शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
2
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
3
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
4
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
5
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
6
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
7
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
8
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
9
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
10
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
11
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
12
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
13
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
14
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
15
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
16
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
17
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
18
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
19
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त

स्थायी समिती सभापती, आयुक्तांमध्ये ‘लेटर वॉर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 01:56 IST

अकोला: स्थायी समितीमध्ये मंजूर ठराव विलंबाने प्राप्त होत  असल्यामुळे ते वेळेच्या आत पाठविण्याच्या मुद्यावरून महा पालिका आयुक्त अजय लहाने व स्थायी समिती सभापती बाळ  टाले यांच्यात बुधवारी ‘लेटर वॉर’ रंगल्याचे समोर आले. मनपा  आयुक्तांच्या पत्राला सभापती बाळ टाले यांनी प्रत्युत्तर देत  खुलासा सादर करण्याची मागणी केली आहे. 

ठळक मुद्देमनपा : ठराव वेळेच्या आत पाठविण्यावरून जुंपली

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: स्थायी समितीमध्ये मंजूर ठराव विलंबाने प्राप्त होत  असल्यामुळे ते वेळेच्या आत पाठविण्याच्या मुद्यावरून महा पालिका आयुक्त अजय लहाने व स्थायी समिती सभापती बाळ  टाले यांच्यात बुधवारी ‘लेटर वॉर’ रंगल्याचे समोर आले. मनपा  आयुक्तांच्या पत्राला सभापती बाळ टाले यांनी प्रत्युत्तर देत  खुलासा सादर करण्याची मागणी केली आहे. महापालिकेची सर्वसाधारण सभा असो वा स्थायी समितीच्या  सभेमध्ये मंजूर केलेले ठराव प्रशासनाकडे सादर करण्यास  विलंब होतो. सभेचे इतवृत्त लिहिताना काही ठरावांमध्ये आ पसूकच अनावश्यक बाबींचा समावेश केला जातो. सभा सं पल्यानंतर दुसर्‍या दिवशी नगर सचिव इतवृत्ताच्या लिखाणाची  प्रक्रिया पूर्ण करतात. त्यानंतर ठराव तयार करून तो  स्वाक्षरीसाठी महापौर किंवा सभापतींकडे सादर करतात. या  प्रक्रियेदरम्यान किंवा वेळेअभावी काही दिवसांचा अवधी  उलटून जातो; परंतु ठराव वेळेच्या आत प्राप्त झाल्यास त्यावर  अंमलबजावणी करणे सोयीचे होते, या उद्देशातून प्रशासनाकडून  ठरावाची मागणी केली जाते. महापालिका आयुक्त अजय लहाने  यांनी स्थायी समितीच्या ठरावांना दीड महिन्यांचा कालावधी होत  असल्याचे नमूद करीत सभापती बाळ टाले यांना ठराव तीन  दिवसांच्या आत सादर करण्यासंदर्भात पत्र पाठविले. एवढय़ा  विलंबाने ठराव प्राप्त होत असतील, तर पुढील कामकाज कर ताना अडचणी निर्माण होतात. त्यामुळे यापुढे सभा झाल्यानंतर  तीन दिवसांच्या आत सभेचा ठराव प्रशासनाकडे पाठवावा,  अन्यथा याची गंभीर दखल घेण्यात येईल, असे त्यांनी पत्रात  नमूद केले. अन्यथा गंभीर दखल घेण्यात येईल, म्हणजे नेमके  काय, असा सवाल उपस्थित करीत सभापती बाळ टाले यांनी उ परोक्त वाक्याचा खुलासा चोवीस तासांच्या आत करण्याचे  निर्देश मनपा आयुक्त लहाने यांना पत्राद्वारे दिले आहेत. सभाप तींच्या पत्रावर आयुक्त काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष  लागले आहे. 

सभेच्या ठरावाचे लिखाण करण्याची जबाबदारी नगर सचिवांची  आहे. स्थायी समितीच नव्हे, तर महासभेच्या ठरावांनासुद्धा काही  कारणास्तव विलंब होतो. ठरावाला जाणीवपूर्वक विलंब केला  जात नाही, याची प्रशासनाला जाणीव आहे. असे असताना  आयुक्तांनी कोणत्या उद्देशातून पत्राद्वारे इशारा दिला, याचा त्यांनी  खुलासा करण्याची गरज आहे. -बाळ टाले, स्थायी समिती सभापती मनपा.