शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

खासगी बसमध्ये विशेष खबरदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:20 IST

भरधाव वाहनांमुळे अपघाताची भीती अकोला: शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असल्याने अनेक वाहने अशोक वाटिका ते शासकीय बगिचा ...

भरधाव वाहनांमुळे अपघाताची भीती

अकोला: शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असल्याने अनेक वाहने अशोक वाटिका ते शासकीय बगिचा या मार्गावरून भरधाव जातात. या मार्गावर परिसरातील नागरिक रात्रीचा फेरफटका मारतात. त्यामुळे या मार्गावर नेहमीच वर्दळ असते. अशा परिस्थितीत भरधाव येणाऱ्या वाहनांमुळे या मार्गावर नेहमीच अपघाताची भीती असते. वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.

बसस्थानकात कचरा

अकोला: लॉकडाऊननंतर एसटी बसेस आता पूर्ण क्षमतेने धावत असल्याने बसस्थानकावर प्रवाशांचीही गर्दी वाढली आहे मात्र प्रवाशांकडून बसस्थानक परिसरात कचरा केला जात असल्याचेही चित्र दिसून येत आहे. शिवाय, जवळपासचे व्यावसायिकदेखील बसस्थानक परिसरात कचरा करीत असल्याने सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे.

खाऊगल्लीत फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन नाही

अकोला: अनलॉकमध्ये काही दिवसांपूर्वीच हॉटेल्स व्यवसाय सुरू करण्यास परवानगी मिळाली होती. त्यानुसार, शहरातील हॉटेल्स सुरू झाल्या असून, खाऊगल्लीतही खाद्यपदार्थांचे स्टॉल पूर्ववत सुरू झालेत. या ठिकाणी खवय्यांचीही गर्दी वाढत आहे; मात्र प्रशासनाने घालून दिलेल्या नियम व अटींचे पालन होताना दिसून येत नाही. त्यामुळे हा प्रकार कोरोनाच्या फैलावाला कारणीभूत ठरत आहे.

नेटवर्क नसल्याने नागरिक त्रस्त

अकोला: गत दोन दिवसांपासून शहरात मोबाइल नेटवर्कची समस्या उद्भवत आहे. त्यामुळे अनेकांना इंटरनेटसह कॉलिंगच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. इंटरनेट व फोन कॉलमध्ये व्यत्यय आल्याने नागरिक त्रस्त होत आहेत. शहरातील काही भागात मात्र मोबाइल सेवा सुर‌ळीत असल्याचे निदर्शनास आले आहे.