शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

दिरंगाई करणारे सेतू केंद्र बंद करण्याचा प्रस्ताव सादर  करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 01:39 IST

अकोला: कर्जमाफी योजनेत थकबाकीदार शेतकर्‍यांचे  ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत दिरंगाई करणारे  दोषी सेतू केंद्र बंद करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचा  आदेश जिल्हाधिकार्‍यांनी जिल्ह्यातील तहसीलदारांना  शुक्रवारी दिला.

ठळक मुद्देकर्जमाफी जिल्हाधिकार्‍यांचा तहसीलदारांना आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कर्जमाफी योजनेत थकबाकीदार शेतकर्‍यांचे  ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत दिरंगाई करणारे  दोषी सेतू केंद्र बंद करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचा  आदेश जिल्हाधिकार्‍यांनी जिल्ह्यातील तहसीलदारांना  शुक्रवारी दिला.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत  जिल्हय़ातील महा ई-सेवा केंद्र, सामूहिक सेवा केंद्र  (सीएससी) आणि आपले सरकार केंद्र इत्यादी सेतू  केंद्रांवर कर्जमाफीसाठी थकबाकीदार शेतकर्‍यांचे  ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.  ऑनलाइन अर्ज भरण्याच्या कामात सेतू केंद्रांना  येणार्‍या अडचणींचे निवारण आणि केंद्रांविरुद्ध  तक्रारींची शहानिशा करण्यासाठी गत ५ सप्टेंबर रोजी  तांत्रिक तज्ज्ञांची तपासणी पथके गठित करण्यात  आली. त्यानुषंगाने पथकांनी ६ सप्टेंबर रोजी जिल्हय़ा तील विविध ठिकाणी सेतू केंद्रांची तपासणी केली अस ता, कर्जमाफी योजनेंतर्गत शेतकर्‍यांचे ऑनलाइन अर्ज  भरण्याच्या कामात अनियमितता आढळून आलेल्या  ११ सेतू केंद्र संचालकांना कारणे दाखवा नोटीस  बजावण्यात आली. त्यानंतर ७ सप्टेंबर रोजी आणखी   १६ सेतू केंद्र संचालकांना कारणे दाखवा नोटीस  बजावण्यात आली. त्यामध्ये तपासणीदरम्यान बंद  आढळून आलेल्या किंवा कर्जमाफीचा एकही अर्ज न  भरलेल्या सात सेतू केंद्रांना मंडळ अधिकारी आणि  तलाठय़ांनी दररोज भेटी देऊन कर्जमाफीचे ऑनलाइन  किती अर्ज भरले, किती बाकी आहेत, याबाबतची त पासणी करावी आणि कर्जमाफीचे अर्ज भरण्यात  दिरंगाई करणारे, बंद आढळून येणारे दोषी सेतू केंद्र बंद  करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचा आदेश  जिल्हाधिकार्‍यांनी जिल्ह्यातील सातही तहसीलदारांना  दिला.

सुटीच्या दिवशीही कर्जमाफीचे अर्ज भरण्याचे काम  सुरू! शनिवार आणि रविवार दोन दिवस शासकीय सुटी  असली, तरी सुटीचे दोन्ही दिवस जिल्ह्यात  कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्याचे काम सेतू  केंद्रांवर सुरू राहणार आहे. यासंदर्भात शुक्रवारी  जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी जिल्ह्या तील तहसीलदारांना आदेश दिला आहे.

१ लाख ३८ हजार शेतकर्‍यांनी भरले कर्जमाफीचे  अर्ज!कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात ८ सप्टेंबर रोजी  सायंकाळपर्यंंत १ लाख ७१ हजार १८८ शेतकर्‍यांच्या  अर्जांंची नोंदणी करण्यात आली असून, १ लाख ३८  हजार ५४८ शेतकर्‍यांचे कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज  भरण्यात आले, असे अपर जिल्हाधिकारी राजेश खवले  यांनी सांगितले.