शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

पेरले सोयाबीन; विमा कापसाचा!

By admin | Updated: September 26, 2016 03:21 IST

बँकांनी घोळ घातल्याचा शेतक-यांचा आरोप.

अकोला, दि. २५- जिल्हय़ातील शेतकर्‍यांनी खरीप पिकांना संरक्षण मिळावे, यासाठी पीक विमा काढला. खरिपातील महत्त्वाचे पीक असलेल्या सोयाबीनचा अनेक शेतकर्‍यांनी विमा काढला; परंतु काही बँकांनी परस्पर सोयाबीनऐवजी कापसाचा विमा उतरविला. यामुळे अनेक शेतकर्‍यांवर सोयाबीनच्या विम्यापासून वंचित राहण्याची वेळ येऊ शकते.खरीप हंगामातील पिकांना संरक्षण देण्यासाठी यावर्षी केंद्र सरकारच्या पंतप्रधान कृषी विमा योजनेत जिल्हय़ातील १ लाख ८४ हजार शेतकरी सहभागी झाले आहेत. यामुळे १ लाख ६९ हजार ६0४ हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांना विम्याचे संरक्षण मिळाले असून, विम्याच्या हप्त्यापोटी (प्रीमियम) शेतकर्‍यांनी १८ कोटी ७५ लाख ३५ हजार रुपयांचा भरणा केला आहे. गत दोन वर्षांच्या कालावधीत पावसाळ्यात पाऊस कमी झाल्याने, निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत जिल्हय़ातील शेतकरी हवालदिल झाला. निसर्गाच्या लहरीपणामुळे दरवर्षी उत्पादनात घट येत असल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे. पीक हातचे गेल्याने होणार्‍या संभाव्य नुकसानाची जोखीम करण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान कृषी विमा योजना सुरू केली आहे. योजनेत सहभागी शेतकर्‍यांना पिकाचे नुकसान झाल्यास विम्याची रक्कम मिळते. यामुळे जिल्हय़ातील अनेक शेतकरी कृषी विमा काढण्यास प्राधान्य देत आहेत. शेतकर्‍यांचा प्रतिसाद लाभत असल्यामुळे यावर्षी या योजनेला दोन ते तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे जिल्हय़ातील १ लाख ८४ हजार शेतकर्‍यांनी पीक विमा काढला आहे. दरम्यान, जिल्हय़ातील कर्जदार शेतकर्‍यांकडून पेरेपत्रक न भरता संबंधित बँकांनी सोयाबीन पिकाऐवजी परस्पर कापसाचा पीक विमा काढल्याचा आरोप शेतकर्‍यांकडून केला जात आहे. चुकीच्या पिकांची नोंद केल्यामुळे नुकसान भरपाई मिळणार का, असा प्रश्न या शेतकर्‍यांकडून उपस्थित केला जात आहे.कर्जदार शेतकर्‍यांनी सोयाबीन पेरले; पण त्यांच्याकडून पेरेपत्रक न भरता बँकांनी परस्पर कापसाचा विमा काढला आहे. त्यामुळे नुकसान भरपाई मिळणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देत आहोत. -संतोष राऊत, शेतकरी, निपाणा, (बोरगाव मंजू) अकोला.