शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

पातूर तालुक्यात सोयाबीनचा पेरा वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:14 IST

पातूर : पातूर तालुक्यात सार्वत्र पाऊस नसल्याने केवळ आठ टक्केच क्षेत्रावर पेरणी झाली असून, उर्वरित क्षेत्रावर पुरेशा पावसाअभावी पेरण्या ...

पातूर : पातूर तालुक्यात सार्वत्र पाऊस नसल्याने केवळ आठ टक्केच क्षेत्रावर पेरणी झाली असून, उर्वरित क्षेत्रावर पुरेशा पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत. यावर्षी सोयाबीनचा पेरा अधिक वाढणार असून कपाशीसह इतर पिकांचे क्षेत्र घटणार असल्याचे चित्र आहे.

तालुक्यात ४२ हजार ५७० हेक्टर क्षेत्र वहितीखाली आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार २५ हजार ५०० हेक्टरवर सोयाबीनची लागवड होण्याचा अंदाज आहे. ८ हजार ४४५ हेक्टरवर कपाशीची लागवड होणार आहे. ७ हजार ५०० हेक्टरवर तुरीची लागवड तर १४ हजार ५०० हेक्टरवर मूग, उडीद हेक्टरवर पेरणीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे.

पातूर तालुक्यातील आलेगाव आणि पातूर मंडळ वगळता चान्नी, सस्ती आणि बाभूळगाव या मंडळातील क्षेत्रामध्ये अत्यल्प पाऊस झाला आहे. त्यामुळे या भागातील पेरण्या खोळंबल्या आहेत. पावसाअभावी पेरणी झालेल्या शेतकऱ्यांची आणि पेरणी करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांचे आभाळाकडे लक्ष लागले आहे. तालुक्यातील ८० टक्के शेतकऱ्यांनी बी बियाणांची खरेदी केली आहे. मात्र, प्रमाणित बियाण्यांचा तुटवडा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सत्यता दर्शक बियाणे स्वतःच्या जोखमीवर कृषी सेवा केंद्रावरून खरेदी करावी लागतात. मात्र, कृषी सेवा केंद्र चालक महाबीज बियाण्यांचा काळाबाजार करीत असल्याची तक्रार तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे शेतकरी करीत आहेत.

फोटो:

तालुक्यात सोयाबीन, कपाशी बियाण्यांचा कृत्रिम तुटवडा

तालुक्यात सोयाबीन, कपाशी, तूर बियाण्यांची कृत्रिम तुटवडा निर्माण करून जादा दराने विक्री केली जात असल्याच्या तक्रारी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे येत आहेत. महाबीज बियाणे दुप्पट दराने विकले जात असल्याची माहिती आहे. बियाण्यांचा तुटवडा आणि कृत्रिम टंचाईमुळे अनेक शेतकऱ्यांनी घरचेच बियाणे प्रक्रिया करून वापरण्याचा निर्णय घेतला आहे.

शेतकऱ्यांनी बीबीएफ पेरणी यंत्रणेचा वापर, प्रक्रिया करूनच घरगुती बियाण्यांचा वापर करावा. तालुक्यात अद्यापही १०० मिलिमीटर पाऊस पडला नाही, त्यामुळे पुरेसा पाऊस झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी. दुबार पेरणीचे संकट सर्वांनी टाळावे.

-डी. एस. शेटे, तालुका कृषी अधिकारी, पातूर

आठ टक्के सोयाबीन, कपाशीची पेरणी

पातूर तालुक्यात ३४५० हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली. तसेच ९४५ हेक्टरवर कपाशी, ३०० हेक्टरवर तूर २५ हेक्टरवर मूग आणि १८ हेक्टरवर उडदाची पेरणी करण्यात आली. तालुक्यात एकूण आठ टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली आहे.