्नीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी ४.३0 वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बस स्थानकापाठीमागील डॉ. आंबेडकर नगरात राहणारा सिद्धार्थ ऊर्फ सम्राट रामदन बावीसाने(२२) याने घराजवळच राहणाऱ्या नीशा नामक युवतीसोबत अडीच वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. विवाहानंतर दीड ते दोन वर्ष दोघा पती, पत्नीचा संसार सुरळीत होता; परंतु नंतर दोघांमध्ये किरकोळ कारणावरून खटके उडायला लागले. पती, पत्नीची दररोजचीच भांडणे असल्याने, कुटुंबीयसुद्धा दुर्लक्ष करायचे. अनेकदा त्यांचा वाद सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात पोहोचत असे. पोलीस दोघाही पती, पत्नीची समजूत घालून त्यांची पाठवणी करीत. मृत सिद्धार्थ बावीसाने याने काही वर्षांपूर्वी मलकापूर(बुलडाणा) येथे घर बांधले होते. काही दिवस सिद्धार्थ पत्नीसह मलकापूरला राहायचा. अधूनमधून तो अकोल्यातही यायचा. काही दिवसांपूर्वी त्याच्या पायाला दुखापत झाली होती; परंतु पत्नी त्याच्या भेटीला आली नव्हती. याचे शल्य त्याच्या मनाला बोचत होते. पत्नी नीशा ही मंगळवारी मलकापूरवरून अकोल्याला घरी आली होती. बुधवारी दुपारी दोघेही पायाला प्लॅस्टर बांधण्यासाठी दवाखान्यात गेले होते. तेथून परत आल्यानंतर दोघांमध्ये भांडण झाले. भांडण विकोपाला गेल्याने सिद्धार्थ बावीसाने याने छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. हे पाहून घाबरलेल्या नीशानेसुद्धा गळफास घेतला. असा पोलिसांचा कयास आहे. घटनास्थळाला सिव्हिल लाइनचे ठाणेदार अन्वर शेख यांनी भेट दिली. पोलिसांनी मृतदेहांचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठवून दिले. आई-वडील म्हणत होते, घटस्फोट घे...सिद्धार्थ व निशा यांच्यामध्ये नेहमीच किरकोळ कारणावरून वाद होत. घरच्यांना तर त्यांचे वाद नित्त्याचे झाले होते. त्यामुळे आई-वडिलांनी सिद्धार्थला अनेकदा तुझे पत्नीसोबत पटत नसेल तर तिला घटस्फोट दे. ही दररोजची भांडणे, वादावादी चांगली नाही, असा सल्ला दिला होता; परंतु तो सिद्धार्थने ऐकला नाही. त्याने आमचा सल्ला ऐकला असता तर त्याचा जीव गेला नसता, असे त्याच्या आईने बोलताना सांगितले.