शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
2
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
3
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
4
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
5
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
6
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
7
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
8
Sheetal Devi : सुवर्णवेध! हातांशिवायही अचूक निशाणा; जागतिक तिरंदाजी स्पर्धेत शीतल देवीला गोल्ड मेडल, रचला इतिहास
9
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
10
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
11
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
12
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
13
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
14
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
15
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
16
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
17
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
18
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
19
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
20
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले

जिल्ह्यात पावसाची दमदार एन्ट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 21:45 IST

मंगळवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर सलग बुधवारी दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत कायम होता. त्यामुळे पाच तालुक्यातील १४ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून जिल्ह्यात सरासरी ६२.४९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे बळीराजा सुखावला असून जिल्ह्यात पेरणीच्या कामांना वेग आला आहे.

ठळक मुद्देसरासरी ६२.४९ मि.मी. पावसाची नोंद : शहरातील अनेक वस्त्यांमध्ये साचले पाणी, बळीराजा सुखावला, तलाव बोड्यांमध्ये पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मंगळवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर सलग बुधवारी दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत कायम होता. त्यामुळे पाच तालुक्यातील १४ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून जिल्ह्यात सरासरी ६२.४९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे बळीराजा सुखावला असून जिल्ह्यात पेरणीच्या कामांना वेग आला आहे. तर पावसाळ्यापूर्वी नगर परिषदेने शहरातील नाल्यांची सफाई न केल्याने बुधवारी शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी साचले होते.त्यामुळे याचा शहरातील नागरिकांना फटका बसला. मात्र पावसामुळे कुठलीही जीवीत हानी झाली नाही.मंगळवारी रात्रीपासून पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली असून बुधवारी दुपारपर्यंत पावसाचा जोर कायम होता. तब्बल महिनाभराच्या कालावधीनंतर पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तिरोडा तालुक्यातील सरांडी गावाजवळ निर्माणाधीन पुलाशेजारील चुकीने तयार करण्यात आलेला कच्चा रस्ता व दुभाजकामुळे ट्रक पलटल्याने तिरोडा-तुमसर मार्गावरील वाहतुक विस्कळीत झाली होती.गोंदिया शहरातील गणेशनगर भागात एक घर कोसळले मात्र कुठलीही जीवीतहानी झाली नाही. मंगळवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे कुंभारेनगरातील पंचशील झेंडा चौक परिसराला तलावाचे स्वरूप आले आहे.विशेष म्हणजे दरवर्षीच या भागात ही समस्या निर्माण होते. नगर परिषदेने अद्यापही यावर उपाय योजना केली नाही. या भागातील नाल्या तुंबल्याने या भागातील रस्ते सुध्दा जलमय झाल्याचे चित्र होते. तर काही नागरिकांच्या घरात सुध्दा रस्त्यावरील पाणी साचले होते.जिल्ह्यात मागील दीड महिन्यापासून पाऊस झाला नव्हता परिणामी पेरणीची कामे पूर्णपणे खोळंबली होती.त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र मंगळवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने सर्वांना दिलास दिला आहे. दमदार पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाले भरुन वाहत होते. तर शेतांमध्ये पाणी साचले होते.नगर परिषदेची पोलखोलमंगळवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर बुधवारी दुपारपर्यंत कायम होता. त्यामुळे शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी साचले होते. तर पावसाळ्यापूर्वी नाल्यांची सफाई न केल्याने नाल्या चोख होवून नाल्यांमधील घाण पाणी रस्त्यांवरुन वाहत होते. नागरिकांनी अनेकदा याबाबत स्थानिक नगरसेवकाकडे तक्र ारी केल्या त्यानंतर त्यांनी पाहणी केली. मात्र कुठल्याच उपाय योजना केली नाही. परिणामी वॉर्डातील भय्यालाल वासनिक,अजगर अली, मुन्ना डोहरे, सुनील चव्हाण यांच्या घरासमोरील असलेल्या रस्त्यांवरून पाणी तुडूंब भरून वाहत असल्यामुळे त्यांना घराबाहेर जाणे कठिण होते. ऐवढेच नव्हे तर, त्यांच्या घरात पाणी शिरत असल्यामुळे त्यांना रात्रभर जागून काढावी लागली. त्यामुळे नगर परिषदेच्या मान्सूनपूर्व कामाची पोलखोल झाली.अतिक्रमणामुळे पाणी रस्त्यावरकुंभारेनगरातील नाल्यांवर नागरिकांनी मोठ्या काही प्रमाणात अतिक्रमण केल्यामुळे नगर परिषदेला साफसफाई करण्यासाठी त्रास होतो. नाल्यांमध्ये कचरा साचून पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे पाणी रस्त्यांवर साचून राहते. परिणामी वार्डातील रस्त्यांना तलावाचे स्वरूप प्राप्त होते. काही ठिकाणी तर चक्क गल्ल्यांवरही नागरिकांनी अतिक्र मण केल्याने गल्ल्या लहान होऊन पाणी बाहेर जात नाही. त्यामुळे दरवर्षीच कुंभारेनगर रस्त्यांवर पाणी साचते.त्यासोबतच येथील नाल्या अरूंद असल्यामुळे पाणी सरळ वाहून जाण्यास अडचण होते.अंडरग्राऊंड पूल पाण्याखालीशहरातील रेलटोली परिसरातील अंडरग्राऊंड पुलाखालून जवळपास गुडघाभर पाणी वाहात होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बुधवारी सायंकाळपर्यंत ठप्प झाली होती. अंडरग्राऊंड परिसरातून एक नाला वाहत असून या नाल्याची सफाई न केल्याने यातील पाणी या परिसरातून वाहत होते त्यामुळेच ही समस्या निर्माण झाल्याचे बोलल्या जाते.मैदानाला आले तलावाचे स्वरूपकुंभारेनगरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह परिसरात असलेल्या मैदानात लहान मुलांना खेळण्यासाठी खेळाचे साहित्य लावण्यात आले आहेत. ते साहित्य मजबूत स्थितीत बसविण्यात न आल्यामुळे अनेक साहित्य जमिनीतून उखळून पडले आहेत. त्या ठिकाणी पाणी साचून तलावाचे स्वरूप प्राप्त होते.वृक्षलागवडीचे खड्डे गेले पाण्यातशहरात नगर परिषदेच्यावतीने वृक्षलागवड मोहिमेतंर्गत वृक्षलागवड करण्यासाठी कुंभारेनगरातील मैदान परिसरात खड्डे खोदून ठेवले. मात्र, मैदानात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले. त्यामुळे या खड्डयांमध्ये वृक्षारोपण करायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे.मेडिकल व बीजीडब्ल्यूला पाण्याचा वेढामंगळवारी रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय(मेडिकल)आणि बाई गंगाबाई महिला रुग्णालयाला (बीजीडब्ल्यू) रुग्णालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.त्यामुळे या दोन्ही रुग्णालयांना पाण्याने वेढा घातल्याचे चित्र होते.सुदैवाने याचा रुग्णांना फटका बसला नाही. मात्र पावसाचा जोर कायम राहिल्यास बीजीडब्ल्यू रुग्णालयाच्या वॉर्डात पाणी साचण्याची शक्यता नाकारता येत नाही.या महसूल मंडळात अतिवृष्टीमंगळवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील २२ पैकी १४ महसूल मंडळात पावसाची अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यात दासगाव, खमारी, कामठा, नवेगावबांध, बोंडगाव, अर्जुनी मोरगाव, महागाव,केशोरी,वडेगाव, कट्टीपार, आमगाव, ठाणा, सौंदड, सडक अर्जुनी महसूल मंडळाचा समावेश आहे. तर गोंदिया ६२ मि.मी., मुंडीपार ६० मि.मी, ठाणेगाव ६३ मि.मी, तिगाव ६१.६० मि.मी., या महसूल मंडळात ६० मि.मी.पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली.तलावाला पडल्या भेगातालुक्यात दोन दिवस झालेल्या पावसामुळे गोरेगाव तालुक्यातील तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. या पावसामुळे कृषी विभागाच्या भोंगळ कारभाराची सुध्दा पोलखोल झाली. पहिल्याच पावसाने शेततळे फुटल्याने या बांधकामावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे. या सर्व कामाची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.