शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
2
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
3
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
4
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
5
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
6
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
7
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
8
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
9
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
10
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
11
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
12
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
13
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
14
२४ तास नव्हे, अवघ्या 'इतक्या' मिनिटांचा असतो अवकाशातील दिवस! किती वेळा दिसतो सूर्योदय?
15
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
16
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
17
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
18
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
19
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?

पाण्यासाठी विद्यार्थ्यांची जीवघेणी कसरत!

By admin | Updated: July 15, 2017 01:19 IST

मूर्तिजापूर : पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने विद्यार्थ्यांना पाण्यासाठी दररोज जीवघेणी कसरत करावी लागत असल्याचा प्रकार आदर्श ग्राम कोळंबीच्या शाळेत उजेडात आला आहे.

गणेश मापारी । लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : गाव आदर्श... गावातील शाळाही डिजिटल; मात्र पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने विद्यार्थ्यांना पाण्यासाठी दररोज जीवघेणी कसरत करावी लागत असल्याचा प्रकार आदर्श ग्राम कोळंबीच्या शाळेत उजेडात आला आहे.कोळंबी येथील जिल्हा परिषदेची प्राथमिक व माध्यमिक शाळा राष्ट्रीय महामार्गाला लागून असल्याने अपघाताच्या भीतीमुळे ही शाळा इतरत्र हलविण्याची मागणी पालकांनी केली. त्यामुळे गावापासून एक कि.मी. अंतरावर शाळेसाठी नवीन इमारत बांधण्यात आली आहे. शाळेतच पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून सर्व शिक्षा अभियानांतर्गत शाळेच्या आवारातच कूपनलिका (बोअर) करण्यात आली; परंतु पाणीच न लागल्याने ही बोअर ‘फेल’ गेली. त्यानंतर शाळा व्यवस्थापनाने जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडे पाण्याची पर्यायी व्यवस्था करून देण्याबाबत अनेकदा पत्रव्यवहार केला; मात्र सर्व शिक्षा अभियानांतर्गत बोअर करण्यात आल्याने पाण्यासाठी दुसरी कोणतीही योजना शाळेसाठी देण्यात येणार नसल्याची भूमिका पाणीपुरवठा विभागाने घेतली. स्थानिक ग्रामपंचायतनेही शाळेत पाण्याची व्यवस्था व्हावी, यासाठी ठोस उपाययोजना केलेली नाही. परिणामी, विद्यार्थी व शिक्षकांना दररोज पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. शाळेत विद्यार्थ्यांना दररोज शालेय पोषण आहाराचे वाटप करावे लागते. त्यामुळे आहार तयार करण्यासाठी शाळेत येताच विद्यार्थ्यांना पाण्याची सोय करावी लागते. शाळेपासून थोड्या अंतरावर खांबोरा पाणीपुरवठा योजनेची पाइपलाइन टाकली आहे. या योजनेच्या लिकेजमधून विद्यार्थी दररोज पाणी आणतात. विशेष म्हणजे, पाणी आणण्यासाठी विद्यार्थ्यांना तारांच्या कुंपणातून मार्ग काढावा लागतो. पिण्याच्या पाण्यासाठी विद्यार्थ्यांना दररोज जीवघेणी कसरत करावी लागत असली, तरी शिक्षण विभाग आणि ग्रामपंचायतीचे या प्रकाराकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.गुरुजींचीही पायपीटशालेय पोषण आहार नियमित तयार करावा लागत असल्याने गुरुजींनाही पाण्यासाठी पायपीट करावी लागते. यापूर्वी अनेक महिने परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातून पाण्याची सोय करण्यातच शिक्षकांचा बराच वेळ जात असल्याचे येथील विद्यार्थ्यांच्या पालकांनी सांगितले आहे. आजही विद्यार्थी आणि शिक्षक दररोज सोबतच शाळेत पाणी आणण्याचे काम करीत आहेत. शाळेतच पाण्याची सोय असावी, यासाठी ग्रामपंचायत आणि वरिष्ठ कार्यालयांकडे अनेकदा पाठपुरावा केला आहे. शाळेत पाणी नसल्याने नाइलाजास्तव विद्यार्थी व शिक्षकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागती.- नितीन बंडावार,प्रभारी मुख्याध्यापक, जि. प. शाळा, कोळंबी.