शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

राज्याला मार्च २0१६ अखेर मिळणार ३२३0 मेगावॅट वीज!

By admin | Updated: January 20, 2015 01:01 IST

वीज उत्पादनात महाराष्ट्र देशात अग्रेसर; ग्रामीण भागातील भारनियमन संपण्याचे संकेत.

राजरत्न सिरसाट/ अकोला : राज्यातील औष्णिक वीज केंद्रांच्या वीजनिर्मिती संचांचे काम अंतिम टप्प्यात आले असून, ते कार्यान्वित झाल्यानंतर येत्या मार्च २0१६ अखेर वीज उत्पादनात ३ हजार २३0 मेगावॅटची भर पडेल. या निर्मितीमुळे राज्य स्वयंपूर्ण तर होईलच, वीज उत्पादनात देशात अग्रेसर राज्य म्हणून ओळखले जाईल. या वीजनिर्मितीमुळे भारनियमनाच्या प्रचंड झळा सोसणार्‍या राज्यातील ग्रामीण भागातील शेतकरी, जनतेला दिलासा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज्यात वर्तमान स्थितीत कोळशावर आधारित (थर्मल पॉवर) औष्णिक केंद्रांतून ७,९८0 मेगावॅट विजेची निर्मिती केली जात असून, पाण्यावर आधारित व इतर स्रोतांतून ३,२५७ मेगावॅट वीज तयार होते. राज्याची विजेची मागणी सध्या १५000 ते १५५00 मेगावॅट असून, महाजनकोचा पुरवठा हा ११,२३७ मेगावॅट एवढा आहे. याव्यतिरिक्त राज्यातील तिरोडा, अमरावती येथील खासगी वीजनिर्मिती केंद्रांकडून वीज विकत घेण्यात येत आहे. उर्वरित वीज राष्ट्रीय पॉवर ग्रीडमधून मिळत असल्याने भारनिमयमनाचा तडाख्यात सापडलेल्या या राज्यातील महानगर, शहरांची काळोखातून सुटका झाली आहे. दरम्यान, राज्यातील चंद्रपूर येथील वीज प्रकल्पाच्या ८ व ९ क्रमांकाच्या दोन संचांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. प्रत्येकी ५00 या प्रमाणे एक हजार मेगावॅट वीज उत्पादनात भर घालणार्‍या या प्रकल्पाचे काम जुलै २0१५ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. तथापि, या कामाला थोडा विलंब झाल्याने आता हा प्रकल्प मार्च २0१६ मध्ये पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल. बीड जिलतील परळी औष्णिक प्रकल्पाचे कामही अंतिम टप्प्यात आहे. १८३३ कोटींच्या या प्रकल्पाला आणखी ९१.६0 कोटी रुपये अतिरिक्त भागभांडवल लागणार होते. याकरिता शासनाची मान्यता मिळविण्यासाठी ऊर्जा मंत्रालयाकडे पाठपुरावा करण्यात आला होता. त्याची पूर्तता झाल्याचे वृत्त असल्याने, ३0 मार्च २0१५ पर्यंंत येथून वीजनिर्मिती सुरू होणार होती. तथापि, विलंब झाल्याने या प्रकल्पाची २५0 मेगावॅट वीजनिर्मिती आता मार्च १६ मध्ये सुरू होणार आहे. नागपूर जिलतील कोराडी औष्णिक वीज प्रकल्पाच्या ८ व ९ क्रमांकाच्या संचाचे काम पूर्ण झाले आहे तसेच संच क्रमांक १0 च्या विविध यंत्रांचे काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाचे काम याच वर्षी पूर्ण होणे अपेक्षित होते. या कामालादेखील विलंब झाल्याने आता २0१६ मध्ये या प्रकल्पातून ६६0 मेगावॅट वीज मिळणार आहे.राज्यातील तीन संचाचे काम पुर्ण झाले असून, मार्च १६ अखेर ३,२३0 मेगावॅट वीज या प्रकल्पातून सुरू होणार आहे. नाशिक,भुसावळ आणि पारस प्रकल्पांचे काम प्रस्तावित आहे. त्यापासून १,५७0 वीज राज्याला मिळणार असल्याचे महाराष्ट्र राज्य वीज महानिर्मिती कंपनी लिमिटेड,(महाजनको) जनसंपर्क अधिकारी महेश आफळे यांनी सांगीतले.