शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
2
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
3
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
4
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
5
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
6
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
7
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
8
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
9
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच
10
'या' अभिनेत्याला डेट करतीये राधिका मदन? रिलेशनशिपवर म्हणाला, "मी खूप चिपकू बॉयफ्रेंड..."
11
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
12
RR vs PBKS : शशांक सिंहचा परफेक्ट फिनिशिंग टच! पंजाब किंग्जनं उभारली विक्रमी धावसंख्या
13
सोलापूर आग दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला आठवर; बेडरूममध्ये सापडले पाच जणांचे मृतदेह 
14
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद
15
'हा' मराठमोळा स्टार टीव्ही इंडस्ट्रीत सर्वांत महागडा! दिलीप जोशी, रुपाली गांगुलीही मागे पडले!
16
जगात 'मेड इन इंडिया'चा बोलबाला; स्मार्टफोन निर्यातीत भारताची मोठी झेप, 24 अब्ज डॉलर्स...
17
"चिंदबरम यांनी जो कायदा आणला, त्याला मी विरोध केला, मात्र..."; शरद पवारांनी सांगितली आठवण
18
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
19
“ज्योतीला फसवले जातेय, सामान्य व्यक्तीप्रमाणे महिन्याला १५-२०-२५ हजार कमावते”; वडिलांचा दावा
20
ही गुंडगिरी संपुष्टात आणण्यासाठी मीच पुढाकार घेणार; मनोज जरांगेंनी घेतली शिवराज दिवटेची भेट

राज्याला मार्च २0१६ अखेर मिळणार ३२३0 मेगावॅट वीज!

By admin | Updated: January 20, 2015 01:01 IST

वीज उत्पादनात महाराष्ट्र देशात अग्रेसर; ग्रामीण भागातील भारनियमन संपण्याचे संकेत.

राजरत्न सिरसाट/ अकोला : राज्यातील औष्णिक वीज केंद्रांच्या वीजनिर्मिती संचांचे काम अंतिम टप्प्यात आले असून, ते कार्यान्वित झाल्यानंतर येत्या मार्च २0१६ अखेर वीज उत्पादनात ३ हजार २३0 मेगावॅटची भर पडेल. या निर्मितीमुळे राज्य स्वयंपूर्ण तर होईलच, वीज उत्पादनात देशात अग्रेसर राज्य म्हणून ओळखले जाईल. या वीजनिर्मितीमुळे भारनियमनाच्या प्रचंड झळा सोसणार्‍या राज्यातील ग्रामीण भागातील शेतकरी, जनतेला दिलासा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज्यात वर्तमान स्थितीत कोळशावर आधारित (थर्मल पॉवर) औष्णिक केंद्रांतून ७,९८0 मेगावॅट विजेची निर्मिती केली जात असून, पाण्यावर आधारित व इतर स्रोतांतून ३,२५७ मेगावॅट वीज तयार होते. राज्याची विजेची मागणी सध्या १५000 ते १५५00 मेगावॅट असून, महाजनकोचा पुरवठा हा ११,२३७ मेगावॅट एवढा आहे. याव्यतिरिक्त राज्यातील तिरोडा, अमरावती येथील खासगी वीजनिर्मिती केंद्रांकडून वीज विकत घेण्यात येत आहे. उर्वरित वीज राष्ट्रीय पॉवर ग्रीडमधून मिळत असल्याने भारनिमयमनाचा तडाख्यात सापडलेल्या या राज्यातील महानगर, शहरांची काळोखातून सुटका झाली आहे. दरम्यान, राज्यातील चंद्रपूर येथील वीज प्रकल्पाच्या ८ व ९ क्रमांकाच्या दोन संचांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. प्रत्येकी ५00 या प्रमाणे एक हजार मेगावॅट वीज उत्पादनात भर घालणार्‍या या प्रकल्पाचे काम जुलै २0१५ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. तथापि, या कामाला थोडा विलंब झाल्याने आता हा प्रकल्प मार्च २0१६ मध्ये पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल. बीड जिलतील परळी औष्णिक प्रकल्पाचे कामही अंतिम टप्प्यात आहे. १८३३ कोटींच्या या प्रकल्पाला आणखी ९१.६0 कोटी रुपये अतिरिक्त भागभांडवल लागणार होते. याकरिता शासनाची मान्यता मिळविण्यासाठी ऊर्जा मंत्रालयाकडे पाठपुरावा करण्यात आला होता. त्याची पूर्तता झाल्याचे वृत्त असल्याने, ३0 मार्च २0१५ पर्यंंत येथून वीजनिर्मिती सुरू होणार होती. तथापि, विलंब झाल्याने या प्रकल्पाची २५0 मेगावॅट वीजनिर्मिती आता मार्च १६ मध्ये सुरू होणार आहे. नागपूर जिलतील कोराडी औष्णिक वीज प्रकल्पाच्या ८ व ९ क्रमांकाच्या संचाचे काम पूर्ण झाले आहे तसेच संच क्रमांक १0 च्या विविध यंत्रांचे काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाचे काम याच वर्षी पूर्ण होणे अपेक्षित होते. या कामालादेखील विलंब झाल्याने आता २0१६ मध्ये या प्रकल्पातून ६६0 मेगावॅट वीज मिळणार आहे.राज्यातील तीन संचाचे काम पुर्ण झाले असून, मार्च १६ अखेर ३,२३0 मेगावॅट वीज या प्रकल्पातून सुरू होणार आहे. नाशिक,भुसावळ आणि पारस प्रकल्पांचे काम प्रस्तावित आहे. त्यापासून १,५७0 वीज राज्याला मिळणार असल्याचे महाराष्ट्र राज्य वीज महानिर्मिती कंपनी लिमिटेड,(महाजनको) जनसंपर्क अधिकारी महेश आफळे यांनी सांगीतले.