शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

विद्यार्थ्यांनी वन्य प्राण्यांच्या वेशभूषेत दिले जनता दरबारात पालकमंत्र्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 12:52 IST

अकोला: जनता दरबाराच्या माध्यमातून पालकमंत्री डॉ. रणजित पाटील हे जनतेच्या समस्या जाणून घेतात अन् त्या निकाली काढण्याचा प्रयत्न करतात; पण सोमवारी चक्क वन्य प्राण्यांनी पालकमंत्र्यांना निवेदन दिल्याने सर्वच थक्क झाले.

अकोला: जनता दरबाराच्या माध्यमातून पालकमंत्री डॉ. रणजित पाटील हे जनतेच्या समस्या जाणून घेतात अन् त्या निकाली काढण्याचा प्रयत्न करतात; पण सोमवारी चक्क वन्य प्राण्यांनी पालकमंत्र्यांना निवेदन दिल्याने सर्वच थक्क झाले. त्यांची समस्या होती ती जंगलातील पाणी टंचाई, चारा प्रश्न अन् रस्ते अपघात.नेहमीप्रमाणे सोमवारी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या जनता दरबाराला सुरुवात झाली. आपल्या विविध समस्यांना घेऊन नागरिक पालकमंत्र्यांसमोर हजर झाले. त्यांची गºहाणे ऐकून त्या सोडविण्याची कार्यवाही सुरू झाली, तोच काही विद्यार्थ्यांनी वन्य प्राण्यांच्या वेशभूषेत या जनता दरबारात प्रवेश केला. त्यांच्या आगमनामुळे सर्वांचे लक्ष वेधल्या गेले. दुष्काळ आणि मानवी हस्तक्षेपामुळे जंगलात राहणे अवघड झाले. दुष्काळी परिस्थितीत मानवी वस्त्यांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो. शहरातील पाळीव प्राण्यांसाठी योग्य अन्नाची सुविधा असते. गुरा-ढोरांसाठी चारा छावण्यासुद्धा शासनातर्फे चालविल्या जातात; परंतु याच काळात वन्य प्राण्यांचे जंगलात जगणे अवघड झाल्याची तक्रार यावेळी वन्य प्राण्यांनी केली. मानवी हस्तक्षेपामुळे धोक्यात आलेली आमची निवासस्थाने अन्न, पाण्यासाठी सैरभैर फिरताना होणारे अपघात यासह इतर अन्यायाची गाºहाणी यावेळी वन्य प्राण्यांनी पालकमंत्री डॉ. पाटील यांच्याकडे मांडली. यावेळी त्यांनी पालकमंत्री डॉ. पाटील यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले व सभागृहातून परतीचा मार्ग धरला.या विद्यार्थ्यांनी साकारली वन्य प्राण्यांची वेशभूषाजानवी राठी, कृष्णा अटल, महक अग्रवाल, चिराग राठी, अथर्व लोखंडे या विद्यार्थ्यांनी वन्य प्राण्यांची वेशभूषा साकारली होती. या प्रसंगी न्यू विदर्भ फाउंडेशनचे आदित्य दामले, ललित यावलकर, सतीश वानरे, राकेश शर्मा, सतीश फाले, विकास मोळके, सूरज पातोंड, सूरज टापरे, वैभव धुळे, श्रीकांत आमले, सौरभ भगत आणि रणजित राठोड यांच्यासह सदस्यांची उपस्थिती होती.या आहेत मागण्या

  1. कृत्रिम पाणवठ्यांद्वारे पिण्याच्या पाण्याची सोय करावी.
  2. मानवी अतिक्रमणापासून रक्षण करावे.
  3. अन्न पाण्यासाठी स्थलांतर करताना महामार्गावर होणारे वन्य प्राण्यांचे अपघात रोखण्यासाठी उपयोजना कराव्यात.
  4. सुरक्षित अधिवासाची सोय करावी.

वन्य प्राण्यांनाही तारीखच मिळणार का?पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात येणाऱ्या अनेकांना तारखा दिल्या जातात; परंतु यंदा विद्यार्थी चक्क वन्य प्राण्यांच्या वेशभूषेत दाखल झाले. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनादेखील तारीख दिली जाणार का, असा प्रश्न या प्रसंगी उपस्थित होत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Ranjit patilडॉ. रणजित पाटील