शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

पेरले सोयाबीन; विमा कापसाचा!

By admin | Updated: September 26, 2016 03:21 IST

बँकांनी घोळ घातल्याचा शेतक-यांचा आरोप.

अकोला, दि. २५- जिल्हय़ातील शेतकर्‍यांनी खरीप पिकांना संरक्षण मिळावे, यासाठी पीक विमा काढला. खरिपातील महत्त्वाचे पीक असलेल्या सोयाबीनचा अनेक शेतकर्‍यांनी विमा काढला; परंतु काही बँकांनी परस्पर सोयाबीनऐवजी कापसाचा विमा उतरविला. यामुळे अनेक शेतकर्‍यांवर सोयाबीनच्या विम्यापासून वंचित राहण्याची वेळ येऊ शकते.खरीप हंगामातील पिकांना संरक्षण देण्यासाठी यावर्षी केंद्र सरकारच्या पंतप्रधान कृषी विमा योजनेत जिल्हय़ातील १ लाख ८४ हजार शेतकरी सहभागी झाले आहेत. यामुळे १ लाख ६९ हजार ६0४ हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांना विम्याचे संरक्षण मिळाले असून, विम्याच्या हप्त्यापोटी (प्रीमियम) शेतकर्‍यांनी १८ कोटी ७५ लाख ३५ हजार रुपयांचा भरणा केला आहे. गत दोन वर्षांच्या कालावधीत पावसाळ्यात पाऊस कमी झाल्याने, निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत जिल्हय़ातील शेतकरी हवालदिल झाला. निसर्गाच्या लहरीपणामुळे दरवर्षी उत्पादनात घट येत असल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे. पीक हातचे गेल्याने होणार्‍या संभाव्य नुकसानाची जोखीम करण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान कृषी विमा योजना सुरू केली आहे. योजनेत सहभागी शेतकर्‍यांना पिकाचे नुकसान झाल्यास विम्याची रक्कम मिळते. यामुळे जिल्हय़ातील अनेक शेतकरी कृषी विमा काढण्यास प्राधान्य देत आहेत. शेतकर्‍यांचा प्रतिसाद लाभत असल्यामुळे यावर्षी या योजनेला दोन ते तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे जिल्हय़ातील १ लाख ८४ हजार शेतकर्‍यांनी पीक विमा काढला आहे. दरम्यान, जिल्हय़ातील कर्जदार शेतकर्‍यांकडून पेरेपत्रक न भरता संबंधित बँकांनी सोयाबीन पिकाऐवजी परस्पर कापसाचा पीक विमा काढल्याचा आरोप शेतकर्‍यांकडून केला जात आहे. चुकीच्या पिकांची नोंद केल्यामुळे नुकसान भरपाई मिळणार का, असा प्रश्न या शेतकर्‍यांकडून उपस्थित केला जात आहे.कर्जदार शेतकर्‍यांनी सोयाबीन पेरले; पण त्यांच्याकडून पेरेपत्रक न भरता बँकांनी परस्पर कापसाचा विमा काढला आहे. त्यामुळे नुकसान भरपाई मिळणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देत आहोत. -संतोष राऊत, शेतकरी, निपाणा, (बोरगाव मंजू) अकोला.