शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

कर्जमाफीबाबत शेतकर्‍यांची दिशाभूल बंद करा - शेकाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 02:02 IST

शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभही शेतकर्‍यांचा पदरात पडला नाही. त्यामुळे शेतकर्‍यांची कर्जमाफीवरून दिशाभूल करणे बंद करा, या आणि इतर मागण्यांचे निवेदन भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांना मंगळवारी देण्यात आले.

ठळक मुद्देशेकापचे निवेदन जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हय़ासह संपूर्ण राज्यातील शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटाने पिचले आहेत. चारही बाजूंनी आलेल्या संकटांमुळे शेतकर्‍यांची परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. अशा परिस्थितीत शासनाकडूनही कोणतीही मदत मिळत नसल्याने शेतकरी नागवला गेला आहे. शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभही शेतकर्‍यांचा पदरात पडला नाही. त्यामुळे शेतकर्‍यांची कर्जमाफीवरून दिशाभूल करणे बंद करा, या आणि इतर मागण्यांचे निवेदन भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांना मंगळवारी देण्यात आले.शेतकर्‍यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याबाबत सरकार गंभीर नाही. सरकारचे धोरण प्रत्यक्षात शेतकरीविरोधी आणि व्यापारी व दलाल धाजिर्णे आहे. न्याय्य मागण्यांसाठी शेतकर्‍यांना रस्त्यावर उतरावे लागत आहे, ही सरकारसाठी लाजिरवाणी बाब आहे. सरकारने शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य करून त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनात अकोला जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करावा, कर्जमाफीवरून शेतकर्‍यांची केली जात असलेली दिशाभूल बंद करावी व त्यांचे सरसकट कर्ज माफ करावे, शेती पंप देयकांची थकबाकी वसुली बंद करावी, शेतकर्‍यांचा माल किमान आधारभूत किमतीने खरेदी करण्यासाठी शासकीय खरेदी केंद्रे त्वरित सुरू करावीत, कमी भावाने विकल्या गेलेल्या शेतमालाच्या फरकाची रक्कम शेतकर्‍यांना प्रदान करावी, बोंडअळीने नुकसान झालेल्या कापूस उत्पादक शेतकर्‍यांना दरहेक्टरी ५0 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, आदी मागण्यांचा समावेश आहे. निवेदनावर शेकापचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य भाई प्रदीप देशमुख, अकोला जिल्हा चिटणीस दिनेश काठोके, मध्यवर्ती समिती सदस्य सुनील मोडक, तालुका चिटणीस विजय मोडक, तालुका चिटणीस संजय चिंचोळकर, अँड. संतोष भोरे, जिल्हा संघटक दादासाहेब वाकोडे, मु. मुजामिल पांडे, संतोष देशमुख, प्रशांत लासुरकर, राजेंद्र काळणे आदींच्या स्वाक्षरी आहेत.

टॅग्स :Akola cityअकोला शहर