शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

ग्रामीण भागात निर्बंधांची कडक अंमलबजावणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2021 4:19 AM

अकोला : ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस, महसूल यंत्रणा व ग्रामविकास प्रशासनाने संयुक्त कारवाई करणे ...

अकोला : ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस, महसूल यंत्रणा व ग्रामविकास प्रशासनाने संयुक्त कारवाई करणे आवश्यक आहे. ग्रामस्तरीय समितीचा सहभाग घेऊन जिल्ह्यातील ग्रामीण भागात निर्बंधांची अधिक कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शुक्रवारी दिले. जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रशासनातील महत्त्वाचे घटक असलेले पोलीस स्टेशन प्रभारी, गटविकास अधिकारी ते ग्रामसेवक, तहसीलदार ते मंडळ अधिकारी, तलाठी इत्यादींसोबत जिल्हाधिकारी पापळकर यांनी ऑनलाइन पद्धतीने संवाद साधून आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार, पोलीस उपअधीक्षक सचिन कदम, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे, सदाशिव शेलार तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस स्टेशनचे प्रभारी, गटविकास अधिकारी आदी सहभागी झाले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी बाजारपेठा असलेल्या गावांमध्ये लहान लहान गावांतून लोकांची ये-जा सुरू असते, त्यावर नियंत्रण आणावे, असे निर्देश दिले. पोलीस अधिकाऱ्यांनी विनाकारण फिरणारे, दुकानांवर होणारी गर्दी, वाहतूक यावर नियंत्रण मिळवावे, असे निर्देश पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी दिले. निर्बंधांची अंमलबजावणी अधिक कडक पद्धतीने कशी करता येईल, यासाठी तालुका व उपविभागीय स्तरावर बैठक घेऊन नियोजन करावे. लग्न समारंभांवर करडी नजर ठेवावी. गावातून बाहेरगावी जाण्या-येण्यासाठी सबळ (बहुधा वैद्यकीय) कारण असल्याशिवाय परवानगी देऊ नये, असे निर्देशही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यावेळी दिले.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी बाजारपेठा असलेल्या गावांमध्ये लहान लहान गावांतून लोकांची ये-जा सुरू असते, त्यावर नियंत्रण आणावे, असे निर्देश दिले. पोलीस अधिकाऱ्यांनी विनाकारण फिरणारे, दुकानांवर होणारी गर्दी, अकारण होणारी वाहतूक यावर नियंत्रण मिळवावे, असे निर्देश पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी दिले. जिल्हाधिकारी पापळकर म्हणाले की, निर्बंधांची अंमलबजावणी अधिक कडक पद्धतीने कशी करता येईल, यासाठी तालुका व उपविभागीय स्तरावर बैठक घेऊन नियोजन करावे. आपापल्या कार्यक्षेत्रात होत असलेल्या विवाह समारंभांवर करडी नजर ठेवावी. गावातून बाहेरगावी जाण्या-येण्यासाठी सबळ (बहुधा वैद्यकीय) कारण असल्याशिवाय परवानगी देऊ नये. ज्या ज्या भागात रुग्ण आढळले त्या भागातील चाचण्या वाढविल्या पाहिजेत. प्रशासनाने निर्बंधांची कडक अंमलबजावणी केल्यास ग्रामीण भागात होत असलेला फैलाव आपण रोखू शकू, असेही जिल्हाधिकारी पापळकर यांनी सांगितले.