शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

संत्रा फळ पिकांवर आतापासूनच पाण्याचा ताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 18:13 IST

अकोला : मागील दोन वर्षापासून पाऊस कमी होत असल्याने विदर्भातील संत्रा फळ पिकांवर परिणाम होत आहे. यावर्षी पुन्हा पावसाचा ताण पडल्याने अंबिया बहारावर परिणाम होण्याची शक्यता वाढल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

अकोला : मागील दोन वर्षापासून पाऊस कमी होत असल्याने विदर्भातील संत्रा फळ पिकांवर परिणाम होत आहे. यावर्षी पुन्हा पावसाचा ताण पडल्याने अंबिया बहारावर परिणाम होण्याची शक्यता वाढल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.यावर्षी जानेवरी, फेब्रुवारी महिन्यात अंबिया बहार येईल, त्यावेळी पाण्याची नितांत गरज असते तथापि पाण्याचा ताण जाणवण्याची शक्यता असल्याने जेथे पाणी नाही तेथील शेतकºयांनी अंबिया बहार घेण्याचे टाळावे असा सल्ला कृषी शास्त्रज्ञांनी शेतकºयांना दिला आहे.तदवतच मृग बहाराचे फळ जर झाडाला असतील तर तेही काढावे लागणार असल्याचे कृषी शास्त्रज्ञांचे म्हणने आहे.ज्या शेतकºयांकडे पाण्याची सोय आहे त्यांनी ठिबकव्दारे झाडांना पाणी द्यावे तसेच झाडाच्या बुध्यांजवळ गवत, पालापाचोळ््याचे मल्चिंग केल्यास पाण्याची बचत करता येणार आहे.राज्यात सर्वाधिक १ लाख ५० हेक्टर संत्रा फळ पिकांचे क्षेत्र विदर्भात आहे; परंतु सतत हवमान बदलत असून,पावसाच्या अनिश्चिततेचा प्रतिकूल परिणाम या फळ पिकावर होत आहे. सन २००५ मध्ये पाऊस नव्हता, परिणामी शेतकºयांवर संत्रा झाडे तोडण्याची पाळी होती. त्यामुळे त्यावर्षी जवळपास ४० ते ५० हजार हेक्टरवरील संत्र्याची झाडे शेतकºयांनी तोडली होती.यावर्षी पाऊस नसल्याने आर्द्रता नाही, जमिनीतील पाण्याची पातळी घसरल्याने आवश्यक ओलावा कमी झाल्याने संत्रा उत्पादक शेतकरी धास्तावला आहे.रोजगार हमी योजना व नंतर राष्टÑीय फलोत्पादन अभियानांतर्गत राज्यात फळबाग लागवड योजना राबविण्यात आल्याने फळ क्षेत्र व उत्पादनात महाराष्टÑ देशात प्रथम क्रमांकावर आहे. परंतु सतत या ना त्या रोगाचा सामना करणारा संत्रा उत्पादक शेतकरी यावर्षी पाऊसच नसल्याने अडचणीत सापडला आहे.

गत दोन वर्षापासून पाऊस कमी होत असून, यावर्षीही तेच चित्र असल्याने शेतकºयांनी जे पाणी उपलब्ध नसेल तेथे अंबिया बहार घेऊ नये,मृग बहाराची फळे काढून घ्यावीत,पाणी बचतीसाठी मल्चिंग करावे.डॉ. दिनेश पैठणकर,संशोधक,लिंबू वर्गीय फळे,डॉ. पंदेकृवि, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ