शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

कोरोना काळात विद्यार्थ्यांना मिळेना ‘स्वाधार’चा आधार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:19 IST

संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये आणि वसतिगृहे अद्याप बंद असल्याने, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब ...

संतोष येलकर

लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये आणि वसतिगृहे अद्याप बंद असल्याने, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकडून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया गतवर्षीपासून बंद आहे. त्यामुळे कोरोना काळात विद्यार्थ्यांना ‘स्वाधार ’ योजनेचा आधार मिळत नसल्याने, अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया केव्हा सुरु होणार, याची जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकडून प्रतीक्षा केली जात आहे.

इयत्ता अकरावी ते पुढील उच्चशिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी शासनामार्फत ‘भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना’ राबविण्यात येते. या योजनेंतर्गत अर्ज केलेल्या पात्र विद्यार्थ्यांना निवास, भोजन भत्त्यासह शैक्षणिक साहित्याचा खर्च भागविण्यासाठी प्रतिवर्ष ४३ हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते. ही अर्थसहाय्याची रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात येते. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये आणि वसतिगृहे अद्याप बंद असल्याने २०२०-२१ आणि २०२१-२२ या वर्षीच्या शैक्षणिक सत्रात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकडून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया अद्याप बंद आहे. त्यामुळे कोरोना काळात गतवर्षीपासून विद्यार्थ्यांना ‘स्वाधार’चा आधार मिळत नसल्याची स्थिती आहे. त्या अनुषंगाने ‘स्वाधार’ योजनेंतर्गत अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया समाजकल्याण विभागामार्फत केव्हा सुरु होणार, याबाबत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकडून प्रतीक्षा केली जात आहे.

समाजकल्याण आयुक्त, प्रादेशिक उपायुक्तांकडून मागवले मार्गदर्शन!

भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत २०२१-२२ या वर्षात जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकडून अर्ज स्वीकारण्यासंदर्भात समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयामार्फत समाजकल्याण विभागाचे आयुक्त आणि अमरावती विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त कार्यालयाकडून मार्गदर्शन मागविण्यात आले आहे.

.............................................

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये आणि वसतिगृहे अद्याप बंद असून, स्वाधार योजनेंतर्गत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकडून अर्ज स्वीकारण्याबाबत समाजकल्याण विभागाकडून निर्देश प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली नाही. अर्ज स्वीकारण्यासंदर्भात समाजकल्याण विभागाचे आयुक्त व प्रादेशिक उपायुक्तांकडून मार्गदर्शन मागविण्यात आले आहे.

-पियुष चव्हाण

सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण विभाग, अकोला.