शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यातील ६१० वर्गातील विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी विषय शिक्षकच नाहीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 14:21 IST

अकोला : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये यावर्षीपासून पाचवी आणि आठवीचे ६१० वर्ग सुरू तर झाले. त्या वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी विषय शिक्षक अद्यापही शाळांना मिळाले नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेच्या ५ वी, ८ वी वर्गांच्या शिक्षणाचा बोजवारापुढच्या वर्षी विद्यार्थी मिळवण्यासाठी शाळांना करावी लागणार कसरत

- सदानंद सिरसाटअकोला : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये यावर्षीपासून पाचवी आणि आठवीचे ६१० वर्ग सुरू तर झाले. त्या वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी विषय शिक्षक अद्यापही शाळांना मिळाले नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरीकडे हा प्रकार पुढच्या वर्षी खासगी शाळांच्या पथ्यावर पडण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांना शिक्षकच नसल्याने पुढच्या वर्षी विद्यार्थी मिळवण्याची कसरत जिल्हा परिषद शाळांना करावी लागणार आहे.शासनाने २ जुलै २०१३ रोजीच इयत्ता पहिली ते चौथीच्या शाळांना पाचवी आणि इयत्ता पहिली ते सातवीच्या शाळांमध्ये इयत्ता आठवीचा वर्ग सुरू करण्याचा आदेश दिला. बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्याचे शासनावर बंधनकारक आहे. त्यातही शिक्षण प्रणालीत इयत्ता पहिली ते पाचवी आणि इयत्ता सहावी ते आठवी अशी संरचना अस्तित्वात आली. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीने ६ मार्च २०१७ रोजी झालेल्या बैठकीत ठराव घेत ६१० नव्या वर्गांची निर्मिती केली.ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या काही शाळा चांगल्या दर्जासोबतच सेमी इंग्लिश झाल्या आहेत. त्या शाळांतून सातवी उत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांनी तेथेच इयत्ता आठवीमध्ये प्रवेश घेतला, तर चवथीतून उत्तीर्ण झालेल्यांनी त्याच ठिकाणी पाचवीमध्ये प्रवेश घेतला. त्यातून जिल्हा परिषदेच्या इयत्ता चौथीपर्यंत असलेल्या शाळांमध्ये पाचवा वर्ग जोडण्यासाठी ३५६ वर्गांची भर पडली. तर इयत्ता सातवीपर्यंतच्या शाळांमध्ये आठवा वर्ग जोडण्यासाठी २५४ वर्ग मिळून एकूण ६१० नव्या वर्गांची निर्मिती झाली. त्या वर्गांतील विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी विषय शिक्षकांची नियुक्ती करणे आवश्यक आहे; मात्र प्राथमिक शाळांमध्ये अंदाजे ५३ शिक्षकांची गरज आहे, तर आठवीसाठी शिक्षकांची संख्या निश्चित झालेली नाही.

अतिरिक्त शिक्षकांचे समायोजनही रखडले!जिल्हा परिषदेमध्ये सद्यस्थितीत शंभरपेक्षाही अधिक संख्येने शिक्षक अतिरिक्त असल्याची माहिती आहे. चालू सत्रात नव्याने निर्माण होणाºया ६१० वर्गावर या शिक्षकांना पदस्थापना देत समायोजन करण्याचा पर्याय आहे. संचमान्यता अंतिम न झाल्याने शाळांमध्ये शिक्षकांची नियुक्ती थांबल्याची माहिती आहे.विद्यार्थी पटसंख्येनुसार संचमान्यता अंतिम करण्याची कार्यवाही सुरू आहे. ती महिनाभरात पूर्ण होईल. त्यानंतरच गरजेनुसार अतिरिक्त ठरलेल्या तसेच नवीन शिक्षकांना तेथे देण्यात येईल. - प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारी प्राथमिक, जिल्हा परिषद.

टॅग्स :Akola cityअकोला शहर