प्रवीण खेत/अकोला : वाचन, लेखन आणि गणन या मूलभूत अध्ययन क्षमता विद्यार्थ्यांच्या प्राथमिक शिक्षणातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मोफत व सक्तीचे तसेच दज्रेदार शिक्षण देण्यात येत आहे. परंतु, असे असतानाही अध्ययन संपादनामध्ये राज्यातील शैक्षणिक दर्जा खालावत असल्याचे समोर आले आहे. राज्यातील विद्यार्थ्यांंची अध्ययन संपादन पातळी तपासण्यासाठी राज्य स्तरावर अध्ययन संपादणूक सर्वेक्षण करण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्तरावर शिक्षणाचे आरोग्य तपासण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) नवी दिल्लीमार्फत २00१ पासून इयत्ता तिसरी, पाचवी आणि आठवी आदी वर्गांंचे टप्प्याटप्प्याने अध्ययन करून सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणाच्या आधारे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा अहवाल प्रसिद्ध करण्यात येत आहे. याच धर्तीवर राज्यातील शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत राज्यातील सर्व जिलंच्या अध्ययन संपादन पातळीचा स्तर तपासण्यात येणार असून, भाषा व गणित या विषयावर भर देण्यात येणार आहे. या सर्वेक्षणामध्ये इयत्ता दुसरी ते आठवीमधील विद्यार्थ्यांंचे संपादणूक सर्वेक्षण महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद करणार आहे, तर इयत्ता ९ वी ते १0 वीचे अध्ययन संपादणूक सर्वेक्षण महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ करणार आहे. सर्वेक्षणाची व्याप्ती व र्मयादा विचारात घेऊन कृती कार्यक्रमाचे वेळापत्रक तयार करण्यात येणार असून, त्यासाठी संबंधित संस्थांना सर्वेक्षण समितीची मान्यता घ्यावी लागणार आहे.
राज्यात विद्यार्थ्यांची होणार गुणवत्ता चाचणी
By admin | Updated: July 15, 2015 23:50 IST