शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
4
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
5
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
6
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
7
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
8
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
9
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
11
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
12
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
13
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
14
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
15
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
16
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
17
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
18
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
19
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
20
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी हजेरीसाठी ‘टिंबां’चा आधार!

By admin | Updated: April 12, 2017 02:07 IST

अकोला: शालेय पोषण आहारातील तांदळाचा मोठ्या प्रमाणात अपहार होण्याला विद्यार्थ्यांची हजेरी नोंदवहीत घेतली जाणारी नोंद कारणीभूत आहे.

अकोला: शालेय पोषण आहारातील तांदळाचा मोठ्या प्रमाणात अपहार होण्याला विद्यार्थ्यांची हजेरी नोंदवहीत घेतली जाणारी नोंद कारणीभूत आहे. त्या बळावरच मुख्याध्यापक आणि कंत्राटदाराच्या संगनमताने मोठ्या प्रमाणात तांदळाचा अपहार होत असल्याचे उघड सत्य असताना त्याकडे सर्वच यंत्रणेचे कमालीचे दुर्लक्ष आहे. ही बाब शिक्षण सभापती पुंडलिकराव अरबट यांनी दिलेल्या शाळा भेटीत स्पष्ट झाली. त्याचीही चौकशी करण्याचे आदेश गटशिक्षणाधिकारी रतनसिंग पवार यांनी दिले आहेत. बोरगावमंजू येथील मराठी शाळा क्रमांक १,२,३ या शाळांमध्ये सोमवारी सकाळीच सभापती अरबट यांनी भेट दिली. यावेळी शालेय पोषण आहाराची दैनंदिन नोंदवही सत्र सुरू झाल्यापासून भरण्यात आली नव्हती. सोबतच १० ते २६ मार्च २०१७ या काळात पोषण आहार देणे बंद होते.त्याचवेळी शालेय पोषण आहारासाठी विद्यार्थी उपस्थिती १६० दाखवण्यात आली. त्यापैकी केवळ ९९ विद्यार्थीच उपस्थित होते. त्यामुळे हजेरीमध्येही तफावत दिसून आली. १८ ते २४ मार्चदरम्यान साठा नसल्याने पोषण आहार बंद असल्याचे सांगण्यात आले. पोषण आहार सकाळी ९.३० वाजता देण्यात आला. या संपूर्ण प्रकाराचे पत्र सभापती अरबट यांनी शिक्षण विभागाला दिले. त्यानुसार अकोला तालुका पोषण आहार अधीक्षकांना चौकशीचे आदेश देण्यात आले. ६१ विद्यार्थ्यांचा आहार कोणाच्या घशात?विद्यार्थी उपस्थित नसताना त्यांचा पोषण आहार उचलला जातो. प्रत्यक्षात त्याची उचलच होत नाही. पुरवठा करणाऱ्याशी संगनमताने हा तांदूळ बाजारात विकला जातो. हजेरीपुस्तकात विद्यार्थ्यांच्या नावापुढे टिंब लिहिण्यात आले. त्याचा इंग्रजीत ए किंवा पी करून घोटाळा केला जातो. बोरगावातील ६१ विद्यार्थी गैरहजर होते. त्याचवेळी १६० विद्यार्थ्यांना पोषण आहार दिल्याचे दर्शवण्यात आले. केवळ ९९ विद्यार्थ्यांना आहार देण्यात आला. त्यामुळे ६१ विद्यार्थ्यांचा आहार कोणाच्या घशात जातो, याचा शोध आता शिक्षण विभागाला घ्यावा लागणार आहे. दरमहा २.५० क्विंटलचा अपहार बोरगावातील या शाळेचा विचार केल्यास दरडोई ठरलेल्या प्रमाणानुसार दर दिवशी किमान दहा किलो तांदूळ शिल्लक राहतो. शाळेच्या दिवसाचा विचार केल्यास दरमहा किमान २.५० क्विंटल तांदूळ शिल्लक राहतो. तो कोण फस्त करतो, याच्या मागे मोठे अर्थकारण दडलेले आहे. अकोला तालुक्यातील शाळांची संख्या पाहता त्यामध्ये शिल्लक राहणारा दरमहा किमान ३०० क्विंटल तांदूळ काळ्या बाजारात जातो.