शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

पथदिव्यांचे ‘टायमर’ बिघडले; मुख्य रस्त्यांवर अंधार; मनपाचा विद्युत विभाग झोपेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 14:54 IST

अकोला : सत्ताधारी भाजपाच्यावतीने शहरात एलईडी पथदिव्यांचा गवगवा केला जात असला, तरी महापालिकेच्या विद्युत विभागाच्या कुचकामी धोरणामुळे मुख्य रस्ते अंधारात असल्याचे चित्र आहे. पथदिव्यांचे ‘टायमर’ बिघडल्यामुळे की काय, रस्त्यांवर दिवसा उजेड अन् रात्री अंधार पसरत असल्याची परिस्थिती आहे. मुख्य रस्त्यांवरील अंधार पाहता मनपाचा विद्युत विभाग कुंभकर्णी झोपेत असल्याचे दिसून येत ...

अकोला : सत्ताधारी भाजपाच्यावतीने शहरात एलईडी पथदिव्यांचा गवगवा केला जात असला, तरी महापालिकेच्या विद्युत विभागाच्या कुचकामी धोरणामुळे मुख्य रस्ते अंधारात असल्याचे चित्र आहे. पथदिव्यांचे ‘टायमर’ बिघडल्यामुळे की काय, रस्त्यांवर दिवसा उजेड अन् रात्री अंधार पसरत असल्याची परिस्थिती आहे. मुख्य रस्त्यांवरील अंधार पाहता मनपाचा विद्युत विभाग कुंभकर्णी झोपेत असल्याचे दिसून येत आहे.महापालिका प्रशासनाने शहरातील मुख्य मार्गावर एलईडी पथदिवे तर मुख्य ४५ चौकांमध्ये हायमस्ट पथदिवे लावण्याचा कंत्राट पुणे येथील कंपनीला दिला आहे. या कामासाठी मनपाच्या चौदाव्या वित्त आयोगातून दहा कोटी रुपये तसेच आ. रणधीर सावरकर यांनी शासनाकडून मिळविलेल्या दहा कोटी रुपयांचा समावेश आहे. एकूण २० कोटी रुपयांतून होणाºया कामात मुख्य रस्ते उजळून निघणार असून, आजवर ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी मनपाच्या विद्युत विभागाने झोननिहाय खासगी कंत्राटदारांची नियुक्ती केली असून, त्यावर देखरेख ठेवण्यासाठी आउटसोर्सिंगमार्फत नियुक्त केलेल्या कनिष्ठ अभियंत्यांवर जबाबदारी सोपविली आहे. पथदिव्यांसंदर्भात एवढा मोठा लवाजमा असताना आज रोजी मुख्य मार्गावरील पथदिवे नादुरुस्त असल्याचे चित्र समोर आले आहे. यामध्ये प्रामुख्याने निमवाडी चौक ते कमला वाशिम बायपास चौक ते थेट राष्ट्रीय महामार्गावरील किराणा बाजार, लोखंडी पूल, भांडपुरा चौक ते जुना बाळापूर रोड ते नाका, नेहरू पार्क चौक ते रामलता सेंटर, नेहरू पार्क ते सिव्हिल लाइन चौक आदींसह अंतर्गत रस्त्यांचा समावेश आहे.विद्युत विभागाचा कारभार ढेपाळला!शहरात क ोट्यवधी रुपये खर्च करून एलईडी पथदिवे, हायमस्ट लाइट लावल्या जात आहेत. देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली महापालिकेच्या विद्युत विभागाने विविध कंत्राटदारांची नियुक्ती करून जाणीवपूर्वक गोंधळाची स्थिती निर्माण केल्याचे दिसून येते. या विभागासाठी आउटसोर्सिंगच्या माध्यमातून कनिष्ठ अभियंत्यांची नियुक्ती केली असली, तरी एकूण चित्र पाहता विद्युत विभागाचा कारभार ढेपाळल्याचे चित्र आहे.नागरिकांमध्ये सत्ताधाºयांप्रती नाराजीअकोलेकरांना मनपाकडून पाणी पुरवठा, पथदिवे, प्रशस्त रस्ते व स्वच्छता आदी मूलभूत सुविधांची अपेक्षा आहे. भाजपावर विश्वास ठेवून नागरिकांनी मनपाची सत्ता भाजपाच्या ताब्यात दिली असली, तरी पथदिव्यांची उडालेली दाणादाण पाहता सत्ताधाºयांप्रती नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

तक्रारींचे निरसन का नाही?सद्यस्थितीत मुख्य रस्त्यांसह प्रभागातील अंतर्गत रस्त्यांवरही एलईडी पथदिवे लावण्यात आले आहेत. देखभाल दुरुस्तीअभावी यातील अनेक लाइट बंद स्थितीत आढळून येतात. यासंदर्भात मनपाच्या विद्युत विभागाकडे अथवा संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांना मौखिक सूचना दिल्यानंतरही तक्रारींचे निरसन होत नसल्याचे वारंवार समोर येत आहे. प्राप्त तक्रारींचे निरसन का होत नाही, यामागे कंत्राटदार व कनिष्ठ अभियंत्यांचे काही साटेलोटे आहे का, असे विविध प्रश्न निर्माण होत आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका