शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
3
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
6
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
7
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
8
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
9
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
10
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
11
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
12
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
13
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
14
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
15
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
16
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
17
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
18
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
19
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
20
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     

...आता करावी लागणार अर्ध रब्बी पिकांंची पेरणी!

By admin | Updated: July 11, 2017 02:15 IST

कृषी विद्यापीठाचे नियोजन तयार

राजरत्न सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : यावर्षी खरीप हंगामातील महत्त्वाच्या पिकांच्या पेरणीची वेळ संपली आहे. दीड महिन्यांपासून सार्वत्रिक पाऊस नसल्याने आता अर्ध रब्बी पिकांची पेरणी करावी लागणार आहे. विदर्भासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने यासाठीचे नवे पीक नियोजन तयार केले आहे. आणखी हीच परिस्थिती आठ दिवस राहिल्यास विदर्भातील शेतकऱ्यांना तूर व सूर्यफूल पिकांचा अर्ध रब्बी पेरणीसाठी पर्याय निवडावा लागणार आहे. विदर्भातील कोरडवाहू पिकाखाली ९० टक्के क्षेत्र असून, पिकांची उत्पादन क्षमता ही वेळेवर व नियमित पावसावरच अवलंबूून आहे. अलीकडच्या तीन-चार वर्षांच्या काळात पावसाच्या अनियमिततेच्या समस्या वारंवार उद्भवत असून, शेतकऱ्यांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. यावर्षी एक महिन्यापासून विदर्भात सार्वत्रिक पाऊस झाला नसल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. ज्यांनी पेरणी केली त्यांच्यावर दुबार, तिबार पेरणीची वेळ आली आहे. तापमानात प्रचंड वाढ झाल्याने अंकुरलेल्या पिकांवर प्रतिकूल परिणाम झाले आहेत. यावर्षी जुलै महिन्याचा दुसरा आठवडा संपत आला, तरी पावसाचा थांगपत्ता नसल्याने शेतकऱ्यांना नव्याने पीक पेरणीत बदल करावे लागणार आहेत. त्या अनुुषंगाने या कृषी विद्यापीठाने आपत्कालीन पीक नियोजन तयार केले आहे. पावसाचे भाकीत, वेगवेगळे अंदाज पुन्हा वर्तविण्यात येत असले, तरी या अंदाजावर कितपत निर्भर राहायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्याच अनुषंगाने कृषी विद्यापीठाने आता आपत्कालीन सोबतच अर्ध रब्बी पिकांचे नियोजन केले आहे.नियमित पावसाळा चार आठवड्यांपेक्षा जास्त १६ ते २२ जुलैपर्यंत उशिरा सुरू होत असेल, तर पेरणी करताना २० ते २५ टक्के बियाण्यांचा अधिक वापर करावा लागेल. संकरित वाणाखालील क्षेत्र कमी करू न सुधारित वाणांचा अधिक प्रमाणात वापर करावा लागणार आहे.मूग, उडीद या पिकांची पेरणी अजिबात करू नये, २३ ते २९ जुलैपर्यंत पाऊस न आल्यास शेतकऱ्यांनी कपाशीची पेरणी शक्यतो करू नये, केल्यास २५ ते ३० टक्के अधिक बियाणे पेरणीसाठी वापरावे, सोयाबीनची पेरणी २५ जुलैपर्यंतच करावी, असा सल्ला कृषी विद्यापीठाने दिला आहे. ज्वारी पिकाबाबत याच पद्धतीने नियोजन करावे लागेल. पूर्व विदर्भात ७५ ते १०० मि.मी. पाऊस पडल्यास, धान पिकाची पेरणी सलग दोन दिवस करावी, धान पिकाच्या लवकर येणाऱ्या व मध्यम कालावधीच्या वाणांची पेरणी १५ जुलैपर्यंत रोपवाटिकेत करावी. पावसाळ््याच्या सुरुवातीचे दोन महिने हे अंत्यत महत्वाचे असून, या महिन्यात पडणाऱ्या पावसावरच शेतीचे भवितव्य अवलंबूून असते. यावर्षी थोडा पावसाळा लांबल्याने आपत्कालीन पीक नियोजन तयार केले आहे. या परिस्थितीत पीक पेरणीच्या तारखात बदल, पावसाच्या पडणाऱ्या कालावधीनुसार पिकांची निवड, मशागत करावी लागते. या दोन-तीन दिवसांत पावसाची अपेक्षा आहे. पाऊस आणखी लांबल्यास अर्ध रब्बी पिकांचा पर्याय निवडावा लागेल.- डॉ. दिलीप एम. मानकर, संचालक संशोधन,डॉ. पंदेकृवि, अकोला.