शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

पंचविशीच्या आतील विद्यार्थ्यांना लढविता येणार महाविद्यालयीन निवडणूक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 12:05 IST

२५ वर्षे वयाच्या आतीलच विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन निवडणुकीच्या रिंगणात उतरता येणार आहे.

अकोला: तब्बल २९ वर्षांनंतर राज्यातील वरिष्ठ महाविद्यालये, विद्यापीठांमध्ये छात्रसंघाच्या खुल्या पद्धतीने निवडणुका होणार आहेत; परंतु या निवडणुकीसाठी उच्च शिक्षण विभागाने जाचक अटी लादल्या आहेत. २५ वर्षे वयाच्या आतीलच विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन निवडणुकीच्या रिंगणात उतरता येणार आहे. यासोबतच विद्यार्थी हा मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाचा पूर्णवेळ विद्यार्थी असावा आणि तोही ‘एटीकेटी’ नसणारा असावा, अशी अट असल्यामुळे विद्यार्थी संघटनांच्या हेतूवर पाणी फेरल्या गेले आहे. महाविद्यालयीन निवडणुकीतील अटी व नियम अडचणीचे ठरणार असल्यामुळे विद्यार्थी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये आता खुल्या पद्धतीने निवडणुका होणार असल्यामुळे अभाविप, एनएसयूआय, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, सम्यक विद्यार्थी आंदोलन, रिविफे, एसएफआय यासारख्या विद्यार्थी संघटना कामाला लागल्या आहेत. महाविद्यालयीन निवडणुकांदरम्यान हाणामारी, उमेदवार पळविणे, हल्ला करण्यासारख्या प्रकारांना आळा घालण्याच्या दृष्टिकोनातून उच्च शिक्षण विभागाने काही नियम व अटी घातल्या आहेत. यामध्ये उमेदवार हा पंचविशीच्या आतील असावा, तो मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या नियमित व पूर्णवेळ अभ्यासक्रमाचा विद्यार्थी असावा, तो एटीकेटी घेतलेला नसावा. गुणवत्ताधारक विद्यार्थीच निवडणूक लढवू शकेल, गुन्हा दाखल असलेल्या विद्यार्थ्याला निवडणूक लढविता येणार नाही आणि एकाच वर्गात पुन्हा प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याला निवडणूक लढविता येणार नाही, असे नियम घातलेले आहेत. विशेष म्हणजे, कोणत्याही विद्यार्थी संघटनेच्या उमेदवाराला महाविद्यालय परिसरात पोस्टर, बॅनर लावता येणार नाही. विनापरवानगी भाषणबाजी करता येणार नाही. या नियमांमुळे अभाविप ही विद्यार्थी संघटना वगळता, इतर विद्यार्थी संघटनांची पंचाईत झाली आहे. प्राचार्यांनी दिलेल्या जागेवरच विद्यार्थी संघटनांच्या उमेदवारांना भूमिका मांडता येणार आहे. निवडणुकीदरम्यान महाविद्यालय परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. महाविद्यालयीन निवडणुकांची चाहूल लागल्यामुळे विद्यार्थी संघटना कामाला लागल्या आहेत. उमेदवारांची चाचपणी विद्यार्थी संघटनांनी सुरू केली आहे.

गुणवत्ताधारक उमेदवारांची होणार पळवापळवी!निवडणुकीसाठी केलेल्या अटी व नियमांमुळे विद्यार्थी संघटनांची पंचाईत झाली आहे; परंतु वेळेवर धावपळ नको म्हणून विद्यार्थी संघटनांच्या नेत्यांनी आतापासून गुणवत्ताधारक, पंचविशीच्या आतील उमेदवारांचा शोध सुरू केला आहे. त्यामुळे गुणवत्ताधारक उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविण्यासाठी विद्यार्थी संघटनांमध्ये चांगलीच ओढाताण होणार आहे. एवढेच नव्हे, तर उमेदवार पळविण्याचे प्रकारसुद्धा घडणार आहेत.

विद्यार्थी मतदाराला पाच मतांचा अधिकारनिवडणुकीत विद्यार्थी मतदाराला कमाल पाच मते देण्याचा हक्क आहे. मतदार हा परिषद अध्यक्ष, सचिव, महिला प्रतिनिधी, राखीव प्रवर्गातील प्रतिनिधी आणि वर्ग प्रतिनिधी या पाच उमेदवारांना मत देऊ शकणार आहे. निवडणुकीची मतमोजणी व निकाल मतदान दिवशी तर विद्यापीठ छात्रसंघ निवडणुकीची मतमोजणी मतदानाच्या तिसऱ्या दिवशी होणार आहे.तरुणाईचा कल कोणाकडे?महाविद्यालयांमध्ये शिकणाºया तरुणांना प्रथमच महाविद्यालयीन निवडणुकीत मतदानाची संधी मिळणार आहे. त्यामुळे तरुणाईचा कल कोणत्या पक्षाच्या विद्यार्थी संघटनेकडे आहे, हे दिसून येईल. ‘एनएसयूआय’ ही काँग्रेसप्रणित, अभाविप ही भाजप व संघप्रणित, सम्यक विद्यार्थी आंदोलन ही वंचित बहुजन आघाडीप्रणित तर रिपब्लिकन विद्यार्थी परिषद ही रिपाइंप्रणित आणि एसएफआय ही डावे पक्षप्रणित विद्यार्थी संघटना आहे. युवा सेना ही शिवसेना तर मनविसे ही मनसेप्रणित संघटना आहे. त्यामुळे तरुणाईचा कल कोणत्या पक्षाकडे अधिक आहे, हे मतदानावरून स्पष्ट होईल.

 

टॅग्स :Akolaअकोलाcollegeमहाविद्यालयElectionनिवडणूक