शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

‘आयुष्यमान’ योजना तळागाळापर्यंत पोहोचवा - पालकमंत्र्यांचे आवाहन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 12:26 IST

अकोला : आयुष्यमान भारत -प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमुळे गोरगरिबांच्या जीवनमानात बदल होणार आहे. त्यामुळे ही योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी रविवारी केले.

अकोला : समाजातील वंचित, गोरगरीब नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, त्यांना उत्तम प्रकारचे उपचार मिळावे, यासाठी सुरू करण्यात आलेल्या आयुष्यमान भारत -प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमुळे गोरगरिबांच्या जीवनमानात बदल होणार आहे. त्यामुळे ही योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी रविवारी केले.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात आयोजित आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लोकार्पण समारंभात ते बोलत होते. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तथा खासदार संजय धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, महापौर विजय अग्रवाल, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, मनपा आयुक्त जितेंद्र वाघ, नागपूर येथील सहायक आयुक्त कुलदीप त्रिवेदी, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, माजी आमदार डॉ. जगन्नाथ ढोणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आरती कुलवाल, जिल्हा परिषद उप मुख्य कार्यकारी अधिकारी विलास खिल्लारे, डॉ. अश्विनी खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी झारखंड राज्यातील रांची येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे देशपातळीवरील झालेल्या उद्घाटन कार्यक्रमाचे प्रक्षेपण यावेळी सभागृहात दाखविण्यात आले. आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत गंभीर आजारांसह १ हजार ३०० रोगांवर उपचार करण्यात येणार असून, पूर्णपणे मोफत असणारी ही योजना आरोग्य सेवेतील महत्त्वाचा टप्पा आहे. राज्यात महात्मा फुले जन आरोग्य योजना सोबतच ही योजना राबविण्यात येणार असल्याचे सांगत, ही ऐतिहासिक योजना जिल्ह्यात सर्वांनी मिळून यशस्वी करण्याचे आवाहनही पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी यावेळी केले. कार्यक्रमात निवडक लाभार्थींना प्रातिनिधिक स्वरूपात या योजनेच्या ई-कार्डचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.आरती कुलवाल यांनी केले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी, आशा, अंगणवाडीसेविका, आरोग्य मित्र, परिचर्या प्रशिक्षण केंद्रांच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या. 

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Ranjit patilडॉ. रणजित पाटीलSanjay Dhotreसंजय धोत्रे