शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

दिरंगाई करणारे सेतू केंद्र बंद करण्याचा प्रस्ताव सादर  करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 01:39 IST

अकोला: कर्जमाफी योजनेत थकबाकीदार शेतकर्‍यांचे  ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत दिरंगाई करणारे  दोषी सेतू केंद्र बंद करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचा  आदेश जिल्हाधिकार्‍यांनी जिल्ह्यातील तहसीलदारांना  शुक्रवारी दिला.

ठळक मुद्देकर्जमाफी जिल्हाधिकार्‍यांचा तहसीलदारांना आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कर्जमाफी योजनेत थकबाकीदार शेतकर्‍यांचे  ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत दिरंगाई करणारे  दोषी सेतू केंद्र बंद करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचा  आदेश जिल्हाधिकार्‍यांनी जिल्ह्यातील तहसीलदारांना  शुक्रवारी दिला.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत  जिल्हय़ातील महा ई-सेवा केंद्र, सामूहिक सेवा केंद्र  (सीएससी) आणि आपले सरकार केंद्र इत्यादी सेतू  केंद्रांवर कर्जमाफीसाठी थकबाकीदार शेतकर्‍यांचे  ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.  ऑनलाइन अर्ज भरण्याच्या कामात सेतू केंद्रांना  येणार्‍या अडचणींचे निवारण आणि केंद्रांविरुद्ध  तक्रारींची शहानिशा करण्यासाठी गत ५ सप्टेंबर रोजी  तांत्रिक तज्ज्ञांची तपासणी पथके गठित करण्यात  आली. त्यानुषंगाने पथकांनी ६ सप्टेंबर रोजी जिल्हय़ा तील विविध ठिकाणी सेतू केंद्रांची तपासणी केली अस ता, कर्जमाफी योजनेंतर्गत शेतकर्‍यांचे ऑनलाइन अर्ज  भरण्याच्या कामात अनियमितता आढळून आलेल्या  ११ सेतू केंद्र संचालकांना कारणे दाखवा नोटीस  बजावण्यात आली. त्यानंतर ७ सप्टेंबर रोजी आणखी   १६ सेतू केंद्र संचालकांना कारणे दाखवा नोटीस  बजावण्यात आली. त्यामध्ये तपासणीदरम्यान बंद  आढळून आलेल्या किंवा कर्जमाफीचा एकही अर्ज न  भरलेल्या सात सेतू केंद्रांना मंडळ अधिकारी आणि  तलाठय़ांनी दररोज भेटी देऊन कर्जमाफीचे ऑनलाइन  किती अर्ज भरले, किती बाकी आहेत, याबाबतची त पासणी करावी आणि कर्जमाफीचे अर्ज भरण्यात  दिरंगाई करणारे, बंद आढळून येणारे दोषी सेतू केंद्र बंद  करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचा आदेश  जिल्हाधिकार्‍यांनी जिल्ह्यातील सातही तहसीलदारांना  दिला.

सुटीच्या दिवशीही कर्जमाफीचे अर्ज भरण्याचे काम  सुरू! शनिवार आणि रविवार दोन दिवस शासकीय सुटी  असली, तरी सुटीचे दोन्ही दिवस जिल्ह्यात  कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्याचे काम सेतू  केंद्रांवर सुरू राहणार आहे. यासंदर्भात शुक्रवारी  जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी जिल्ह्या तील तहसीलदारांना आदेश दिला आहे.

१ लाख ३८ हजार शेतकर्‍यांनी भरले कर्जमाफीचे  अर्ज!कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात ८ सप्टेंबर रोजी  सायंकाळपर्यंंत १ लाख ७१ हजार १८८ शेतकर्‍यांच्या  अर्जांंची नोंदणी करण्यात आली असून, १ लाख ३८  हजार ५४८ शेतकर्‍यांचे कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज  भरण्यात आले, असे अपर जिल्हाधिकारी राजेश खवले  यांनी सांगितले.