शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

आजपासून रणधुमाळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 01:16 IST

जिल्ह्यातील २७२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ऑनलाइन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया शुक्रवार, १५ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. त्यानुषंगाने गावागावांत निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे.

ठळक मुद्देऑनलाइन भरावे लागणार अर्ज ग्रामपंचायत निवडणुकांसाठी इच्छुकांची मोर्चे बांधणी

अकोला : जिल्ह्यातील २७२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ऑनलाइन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया शुक्रवार, १५ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. त्यानुषंगाने गावागावांत निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे.पाच वर्षांचा कालावधी संपणार्‍या जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील २७२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार या निवडणुकीत थेट जनतेतून निवड करावयाच्या सरपंच पदांसह ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांसाठी ७ ऑक्टोबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांना ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरावा लागणार असून, ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (प्रिंट ) संबंधित निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे सादर करावी लागणार आहे. ऑनलाइन उमेदवारी दाखल करण्याची प्रक्रिया १५ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. १५ ते २२ सप्टेंबर या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ४.३0 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज संबंधित तहसील कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे दाखल करता येतील. ग्रामपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत असल्याच्या पृष्ठभूमीवर गावागावांत सरपंच पदांसाठी आणि ग्रामपंचायत सदस्य पदांसाठी निवडणूक लढविणार्‍या इच्छुक उमेदवारांची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे.

राज्य निवडणूक आयुक्तांनी घेतला आढावा!राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया यांनी गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन सभागृहात अधिकार्‍यांची बैठक घेऊन, जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या कामाचा आढावा घेतला. जिल्ह्यातील २७२ ग्रामपंचायतींच्या  निवडणुकांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या तयारीची माहिती घेत, निवडणुकीची मतदान प्रक्रिया शांतता व निर्भेळ वातावरणात पार पाडण्यासाठी गुंड प्रवृत्तीविरुध्द करावयाच्या कारवाईबाबत राज्य निवडणूक आयुक्तांनी पोलीस विभागाला सूचना दिल्या. तसेच संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वय राखून निवडणूक प्रक्रिया प्रभावीपणे पार पाडण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस.रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्यासह जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी व तहसीलदार उपस्थित होते.

८४२ मतदार केंद्र; ७0 निवडणूक निर्णय अधिकारीजिल्ह्यातील २७२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ८४२ मतदान केंद्र निश्‍चित करण्यात आले असून, ७0 निवडणूक निर्णय अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे,अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.