शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

पाण्यासाठी विद्यार्थ्यांची जीवघेणी कसरत!

By admin | Updated: July 15, 2017 01:19 IST

मूर्तिजापूर : पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने विद्यार्थ्यांना पाण्यासाठी दररोज जीवघेणी कसरत करावी लागत असल्याचा प्रकार आदर्श ग्राम कोळंबीच्या शाळेत उजेडात आला आहे.

गणेश मापारी । लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : गाव आदर्श... गावातील शाळाही डिजिटल; मात्र पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने विद्यार्थ्यांना पाण्यासाठी दररोज जीवघेणी कसरत करावी लागत असल्याचा प्रकार आदर्श ग्राम कोळंबीच्या शाळेत उजेडात आला आहे.कोळंबी येथील जिल्हा परिषदेची प्राथमिक व माध्यमिक शाळा राष्ट्रीय महामार्गाला लागून असल्याने अपघाताच्या भीतीमुळे ही शाळा इतरत्र हलविण्याची मागणी पालकांनी केली. त्यामुळे गावापासून एक कि.मी. अंतरावर शाळेसाठी नवीन इमारत बांधण्यात आली आहे. शाळेतच पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून सर्व शिक्षा अभियानांतर्गत शाळेच्या आवारातच कूपनलिका (बोअर) करण्यात आली; परंतु पाणीच न लागल्याने ही बोअर ‘फेल’ गेली. त्यानंतर शाळा व्यवस्थापनाने जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडे पाण्याची पर्यायी व्यवस्था करून देण्याबाबत अनेकदा पत्रव्यवहार केला; मात्र सर्व शिक्षा अभियानांतर्गत बोअर करण्यात आल्याने पाण्यासाठी दुसरी कोणतीही योजना शाळेसाठी देण्यात येणार नसल्याची भूमिका पाणीपुरवठा विभागाने घेतली. स्थानिक ग्रामपंचायतनेही शाळेत पाण्याची व्यवस्था व्हावी, यासाठी ठोस उपाययोजना केलेली नाही. परिणामी, विद्यार्थी व शिक्षकांना दररोज पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. शाळेत विद्यार्थ्यांना दररोज शालेय पोषण आहाराचे वाटप करावे लागते. त्यामुळे आहार तयार करण्यासाठी शाळेत येताच विद्यार्थ्यांना पाण्याची सोय करावी लागते. शाळेपासून थोड्या अंतरावर खांबोरा पाणीपुरवठा योजनेची पाइपलाइन टाकली आहे. या योजनेच्या लिकेजमधून विद्यार्थी दररोज पाणी आणतात. विशेष म्हणजे, पाणी आणण्यासाठी विद्यार्थ्यांना तारांच्या कुंपणातून मार्ग काढावा लागतो. पिण्याच्या पाण्यासाठी विद्यार्थ्यांना दररोज जीवघेणी कसरत करावी लागत असली, तरी शिक्षण विभाग आणि ग्रामपंचायतीचे या प्रकाराकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.गुरुजींचीही पायपीटशालेय पोषण आहार नियमित तयार करावा लागत असल्याने गुरुजींनाही पाण्यासाठी पायपीट करावी लागते. यापूर्वी अनेक महिने परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातून पाण्याची सोय करण्यातच शिक्षकांचा बराच वेळ जात असल्याचे येथील विद्यार्थ्यांच्या पालकांनी सांगितले आहे. आजही विद्यार्थी आणि शिक्षक दररोज सोबतच शाळेत पाणी आणण्याचे काम करीत आहेत. शाळेतच पाण्याची सोय असावी, यासाठी ग्रामपंचायत आणि वरिष्ठ कार्यालयांकडे अनेकदा पाठपुरावा केला आहे. शाळेत पाणी नसल्याने नाइलाजास्तव विद्यार्थी व शिक्षकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागती.- नितीन बंडावार,प्रभारी मुख्याध्यापक, जि. प. शाळा, कोळंबी.