शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

गणेशाेत्सवात मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:24 IST

अकोला: येत्या १० सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या श्री गणेश उत्सवाच्या काळात जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेबाबत करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घेत, ...

अकोला: येत्या १० सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या श्री गणेश उत्सवाच्या काळात जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेबाबत करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घेत, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी जिल्ह्यातील संबंधित यंत्रणांना शनिवारी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात कायदा व सुव्यवस्थेसंबंधी बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डाॅ. निलेश अपार, मुकेश चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व तहसीलदार, पोलीस निरीक्षक आदी उपस्थित होते. श्री गणेश उत्सवात संबंधित यंत्रणांनी समन्वय ठेवून काम करण्याचे सांगत, गणपती मंडळांनी आवश्यक त्या परवानगी घेतल्याची खात्री करुन, परवानगी देताना शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. श्री गणेश स्थापनेच्या दिवशी गर्दी होणार नाही याबाबत दक्षता घेऊन, त्यासाठी स्थानिक पातळीवर नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिल्या.

कोरोना संकटाची जाणीव

ठेवून उपाययोजना राबवा!

गणेशोत्सव साजरा करीत असताना कोरोनाचे संकट कायम असल्याची जाणीव ठेवून, संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजना राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत वेळोवेळी आढावा घेण्यात येणार असून, कामात दिरंगाई व कामचुकारपणा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.

..............फोटो.....................