शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील कृषी विद्यापीठाच्या परीक्षा लांबणीवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 14:37 IST

अकोला : राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा टाळेबंदीमुळे एक महिना उशिरा होणार आहेत. ४ मे रोजी चारही ...

अकोला : राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा टाळेबंदीमुळे एक महिना उशिरा होणार आहेत. ४ मे रोजी चारही कृषी विद्यापीठांचे संचालक शिक्षण आणि महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे तांत्रिक शिक्षण संचालक यांच्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होणार आहे. त्यानंतर यासंदर्भात दिशा ठरेल.राज्यात चार कृषी विद्यापीठे असून, १५ हजारांच्या वर विद्यार्थी बीएससीला आहेत. या सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा मार्च-एप्रिलमध्ये होत असते. तथापि, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने २३ मार्च मध्यरात्रीपासून देशात टाळेबंदी घोषित करण्यात आली आहे. टाळेबंदीचा आजचा ३६ वा दिवस आहे. यामुळे बीएससी कृषीच्या सर्व शाखेच्या परीक्षा रखडल्या आहेत. विद्यार्थ्यांचे दुसरे, चौथे, सहावे आणि आठव्या सेमिस्टरचा परीक्षा व्हायच्या आहेत. तीन सेमिस्टर सोडले तर विद्यार्थ्यांसाठी आठवे सेमिस्टर महत्त्वाचे आहे. आठवे सेमिस्टर हे विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची एक्सपिरीयन्स लर्निंग म्हणजेच अनुभव परीक्षा घेतली जाते. चार वर्षाचा अभ्यासक्रम आहे. या चार वर्षात विद्यार्थ्यांनी जे फिल्डवर काम केले त्याचीही अनुभव परीक्षा असते. त्यामुळे आठव्या सेमिस्टरचे प्रत्यक्ष पेपर घेतले जात नाहीत. विद्यार्थ्यांनी फिल्डमध्ये जे चार महिने काम केले त्यावर गुण दिले जातात; परंतु यावर्षी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्वच परीक्षा लांबल्या आहेत. परीक्षा लांबल्याने विद्यार्थ्यांना ई-लर्निंगद्वारे कृषी विद्यापीठाचे प्राध्यापक मार्गदर्शन करीत आहे.--यूजीसी वर अवलंबून!देशातील कृषी विद्यापीठाच्या परीक्षा संदर्भात विद्यापीठ अनुदान आयोग काय सांगते, यावर सर्व अवलंबून आहे. टाळेबंदी आणखी वाढविल्यास परीक्षा घेतल्या जाणार की नाही, हे ठरेल.--आॅनलाइन परीक्षा अशक्य!परीक्षा आॅनलाइन घेण्याचा एक विचारप्रवाह आहे; परंतु इंटरनेट सुविधा खेड्यापाड्यात किती सक्षमतेने काम करेल, हा प्रश्न आहे. त्यामुळे आॅनलाइन परीक्षेला काहींचा विरोध आहे.-परीक्षा एकाच वेळी घ्याव्या लागतील!कोरोनाचा प्रादुर्भाव बघून रेड, आॅरेंज आणि ग्रीन असे तीन झोन पाडले आहेत. म्हणून अशा झोननिहाय या परीक्षा घेता येत नाहीत. एकाच वेळी ही परीक्षा घ्यावी लागते.-शैक्षणिक वर्ष यावर्षी जुलैपासून!३ मे रोजी टाळेबंदी उठवली तरी परीक्षेची तयारी करण्यासाठी १ महिना लागतो, म्हणजे बीएससी च्या परीक्षा जूनमध्ये होणार आहेत. त्यामुळे यावर्षीचे शैक्षणिक वर्ष जुलै महिन्यापासून म्हणजेच एक महिना पुढे जाणार आहे. टाळेबंदी जर उठली नाही तर मात्र आताच सांगता येणार नाही.- टाळेबंदी उठल्यास परीक्षा घेता येणार आहे. तयारीसाठी एक महिना लागेल. मेच्या शेवटी किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा होतील. यूजीसी काय दिशा निर्देश देते, हेदेखील बघावे लागेल. विद्यार्थ्याना आॅनलाइन मार्गदर्शन करण्यात येत आहे.- डॉ. प्रदीप इंगोले,संचालक (शिक्षण),डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

टॅग्स :Dr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठexamपरीक्षाAkolaअकोला