शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

केळीवेळी येथे ग्रंथपठणास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:20 IST

------------------------- येवता शिवारात शेती गेली खरडून! अकोला: शहरापासून जवळच असलेल्या येवता शिवारामध्ये बुधवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे शेतजमीन खरडून ...

-------------------------

येवता शिवारात शेती गेली खरडून!

अकोला: शहरापासून जवळच असलेल्या येवता शिवारामध्ये बुधवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे शेतजमीन खरडून गेली. त्यामुळे शेतीची मशागत करणे कठीण झाले आहे. येवता येथील शेतकरी शामराव मते यांच्यासह शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचा सर्व्हे करून भरीव मदत देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

-------------

मालवाहू ट्रकला बस धडकली!

बोरगाव मंजू : राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीत कृषी उत्पन्न बाजार समितीनजीक समोर जात असलेल्या ट्रकला बस पाठीमागून धडकल्याची घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. या अपघातात बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

प्राप्त माहितीनुसार, अकोल्याहून मूर्तिजापूरकडे जाणारा मालवाहू ट्रक क्रमांक (एचआर ६१ सी ५६५६) जात असताना अकोल्याकडून मूर्तिजापूरकडे जाणारी रा.प. बस क्रमांक (एम.एच. ४० एक्यू ६१५९) मालवाहू ट्रकच्या मागे जाऊन धडकली. या अपघातात बसमधील दोन ते तीन प्रवासी किरकोळ जखमी झाले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर कॉन्स्टेबल अरुण गोपनारायण, वाहतूक पोलीस संजय इंगळे यांनी धाव घेऊन खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, वृत्त लिहिस्तोवर पोलीस दप्तरी गुन्ह्याची नोंद नव्हती.

---------------------------

नाले साफ करण्याची मागणी

बाळापूर: तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक गावांत नाल्यांची सफाई करण्यात आली नसल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. नाल्यांची सफाई करावी, अशी मागणी होत आहे.

--------------------

दिग्रस बु. परिसरात उघड्यावर शौचवारी

दिग्रस बु.: पातूर तालुक्यातील दिग्रस बु. परिसरात गेल्या काही दिवसांपासून उघड्यावर शौचवारी होत असल्याने गावात घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

-------------

आलेगाव परिसरात दमदार पाऊस

आलेगाव: पातूर तालुक्यातील आलेगाव परिसरातील पेरणी आटोपली असून, जुलैच्या सुरुवातीला पावसाअभावी पिके संकटात सापडली आहेत. आता परिसरात दमदार पाऊस पडत असल्याने पिके बहरली आहेत.

----------------

गावातील पथदिवे दुरुस्तीची मागणी

अकोला: यंदाचा पावसाळा सुरू होऊन महिना उलटला आहे. आता रात्रीच्या सुमारास विजेची आवश्यकता भासते. त्यामुळे बंद, नादुरुस्त असलेले पथदिवे विनाविलंब दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

-------------

घाणीमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला

बाळापूर: तालुक्यातील टाकळी खुरेशी येथे काही दिवसांपासून कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच नाल्याचे घाण पाणी रस्त्यावर वाहत असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढून ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

----------------

पिकांत डवरणी, खुरपणीला वेग

अकोला: तालुक्यातील बोरगावमंजू परिसरात दमदार पावसामुळे पिकांना आधार मिळाला असून, कपाशीच्या पिकाची वाढ होण्यासह तणावर नियंत्रण मिळविण्यासाठी डवरणीचे फेर आणि खतांची पेरणी शेतकरी करीत आहेत.

-------------------

स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था

अकोट: शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी स्वच्छतागृहांची पडझड झाली आहे. यामुळे नागरिकांची कुचंबणा होत आहे. या स्वच्छतागृहांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

---------------------

रुग्णसंख्या घटल्याने नागरिकांना दिलासा

पातूर: शहरासह तालुक्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढले होते. आता हे प्रमाण अतिशय कमी असल्याचे दिसून येत आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. संकट पूर्णपणे टळलेले नसल्याने नागरिकांनी त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन होत आहे.

---------------

प्रवासी निवाऱ्यांसमोर अतिक्रमण

अकोला: तालुक्यातील काही गावांमध्ये प्रवासी निवाऱ्यांसमोर छोट्या व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याचे दिसून येत आहे. यामुळे प्रवाशांना उघड्यावरच उभे राहून बसची वाट पाहावी लागत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

---------------------

६१ जणांवर उपचार सुरू

अकोला: जिल्ह्यात ५६ हजार ५५६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून, सद्यस्थितीत ६१ जणांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.