शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

वायदे बंदीनंतरही सोयाबीन जोरात; ६४०० मिळाला भाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2021 19:47 IST

Soybeans strong even after futures ban : गुरुवारी सोयाबीनला ६२००-६४०० रुपये सर्वसामान्य दर मिळाला असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

अकोला : केंद्रीय अर्थ मंत्रालयाने वायदे बाजारात सोयाबीनच्या व्यवहारावर बंदी घातली आहे. त्यामुळे सोयाबीनचे दर कोसळणार असल्याच्या अफवा उठल्या होत्या. परंतु, दोन दिवसानंतरही बाजार समितीत सोयाबीनचे दर कायम आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी सोयाबीनला ६२००-६४०० रुपये सर्वसामान्य दर मिळाला असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.वायदे बाजारातील ज्या त्रुटी होत्या, त्या दूर करण्याची गरज होती. परंतु, हे न करता केंद्रीय अर्थ मंत्रालयाने थेट बाजारातील संधीच नाकारली आहे. दोन दिवसांआधी सोयाबीन, सोयातेल, क्रूड पामतेल, मूग, हरभरा व सरकीच्या वायदे बाजारावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांना बाजार समितीत माल विकणे हा पर्याय शिल्लक होता. या निर्णयाने शेतकरी पुरता कोंडीत पकडला गेल्याने यावर शेती तज्ज्ञ व व्यापाऱ्यांकडून रोष व्यक्त करण्यात आला. मात्र, या निर्णयाला दोन दिवस झाल्यानंतरही बाजार समितीत सोयाबीनचे दर जोरात आहेत. बाजार समितीत गुरुवारीही सोयाबीनला चांगला दर मिळाला.

२०० रुपयांची दरवाढ

कृषी उत्पादनांच्या वायदा बाजारातील व्यवहारास बंदी घालणारा निर्णय जाहीर केल्यानंतर गुरुवारी बाजार समितीत सोयाबीनचे दर २०० रुपयांनी वाढले. बुधवारी ६१००-६२०० विकल्या गेलेले सोयाबीन गुरुवारी ६४०० पर्यंत पोहोचले होते.

 

सीड सोयाबीनला ६८०० रुपये दर

बाजार समितीत सीड सोयाबीनच्या दरांवर परिणाम दिसून येत नाही. प्रक्रिया उद्योगांकडून मागणी असल्याने गुरुवारी सीड सोयाबीनला ६८०० रुपये प्रती क्विंटल दर मिळाला.

शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये!

- सोयाबीनला बाजार समितीत चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी घाबरून न जाता रोजच्या रोज भाव बघून गरजेपुरता माल विकावा.

-

टॅग्स :AkolaअकोलाAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती