शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

दिरंगाई करणारे सेतू केंद्र बंद करण्याचा प्रस्ताव सादर  करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 01:39 IST

अकोला: कर्जमाफी योजनेत थकबाकीदार शेतकर्‍यांचे  ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत दिरंगाई करणारे  दोषी सेतू केंद्र बंद करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचा  आदेश जिल्हाधिकार्‍यांनी जिल्ह्यातील तहसीलदारांना  शुक्रवारी दिला.

ठळक मुद्देकर्जमाफी जिल्हाधिकार्‍यांचा तहसीलदारांना आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कर्जमाफी योजनेत थकबाकीदार शेतकर्‍यांचे  ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत दिरंगाई करणारे  दोषी सेतू केंद्र बंद करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचा  आदेश जिल्हाधिकार्‍यांनी जिल्ह्यातील तहसीलदारांना  शुक्रवारी दिला.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत  जिल्हय़ातील महा ई-सेवा केंद्र, सामूहिक सेवा केंद्र  (सीएससी) आणि आपले सरकार केंद्र इत्यादी सेतू  केंद्रांवर कर्जमाफीसाठी थकबाकीदार शेतकर्‍यांचे  ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.  ऑनलाइन अर्ज भरण्याच्या कामात सेतू केंद्रांना  येणार्‍या अडचणींचे निवारण आणि केंद्रांविरुद्ध  तक्रारींची शहानिशा करण्यासाठी गत ५ सप्टेंबर रोजी  तांत्रिक तज्ज्ञांची तपासणी पथके गठित करण्यात  आली. त्यानुषंगाने पथकांनी ६ सप्टेंबर रोजी जिल्हय़ा तील विविध ठिकाणी सेतू केंद्रांची तपासणी केली अस ता, कर्जमाफी योजनेंतर्गत शेतकर्‍यांचे ऑनलाइन अर्ज  भरण्याच्या कामात अनियमितता आढळून आलेल्या  ११ सेतू केंद्र संचालकांना कारणे दाखवा नोटीस  बजावण्यात आली. त्यानंतर ७ सप्टेंबर रोजी आणखी   १६ सेतू केंद्र संचालकांना कारणे दाखवा नोटीस  बजावण्यात आली. त्यामध्ये तपासणीदरम्यान बंद  आढळून आलेल्या किंवा कर्जमाफीचा एकही अर्ज न  भरलेल्या सात सेतू केंद्रांना मंडळ अधिकारी आणि  तलाठय़ांनी दररोज भेटी देऊन कर्जमाफीचे ऑनलाइन  किती अर्ज भरले, किती बाकी आहेत, याबाबतची त पासणी करावी आणि कर्जमाफीचे अर्ज भरण्यात  दिरंगाई करणारे, बंद आढळून येणारे दोषी सेतू केंद्र बंद  करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचा आदेश  जिल्हाधिकार्‍यांनी जिल्ह्यातील सातही तहसीलदारांना  दिला.

सुटीच्या दिवशीही कर्जमाफीचे अर्ज भरण्याचे काम  सुरू! शनिवार आणि रविवार दोन दिवस शासकीय सुटी  असली, तरी सुटीचे दोन्ही दिवस जिल्ह्यात  कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्याचे काम सेतू  केंद्रांवर सुरू राहणार आहे. यासंदर्भात शुक्रवारी  जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी जिल्ह्या तील तहसीलदारांना आदेश दिला आहे.

१ लाख ३८ हजार शेतकर्‍यांनी भरले कर्जमाफीचे  अर्ज!कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात ८ सप्टेंबर रोजी  सायंकाळपर्यंंत १ लाख ७१ हजार १८८ शेतकर्‍यांच्या  अर्जांंची नोंदणी करण्यात आली असून, १ लाख ३८  हजार ५४८ शेतकर्‍यांचे कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज  भरण्यात आले, असे अपर जिल्हाधिकारी राजेश खवले  यांनी सांगितले.