शहरं
Join us  
Trending Stories
1
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
2
Dombivli: डोंबिवलीत भाजप मजबूत, मनसेच्या माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेने टाकले जाळे!
3
Ulhasnagar: पक्षांतर करणाऱ्यांच्या फोटोला आधी फासले काळे; नंतर सन्मानाने स्थान!
4
India- Israel: भारत-इस्रायलचे संबंध आणखी होणार वृद्धिंगत!
5
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ५० जणांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
6
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
7
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
8
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
9
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
10
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
11
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
12
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
13
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
14
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
15
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
16
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
17
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
18
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
19
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
20
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
Daily Top 2Weekly Top 5

स्थायी समिती सभापती, आयुक्तांमध्ये ‘लेटर वॉर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 01:56 IST

अकोला: स्थायी समितीमध्ये मंजूर ठराव विलंबाने प्राप्त होत  असल्यामुळे ते वेळेच्या आत पाठविण्याच्या मुद्यावरून महा पालिका आयुक्त अजय लहाने व स्थायी समिती सभापती बाळ  टाले यांच्यात बुधवारी ‘लेटर वॉर’ रंगल्याचे समोर आले. मनपा  आयुक्तांच्या पत्राला सभापती बाळ टाले यांनी प्रत्युत्तर देत  खुलासा सादर करण्याची मागणी केली आहे. 

ठळक मुद्देमनपा : ठराव वेळेच्या आत पाठविण्यावरून जुंपली

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: स्थायी समितीमध्ये मंजूर ठराव विलंबाने प्राप्त होत  असल्यामुळे ते वेळेच्या आत पाठविण्याच्या मुद्यावरून महा पालिका आयुक्त अजय लहाने व स्थायी समिती सभापती बाळ  टाले यांच्यात बुधवारी ‘लेटर वॉर’ रंगल्याचे समोर आले. मनपा  आयुक्तांच्या पत्राला सभापती बाळ टाले यांनी प्रत्युत्तर देत  खुलासा सादर करण्याची मागणी केली आहे. महापालिकेची सर्वसाधारण सभा असो वा स्थायी समितीच्या  सभेमध्ये मंजूर केलेले ठराव प्रशासनाकडे सादर करण्यास  विलंब होतो. सभेचे इतवृत्त लिहिताना काही ठरावांमध्ये आ पसूकच अनावश्यक बाबींचा समावेश केला जातो. सभा सं पल्यानंतर दुसर्‍या दिवशी नगर सचिव इतवृत्ताच्या लिखाणाची  प्रक्रिया पूर्ण करतात. त्यानंतर ठराव तयार करून तो  स्वाक्षरीसाठी महापौर किंवा सभापतींकडे सादर करतात. या  प्रक्रियेदरम्यान किंवा वेळेअभावी काही दिवसांचा अवधी  उलटून जातो; परंतु ठराव वेळेच्या आत प्राप्त झाल्यास त्यावर  अंमलबजावणी करणे सोयीचे होते, या उद्देशातून प्रशासनाकडून  ठरावाची मागणी केली जाते. महापालिका आयुक्त अजय लहाने  यांनी स्थायी समितीच्या ठरावांना दीड महिन्यांचा कालावधी होत  असल्याचे नमूद करीत सभापती बाळ टाले यांना ठराव तीन  दिवसांच्या आत सादर करण्यासंदर्भात पत्र पाठविले. एवढय़ा  विलंबाने ठराव प्राप्त होत असतील, तर पुढील कामकाज कर ताना अडचणी निर्माण होतात. त्यामुळे यापुढे सभा झाल्यानंतर  तीन दिवसांच्या आत सभेचा ठराव प्रशासनाकडे पाठवावा,  अन्यथा याची गंभीर दखल घेण्यात येईल, असे त्यांनी पत्रात  नमूद केले. अन्यथा गंभीर दखल घेण्यात येईल, म्हणजे नेमके  काय, असा सवाल उपस्थित करीत सभापती बाळ टाले यांनी उ परोक्त वाक्याचा खुलासा चोवीस तासांच्या आत करण्याचे  निर्देश मनपा आयुक्त लहाने यांना पत्राद्वारे दिले आहेत. सभाप तींच्या पत्रावर आयुक्त काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष  लागले आहे. 

सभेच्या ठरावाचे लिखाण करण्याची जबाबदारी नगर सचिवांची  आहे. स्थायी समितीच नव्हे, तर महासभेच्या ठरावांनासुद्धा काही  कारणास्तव विलंब होतो. ठरावाला जाणीवपूर्वक विलंब केला  जात नाही, याची प्रशासनाला जाणीव आहे. असे असताना  आयुक्तांनी कोणत्या उद्देशातून पत्राद्वारे इशारा दिला, याचा त्यांनी  खुलासा करण्याची गरज आहे. -बाळ टाले, स्थायी समिती सभापती मनपा.