शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

‘आयुष्यमान’ योजना तळागाळापर्यंत पोहोचवा - पालकमंत्र्यांचे आवाहन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 12:26 IST

अकोला : आयुष्यमान भारत -प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमुळे गोरगरिबांच्या जीवनमानात बदल होणार आहे. त्यामुळे ही योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी रविवारी केले.

अकोला : समाजातील वंचित, गोरगरीब नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, त्यांना उत्तम प्रकारचे उपचार मिळावे, यासाठी सुरू करण्यात आलेल्या आयुष्यमान भारत -प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमुळे गोरगरिबांच्या जीवनमानात बदल होणार आहे. त्यामुळे ही योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी रविवारी केले.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात आयोजित आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लोकार्पण समारंभात ते बोलत होते. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तथा खासदार संजय धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, महापौर विजय अग्रवाल, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, मनपा आयुक्त जितेंद्र वाघ, नागपूर येथील सहायक आयुक्त कुलदीप त्रिवेदी, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, माजी आमदार डॉ. जगन्नाथ ढोणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आरती कुलवाल, जिल्हा परिषद उप मुख्य कार्यकारी अधिकारी विलास खिल्लारे, डॉ. अश्विनी खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी झारखंड राज्यातील रांची येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे देशपातळीवरील झालेल्या उद्घाटन कार्यक्रमाचे प्रक्षेपण यावेळी सभागृहात दाखविण्यात आले. आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत गंभीर आजारांसह १ हजार ३०० रोगांवर उपचार करण्यात येणार असून, पूर्णपणे मोफत असणारी ही योजना आरोग्य सेवेतील महत्त्वाचा टप्पा आहे. राज्यात महात्मा फुले जन आरोग्य योजना सोबतच ही योजना राबविण्यात येणार असल्याचे सांगत, ही ऐतिहासिक योजना जिल्ह्यात सर्वांनी मिळून यशस्वी करण्याचे आवाहनही पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी यावेळी केले. कार्यक्रमात निवडक लाभार्थींना प्रातिनिधिक स्वरूपात या योजनेच्या ई-कार्डचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.आरती कुलवाल यांनी केले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी, आशा, अंगणवाडीसेविका, आरोग्य मित्र, परिचर्या प्रशिक्षण केंद्रांच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या. 

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Ranjit patilडॉ. रणजित पाटीलSanjay Dhotreसंजय धोत्रे