शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
4
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
5
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
6
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
7
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
8
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
9
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
10
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
11
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
12
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
13
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
14
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
15
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
16
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
17
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
18
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
19
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
20
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ

एसटी पुन्हा खासगीकरणाकडे

By admin | Updated: November 29, 2014 23:01 IST

ट्रॅव्हल्स कंपन्यांना मागीतल्या सूचना : टप्पा वाहतुकीला मिळणार परवानगी.

बुलडाणा : खासगी ट्रॅव्हल्स कंपन्याच्या वाहनांना टप्पा वाहतूक करण्याची परवानगी केंद्र शासनाकडून लवकरच मिळणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यासाठी केंद्र शासनाने राज्यातील सर्व वाहतूकदारांना सूचनाही मागविल्या आहेत. असे झाल्यास गावखेड्यापासून डोंगर-दर्‍यातून धावणारी एसटी रस्त्यावरून गायब होणार आहे. त्याचा राज्य परिवहन महामंडळाबरोबरच सामान्य जनतेला मोठा फटका बसणार आहे. सध्या सर्वत्र खासगीकरणाचे वारे वाहात असताना आता खासगीकरणाचा बळी एसटी महामंडळ ठरणार आहे. असे झाल्यास एसटीचे हजारो कामगार व कर्मचारी देशाधडीला लागणार आहेत. इलेक्ट्रॉनिक, इंटरनेटच्या आजच्या युगात सर्वांनीच बदल स्वीकारला आहे; मात्र प्रवासी वाहतुकीच्या क्षेत्रात एसटीचे नव्या बदलाकडे पाठ फिरवून तेच परंपरागत धोरण कायम ठेवले आहे. प्रवाशांना काय हवे, काय नको, याची जाणीव न ठेवता वर्षानुवर्षे त्याच गतीने आणि भूमिकेने एसटी वाटचाल करीत आहे. त्याचा परिणाम म्हणजे एसटी महामंडळाची प्रवासी संख्या दिवसेंदिवस झपाट्याने कमी होत आहे. दुसरीकडे प्रवाशांना अधिकाधिक सुविधा पुरविणार्‍या खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या नव-नवे प्रयोग करीत आहेत, त्यामुळे प्रवासी खासगी वाहतुकीकडे वळत आहेत. सिझनचा काळ वगळता एसटीचे प्रवासभाडे नेहमीच खासगी ट्रॅव्हल्सच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे प्रवासी खासगी ट्रॅव्हल्सच्या प्रवासाला प्राधान्य देत आहेत. त्यातच एसटीची स्पिड लॉक पद्धती, कर्मचार्‍यांना लागणार्‍या सुविधा, अवाजवी राजकीय हस्तक्षेप आणि अंतर्गत राजकारण यातच एसटी महामंडळ धन्यता मानत असल्याने बदल स्वीकारण्यामध्ये एसटी कमी पडत आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी, हे ब्रीद घेऊन एसटी महामंडळाने प्रवासी वाहतूक सुरू केली; परंतु बदलत्या काळानुसार एसटीला आपल्या धोरणात बदल करणे शक्य झाले नाही. या कारणामुळे एसटीचे प्रवासी खासगी वाहतुकीकडे वळत असून, आजच्या स्पर्धेच्या युगातही एसटी महामंडळाची कासवगतीने वाटचाल सुरू आहे.