शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
2
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
4
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
5
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
6
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
7
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
8
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
9
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
10
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
11
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
12
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
13
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
14
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
15
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
16
दीर्घकालीन कोमातील रुग्ण आणि दयामरणाचे वास्तव
17
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
18
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
19
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
20
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी वन्य प्राण्यांच्या वेशभूषेत दिले जनता दरबारात पालकमंत्र्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 12:52 IST

अकोला: जनता दरबाराच्या माध्यमातून पालकमंत्री डॉ. रणजित पाटील हे जनतेच्या समस्या जाणून घेतात अन् त्या निकाली काढण्याचा प्रयत्न करतात; पण सोमवारी चक्क वन्य प्राण्यांनी पालकमंत्र्यांना निवेदन दिल्याने सर्वच थक्क झाले.

अकोला: जनता दरबाराच्या माध्यमातून पालकमंत्री डॉ. रणजित पाटील हे जनतेच्या समस्या जाणून घेतात अन् त्या निकाली काढण्याचा प्रयत्न करतात; पण सोमवारी चक्क वन्य प्राण्यांनी पालकमंत्र्यांना निवेदन दिल्याने सर्वच थक्क झाले. त्यांची समस्या होती ती जंगलातील पाणी टंचाई, चारा प्रश्न अन् रस्ते अपघात.नेहमीप्रमाणे सोमवारी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या जनता दरबाराला सुरुवात झाली. आपल्या विविध समस्यांना घेऊन नागरिक पालकमंत्र्यांसमोर हजर झाले. त्यांची गºहाणे ऐकून त्या सोडविण्याची कार्यवाही सुरू झाली, तोच काही विद्यार्थ्यांनी वन्य प्राण्यांच्या वेशभूषेत या जनता दरबारात प्रवेश केला. त्यांच्या आगमनामुळे सर्वांचे लक्ष वेधल्या गेले. दुष्काळ आणि मानवी हस्तक्षेपामुळे जंगलात राहणे अवघड झाले. दुष्काळी परिस्थितीत मानवी वस्त्यांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो. शहरातील पाळीव प्राण्यांसाठी योग्य अन्नाची सुविधा असते. गुरा-ढोरांसाठी चारा छावण्यासुद्धा शासनातर्फे चालविल्या जातात; परंतु याच काळात वन्य प्राण्यांचे जंगलात जगणे अवघड झाल्याची तक्रार यावेळी वन्य प्राण्यांनी केली. मानवी हस्तक्षेपामुळे धोक्यात आलेली आमची निवासस्थाने अन्न, पाण्यासाठी सैरभैर फिरताना होणारे अपघात यासह इतर अन्यायाची गाºहाणी यावेळी वन्य प्राण्यांनी पालकमंत्री डॉ. पाटील यांच्याकडे मांडली. यावेळी त्यांनी पालकमंत्री डॉ. पाटील यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले व सभागृहातून परतीचा मार्ग धरला.या विद्यार्थ्यांनी साकारली वन्य प्राण्यांची वेशभूषाजानवी राठी, कृष्णा अटल, महक अग्रवाल, चिराग राठी, अथर्व लोखंडे या विद्यार्थ्यांनी वन्य प्राण्यांची वेशभूषा साकारली होती. या प्रसंगी न्यू विदर्भ फाउंडेशनचे आदित्य दामले, ललित यावलकर, सतीश वानरे, राकेश शर्मा, सतीश फाले, विकास मोळके, सूरज पातोंड, सूरज टापरे, वैभव धुळे, श्रीकांत आमले, सौरभ भगत आणि रणजित राठोड यांच्यासह सदस्यांची उपस्थिती होती.या आहेत मागण्या

  1. कृत्रिम पाणवठ्यांद्वारे पिण्याच्या पाण्याची सोय करावी.
  2. मानवी अतिक्रमणापासून रक्षण करावे.
  3. अन्न पाण्यासाठी स्थलांतर करताना महामार्गावर होणारे वन्य प्राण्यांचे अपघात रोखण्यासाठी उपयोजना कराव्यात.
  4. सुरक्षित अधिवासाची सोय करावी.

वन्य प्राण्यांनाही तारीखच मिळणार का?पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात येणाऱ्या अनेकांना तारखा दिल्या जातात; परंतु यंदा विद्यार्थी चक्क वन्य प्राण्यांच्या वेशभूषेत दाखल झाले. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनादेखील तारीख दिली जाणार का, असा प्रश्न या प्रसंगी उपस्थित होत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Ranjit patilडॉ. रणजित पाटील