शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

राज्य लॉटरीची गुढीपाडवा सोडत प्रचाराविनाच!

By admin | Updated: March 27, 2017 21:41 IST

विक्रेत्यांची नाराजी; राज्यभरात अध्र्याच तिकिटांची झाली विक्री

अकोला, दि. २७- महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने काढण्यात येणार्‍या लॉटरीच्या विविध सोडतींचा प्रचार व प्रसार माध्यमांसह इतर मार्गाने केला जातो. त्याचा लाभ लॉटरीच्या तिकीट विक्रीसाठी होतो. यावर्षी मात्र गुढीपाडवा भव्यतम सोडतीचा प्रचार राज्य सरकारने केला नसल्याने त्याचा परिणाम तिकीट विक्रीवर झाल्याने विक्रेत्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या वतीने दरवर्षी विविध सण-उत्सवाच्या निमित्ताने सोडत काढली जाते. दिवाळी, दसरा, नाताळ, नवीन वर्षासह गुढीपाडवा या सोडतीची तिकीट विक्री दरवर्षी चढत्या क्रमानेच राहिली आहे. या सर्व सोडतीचा प्रचार-प्रसार विविध प्रसारमाध्यमांमधून सतत केला जात असल्याने तिकिटाची विक्री वाढते. यावर्षी मात्र गुढीपाडवा भव्यतम सोडतीसाठी राज्य सरकारच्या वित्त विभागाने या सोडतीचा प्रचारच केला नाही. या सोडतीसाठी तब्बल चार लाख तिकिटे छापण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र सोमवार दुपारपर्यंत अवघ्या दोन लाख तिकिटांचीच विक्री झाली आहे. विशेष म्हणजे पंधरा दिवसांपूर्वीच तिकीट विक्रीचे मुंबई येथील मुख्य एजंट यांनी वित्त सचिवांना प्रचारासंदर्भात स्मरणपत्रही दिले होते; मात्र वित्त विभागाने त्यांची दखल न घेतल्याने तिकिटाची मोठय़ा प्रमाणात विक्री होऊ शकली नाही. याचा तोटा विक्रेत्यांसह राज्य सरकारलाही झाला आहे. या संदर्भात राज्य लॉटरी विक्रीचे एजंट मनीष खेतान यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले की पश्‍चिम वर्‍हाडात गुढीपाडवा सोडत लोकप्रिय आहे. तब्बल एक कोटीच्या वर बक्षीस असल्याने अनेक ग्राहक नववर्षानिमित्त तिकिटांची खरेदी करतात. यावर्षी सदर सोडतीचा प्रचारच झाला नसल्याने तिकीट विक्रीला फटका बसला आहे. त्याचा थेट संबंध वित्त विभागाला होणार्‍या उत्पन्नावर होत असल्याने प्रचारासाठी आलेला फंड खर्च न करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी खेतान यांनी केली आहे. दरम्यान, लॉटरीचे आयुक्त पाटील यांच्याशी यासंदर्भात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.