शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

महाविद्यालयातील ग्रंथापलपदाची भरती सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:19 IST

अकोला : गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयातील पदभरती प्रक्रिया ही वेगवेगळ्या कारणाने रेंगाळली आहे. त्यात ग्रंथपाल पदाचाही ...

अकोला : गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयातील पदभरती प्रक्रिया ही वेगवेगळ्या कारणाने रेंगाळली आहे. त्यात ग्रंथपाल पदाचाही समावेश आहे. त्यामुळे उच्च शिक्षण घेऊन अर्धे आयुष्य संपले तरी राज्यातील पात्रताधारक नोकरी कधी मिळेल या आशेवर जीवन जगत आहेत. महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघाच्या वतीने मुख्यमंत्री, तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांसह इतर मंत्र्यांना ई-मेलद्वारे निवेदन देऊन ग्रंथपालपदाची भरती प्रक्रिया तातडीने सुरू करण्याची मागणी केली जात आहे.

ग्रंथालय हे महाविद्यालयाचा आत्मा समजला जातो. महाविद्यालयात गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा शासनाचा उद्देश पूर्ण करण्यात ग्रंथपाल महत्त्वाची भूमिका बजावत असतो. मात्र, महाविद्यालयातील एवढे महत्त्वाचे पद गेल्या अनेक वर्षांपासून चुकीच्या धोरणामुळे रिक्त राहिले आहे. दिनांक ३ नोव्हेंबर २०१८ रोजी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने भरती प्रक्रिया सुरू करण्यासंदर्भात शासन निर्णय काढून त्यात ग्रंथपाल पदांची १०० टक्के पदभरतीस मान्यता देण्यात आली. मात्र, त्यानंतर आरक्षण, निवडणूक आचारसंहिता व इतर तांत्रिक अडचणीत भरती प्रक्रिया रेंगाळली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर पुन्हा भरती प्रक्रिया सुरू झाली. मात्र, राज्यात कोरोनाचा शिरकाव झाला व परत राज्य सरकारने भरती प्रक्रियेवर निर्बंध आणले. मार्च २०२१ मध्ये या निर्बंधात शिथिलता आणत महाविद्यालयातील प्राचार्यपदाची भरती प्रक्रिया पुन्हा सुरू केली. महाविद्यालयातील प्राचार्य पद हे एकाकी पद असून, दैनंदिन प्रशासकीय, तसेच शैक्षणिक कामकाजाच्या दृष्टीने, तसेच नॅक मूल्यांकन करण्याकरिता नियमित प्राचार्य कार्यरत असणे आवश्यक आहे. हा निष्कर्ष लावत महाविद्यालयात प्राचार्यपदाच्या भरतीस परवानगी देण्यात आली. मात्र, महाविद्यालयातील ग्रंथपाल पद हे प्राचार्यपदाप्रमाणे एकाकी पद असून, तितकेच महत्त्वाचे पद आहे. तरीही शासनाने ग्रंथपाल पदाच्या भरतीवर लावलेले निर्बंध उठवले नाहीत.

महाविद्यालयातील ग्रंथपालांची भरती प्रक्रिया बंद असल्याने आज उच्च शिक्षण घेऊन बसलेले पात्रताधारक हवालदिल झाले आहेत. आम्ही उच्च शिक्षण घेऊन चूक केली आहे का? असा प्रश्न आज ते विचारत आहेत. त्यांना आज वैवाहिक, आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

मुलाखतीची परवानगी द्यावी –

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर शासनाने भरती प्रक्रियेवर निर्बंध लादले. त्यापूर्वी राज्यातील ज्या महाविद्यालयांना शासन नियमानुसार भरतीची परवानगी मिळाली आहे, अशा महाविद्यालयांना तेथील पदाच्या मुलाखतीसाठी तातडीने परवानगी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघाच्या वतीने केली जात आहे.

कोट –

ग्रंथपाल पद हे महाविद्यालयातील प्राचार्यांप्रमाणे अत्यंत महत्त्वाचे पद आहे. हे पद एकाकी असूनही भरतीबाबत सतत दुर्लक्षित राहिले आहे. प्राचार्यपदाच्या भरती प्रक्रियेला मंजुरी मिळते, मग ग्रंथपालांच्या पदासाठी का मिळत नाही. शासनाने प्राचार्यांप्रमाणे ग्रंथपाल पदांची भरती प्रक्रिया सुरू करावी.

- डॉ. रवींद्र भताने, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघ.