शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी विद्यार्थ्यांची जीवघेणी कसरत!

By admin | Updated: July 15, 2017 01:19 IST

मूर्तिजापूर : पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने विद्यार्थ्यांना पाण्यासाठी दररोज जीवघेणी कसरत करावी लागत असल्याचा प्रकार आदर्श ग्राम कोळंबीच्या शाळेत उजेडात आला आहे.

गणेश मापारी । लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : गाव आदर्श... गावातील शाळाही डिजिटल; मात्र पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने विद्यार्थ्यांना पाण्यासाठी दररोज जीवघेणी कसरत करावी लागत असल्याचा प्रकार आदर्श ग्राम कोळंबीच्या शाळेत उजेडात आला आहे.कोळंबी येथील जिल्हा परिषदेची प्राथमिक व माध्यमिक शाळा राष्ट्रीय महामार्गाला लागून असल्याने अपघाताच्या भीतीमुळे ही शाळा इतरत्र हलविण्याची मागणी पालकांनी केली. त्यामुळे गावापासून एक कि.मी. अंतरावर शाळेसाठी नवीन इमारत बांधण्यात आली आहे. शाळेतच पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून सर्व शिक्षा अभियानांतर्गत शाळेच्या आवारातच कूपनलिका (बोअर) करण्यात आली; परंतु पाणीच न लागल्याने ही बोअर ‘फेल’ गेली. त्यानंतर शाळा व्यवस्थापनाने जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडे पाण्याची पर्यायी व्यवस्था करून देण्याबाबत अनेकदा पत्रव्यवहार केला; मात्र सर्व शिक्षा अभियानांतर्गत बोअर करण्यात आल्याने पाण्यासाठी दुसरी कोणतीही योजना शाळेसाठी देण्यात येणार नसल्याची भूमिका पाणीपुरवठा विभागाने घेतली. स्थानिक ग्रामपंचायतनेही शाळेत पाण्याची व्यवस्था व्हावी, यासाठी ठोस उपाययोजना केलेली नाही. परिणामी, विद्यार्थी व शिक्षकांना दररोज पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. शाळेत विद्यार्थ्यांना दररोज शालेय पोषण आहाराचे वाटप करावे लागते. त्यामुळे आहार तयार करण्यासाठी शाळेत येताच विद्यार्थ्यांना पाण्याची सोय करावी लागते. शाळेपासून थोड्या अंतरावर खांबोरा पाणीपुरवठा योजनेची पाइपलाइन टाकली आहे. या योजनेच्या लिकेजमधून विद्यार्थी दररोज पाणी आणतात. विशेष म्हणजे, पाणी आणण्यासाठी विद्यार्थ्यांना तारांच्या कुंपणातून मार्ग काढावा लागतो. पिण्याच्या पाण्यासाठी विद्यार्थ्यांना दररोज जीवघेणी कसरत करावी लागत असली, तरी शिक्षण विभाग आणि ग्रामपंचायतीचे या प्रकाराकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.गुरुजींचीही पायपीटशालेय पोषण आहार नियमित तयार करावा लागत असल्याने गुरुजींनाही पाण्यासाठी पायपीट करावी लागते. यापूर्वी अनेक महिने परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातून पाण्याची सोय करण्यातच शिक्षकांचा बराच वेळ जात असल्याचे येथील विद्यार्थ्यांच्या पालकांनी सांगितले आहे. आजही विद्यार्थी आणि शिक्षक दररोज सोबतच शाळेत पाणी आणण्याचे काम करीत आहेत. शाळेतच पाण्याची सोय असावी, यासाठी ग्रामपंचायत आणि वरिष्ठ कार्यालयांकडे अनेकदा पाठपुरावा केला आहे. शाळेत पाणी नसल्याने नाइलाजास्तव विद्यार्थी व शिक्षकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागती.- नितीन बंडावार,प्रभारी मुख्याध्यापक, जि. प. शाळा, कोळंबी.