शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

‘आयुष्यमान’ योजना तळागाळापर्यंत पोहोचवा - पालकमंत्र्यांचे आवाहन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 12:26 IST

अकोला : आयुष्यमान भारत -प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमुळे गोरगरिबांच्या जीवनमानात बदल होणार आहे. त्यामुळे ही योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी रविवारी केले.

अकोला : समाजातील वंचित, गोरगरीब नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, त्यांना उत्तम प्रकारचे उपचार मिळावे, यासाठी सुरू करण्यात आलेल्या आयुष्यमान भारत -प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमुळे गोरगरिबांच्या जीवनमानात बदल होणार आहे. त्यामुळे ही योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी रविवारी केले.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात आयोजित आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लोकार्पण समारंभात ते बोलत होते. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तथा खासदार संजय धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, महापौर विजय अग्रवाल, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, मनपा आयुक्त जितेंद्र वाघ, नागपूर येथील सहायक आयुक्त कुलदीप त्रिवेदी, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, माजी आमदार डॉ. जगन्नाथ ढोणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आरती कुलवाल, जिल्हा परिषद उप मुख्य कार्यकारी अधिकारी विलास खिल्लारे, डॉ. अश्विनी खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी झारखंड राज्यातील रांची येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे देशपातळीवरील झालेल्या उद्घाटन कार्यक्रमाचे प्रक्षेपण यावेळी सभागृहात दाखविण्यात आले. आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत गंभीर आजारांसह १ हजार ३०० रोगांवर उपचार करण्यात येणार असून, पूर्णपणे मोफत असणारी ही योजना आरोग्य सेवेतील महत्त्वाचा टप्पा आहे. राज्यात महात्मा फुले जन आरोग्य योजना सोबतच ही योजना राबविण्यात येणार असल्याचे सांगत, ही ऐतिहासिक योजना जिल्ह्यात सर्वांनी मिळून यशस्वी करण्याचे आवाहनही पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी यावेळी केले. कार्यक्रमात निवडक लाभार्थींना प्रातिनिधिक स्वरूपात या योजनेच्या ई-कार्डचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.आरती कुलवाल यांनी केले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी, आशा, अंगणवाडीसेविका, आरोग्य मित्र, परिचर्या प्रशिक्षण केंद्रांच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या. 

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Ranjit patilडॉ. रणजित पाटीलSanjay Dhotreसंजय धोत्रे