शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

संत्रा फळ पिकांवर आतापासूनच पाण्याचा ताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 18:13 IST

अकोला : मागील दोन वर्षापासून पाऊस कमी होत असल्याने विदर्भातील संत्रा फळ पिकांवर परिणाम होत आहे. यावर्षी पुन्हा पावसाचा ताण पडल्याने अंबिया बहारावर परिणाम होण्याची शक्यता वाढल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

अकोला : मागील दोन वर्षापासून पाऊस कमी होत असल्याने विदर्भातील संत्रा फळ पिकांवर परिणाम होत आहे. यावर्षी पुन्हा पावसाचा ताण पडल्याने अंबिया बहारावर परिणाम होण्याची शक्यता वाढल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.यावर्षी जानेवरी, फेब्रुवारी महिन्यात अंबिया बहार येईल, त्यावेळी पाण्याची नितांत गरज असते तथापि पाण्याचा ताण जाणवण्याची शक्यता असल्याने जेथे पाणी नाही तेथील शेतकºयांनी अंबिया बहार घेण्याचे टाळावे असा सल्ला कृषी शास्त्रज्ञांनी शेतकºयांना दिला आहे.तदवतच मृग बहाराचे फळ जर झाडाला असतील तर तेही काढावे लागणार असल्याचे कृषी शास्त्रज्ञांचे म्हणने आहे.ज्या शेतकºयांकडे पाण्याची सोय आहे त्यांनी ठिबकव्दारे झाडांना पाणी द्यावे तसेच झाडाच्या बुध्यांजवळ गवत, पालापाचोळ््याचे मल्चिंग केल्यास पाण्याची बचत करता येणार आहे.राज्यात सर्वाधिक १ लाख ५० हेक्टर संत्रा फळ पिकांचे क्षेत्र विदर्भात आहे; परंतु सतत हवमान बदलत असून,पावसाच्या अनिश्चिततेचा प्रतिकूल परिणाम या फळ पिकावर होत आहे. सन २००५ मध्ये पाऊस नव्हता, परिणामी शेतकºयांवर संत्रा झाडे तोडण्याची पाळी होती. त्यामुळे त्यावर्षी जवळपास ४० ते ५० हजार हेक्टरवरील संत्र्याची झाडे शेतकºयांनी तोडली होती.यावर्षी पाऊस नसल्याने आर्द्रता नाही, जमिनीतील पाण्याची पातळी घसरल्याने आवश्यक ओलावा कमी झाल्याने संत्रा उत्पादक शेतकरी धास्तावला आहे.रोजगार हमी योजना व नंतर राष्टÑीय फलोत्पादन अभियानांतर्गत राज्यात फळबाग लागवड योजना राबविण्यात आल्याने फळ क्षेत्र व उत्पादनात महाराष्टÑ देशात प्रथम क्रमांकावर आहे. परंतु सतत या ना त्या रोगाचा सामना करणारा संत्रा उत्पादक शेतकरी यावर्षी पाऊसच नसल्याने अडचणीत सापडला आहे.

गत दोन वर्षापासून पाऊस कमी होत असून, यावर्षीही तेच चित्र असल्याने शेतकºयांनी जे पाणी उपलब्ध नसेल तेथे अंबिया बहार घेऊ नये,मृग बहाराची फळे काढून घ्यावीत,पाणी बचतीसाठी मल्चिंग करावे.डॉ. दिनेश पैठणकर,संशोधक,लिंबू वर्गीय फळे,डॉ. पंदेकृवि, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ