शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

दुसरबीड येथील जिजामाता कारखान्यातील साखरेचा होणार लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 14:12 IST

साखर विक्रीतून आलेली रक्कम कामगार संघटनेच्या सदस्यांना देण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य बँकेला दिले आहेत.

बुलडाणा : सिंदखेड राजा तालुक्यातील दुसरबीड येथील जिजामाता साखर कारखान्यातील साखर लिलाव करुन विक्री करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. साखर विक्रीतून आलेली रक्कम कामगार संघटनेच्या सदस्यांना देण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य बँकेला दिले आहेत.जिजामाता साखर कारखाना २००२ मध्ये अवसायनात आला. मात्र कामगार कर्मचाऱ्यांची ग्रॅच्यूईटी, बोनस, पगार थकीत आहे. दरम्यान ३० जून २००९ रोजी कारखाना जालना येथील जिजामाता शुगर प्रा. लि. यांना १५ कोटी १५ लाख रुपयांत दुसऱ्यांदा विक्री करण्यात आला. कारखान्यातील भंगार साहित्य, यंत्राचे सुटे भाग १० ते १२ कोटी रुपयांपर्यंत विक्री करण्यात आले. २०११-१२ मध्ये ५० हजार टन ऊस गाळप करुन ५२ हजार क्विंटल साखर तयार केली. बुलडाणा अर्बनने या साखरेवर जिजामाता शुगर्सचे विनय कोठारी यांना १० कोटी रुपये दिले. साखरेपैकी ३७ हजार क्विंटल साखर पोते विकून बुलडाणा अर्बनने १५ कोटी रुपये मिळविले. त्यामुळे कामगार संघटनेचे अध्यक्ष राजन चौधरी यांनी नागपूर खंडपीठात धाव घेऊन १० मे २०१२ रोजी कारखाना विक्री करार रद्द करुन शासनाच्या ताब्यात देण्यात आला. कारखान्यातील साखर हलविण्यास संघटनेचा विरोध असल्याने बुलडाणा अर्बनने उच्च न्यायालयात क्रिमिनल रिट याचिका दाखल करुन करुन न्यायालयीन लढाई जिंकली. ही बाब लक्षात येताच कामगार नेते राजन चौधरी यांनी याचिकेला आव्हान देणारी स्पेशल लिव्ह पिटीशन याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. सतत दोन वर्ष हे प्रकरण सुरु आहे. अखेर २५ फेब्रवारी रोजी न्यायमूर्ती मोहन शांतनागोदर व आर. सुभाष रेड्डी यांच्या खंडपीठाने जिजामाता साखर कारखान्यातील साखर लिलाव करुन विक्री करण्याचे आदेश दिले.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणा