शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
2
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
3
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
4
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
5
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
6
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
7
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
8
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
9
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
12
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
13
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
14
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
15
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
16
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
17
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
18
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
19
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
20
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!

राज्य लॉटरीची गुढीपाडवा सोडत प्रचाराविनाच!

By admin | Updated: March 27, 2017 21:41 IST

विक्रेत्यांची नाराजी; राज्यभरात अध्र्याच तिकिटांची झाली विक्री

अकोला, दि. २७- महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने काढण्यात येणार्‍या लॉटरीच्या विविध सोडतींचा प्रचार व प्रसार माध्यमांसह इतर मार्गाने केला जातो. त्याचा लाभ लॉटरीच्या तिकीट विक्रीसाठी होतो. यावर्षी मात्र गुढीपाडवा भव्यतम सोडतीचा प्रचार राज्य सरकारने केला नसल्याने त्याचा परिणाम तिकीट विक्रीवर झाल्याने विक्रेत्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या वतीने दरवर्षी विविध सण-उत्सवाच्या निमित्ताने सोडत काढली जाते. दिवाळी, दसरा, नाताळ, नवीन वर्षासह गुढीपाडवा या सोडतीची तिकीट विक्री दरवर्षी चढत्या क्रमानेच राहिली आहे. या सर्व सोडतीचा प्रचार-प्रसार विविध प्रसारमाध्यमांमधून सतत केला जात असल्याने तिकिटाची विक्री वाढते. यावर्षी मात्र गुढीपाडवा भव्यतम सोडतीसाठी राज्य सरकारच्या वित्त विभागाने या सोडतीचा प्रचारच केला नाही. या सोडतीसाठी तब्बल चार लाख तिकिटे छापण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र सोमवार दुपारपर्यंत अवघ्या दोन लाख तिकिटांचीच विक्री झाली आहे. विशेष म्हणजे पंधरा दिवसांपूर्वीच तिकीट विक्रीचे मुंबई येथील मुख्य एजंट यांनी वित्त सचिवांना प्रचारासंदर्भात स्मरणपत्रही दिले होते; मात्र वित्त विभागाने त्यांची दखल न घेतल्याने तिकिटाची मोठय़ा प्रमाणात विक्री होऊ शकली नाही. याचा तोटा विक्रेत्यांसह राज्य सरकारलाही झाला आहे. या संदर्भात राज्य लॉटरी विक्रीचे एजंट मनीष खेतान यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले की पश्‍चिम वर्‍हाडात गुढीपाडवा सोडत लोकप्रिय आहे. तब्बल एक कोटीच्या वर बक्षीस असल्याने अनेक ग्राहक नववर्षानिमित्त तिकिटांची खरेदी करतात. यावर्षी सदर सोडतीचा प्रचारच झाला नसल्याने तिकीट विक्रीला फटका बसला आहे. त्याचा थेट संबंध वित्त विभागाला होणार्‍या उत्पन्नावर होत असल्याने प्रचारासाठी आलेला फंड खर्च न करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी खेतान यांनी केली आहे. दरम्यान, लॉटरीचे आयुक्त पाटील यांच्याशी यासंदर्भात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.