शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
3
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
4
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
5
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
6
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
7
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!
8
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
9
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
10
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
11
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
12
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
13
३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या
14
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
15
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
16
Gold Rate Today 15 May: एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
17
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
18
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
19
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
20
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं

पेरले सोयाबीन; विमा कापसाचा!

By admin | Updated: September 26, 2016 03:21 IST

बँकांनी घोळ घातल्याचा शेतक-यांचा आरोप.

अकोला, दि. २५- जिल्हय़ातील शेतकर्‍यांनी खरीप पिकांना संरक्षण मिळावे, यासाठी पीक विमा काढला. खरिपातील महत्त्वाचे पीक असलेल्या सोयाबीनचा अनेक शेतकर्‍यांनी विमा काढला; परंतु काही बँकांनी परस्पर सोयाबीनऐवजी कापसाचा विमा उतरविला. यामुळे अनेक शेतकर्‍यांवर सोयाबीनच्या विम्यापासून वंचित राहण्याची वेळ येऊ शकते.खरीप हंगामातील पिकांना संरक्षण देण्यासाठी यावर्षी केंद्र सरकारच्या पंतप्रधान कृषी विमा योजनेत जिल्हय़ातील १ लाख ८४ हजार शेतकरी सहभागी झाले आहेत. यामुळे १ लाख ६९ हजार ६0४ हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांना विम्याचे संरक्षण मिळाले असून, विम्याच्या हप्त्यापोटी (प्रीमियम) शेतकर्‍यांनी १८ कोटी ७५ लाख ३५ हजार रुपयांचा भरणा केला आहे. गत दोन वर्षांच्या कालावधीत पावसाळ्यात पाऊस कमी झाल्याने, निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत जिल्हय़ातील शेतकरी हवालदिल झाला. निसर्गाच्या लहरीपणामुळे दरवर्षी उत्पादनात घट येत असल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे. पीक हातचे गेल्याने होणार्‍या संभाव्य नुकसानाची जोखीम करण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान कृषी विमा योजना सुरू केली आहे. योजनेत सहभागी शेतकर्‍यांना पिकाचे नुकसान झाल्यास विम्याची रक्कम मिळते. यामुळे जिल्हय़ातील अनेक शेतकरी कृषी विमा काढण्यास प्राधान्य देत आहेत. शेतकर्‍यांचा प्रतिसाद लाभत असल्यामुळे यावर्षी या योजनेला दोन ते तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे जिल्हय़ातील १ लाख ८४ हजार शेतकर्‍यांनी पीक विमा काढला आहे. दरम्यान, जिल्हय़ातील कर्जदार शेतकर्‍यांकडून पेरेपत्रक न भरता संबंधित बँकांनी सोयाबीन पिकाऐवजी परस्पर कापसाचा पीक विमा काढल्याचा आरोप शेतकर्‍यांकडून केला जात आहे. चुकीच्या पिकांची नोंद केल्यामुळे नुकसान भरपाई मिळणार का, असा प्रश्न या शेतकर्‍यांकडून उपस्थित केला जात आहे.कर्जदार शेतकर्‍यांनी सोयाबीन पेरले; पण त्यांच्याकडून पेरेपत्रक न भरता बँकांनी परस्पर कापसाचा विमा काढला आहे. त्यामुळे नुकसान भरपाई मिळणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देत आहोत. -संतोष राऊत, शेतकरी, निपाणा, (बोरगाव मंजू) अकोला.