शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

...आता करावी लागणार अर्ध रब्बी पिकांंची पेरणी!

By admin | Updated: July 11, 2017 02:15 IST

कृषी विद्यापीठाचे नियोजन तयार

राजरत्न सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : यावर्षी खरीप हंगामातील महत्त्वाच्या पिकांच्या पेरणीची वेळ संपली आहे. दीड महिन्यांपासून सार्वत्रिक पाऊस नसल्याने आता अर्ध रब्बी पिकांची पेरणी करावी लागणार आहे. विदर्भासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने यासाठीचे नवे पीक नियोजन तयार केले आहे. आणखी हीच परिस्थिती आठ दिवस राहिल्यास विदर्भातील शेतकऱ्यांना तूर व सूर्यफूल पिकांचा अर्ध रब्बी पेरणीसाठी पर्याय निवडावा लागणार आहे. विदर्भातील कोरडवाहू पिकाखाली ९० टक्के क्षेत्र असून, पिकांची उत्पादन क्षमता ही वेळेवर व नियमित पावसावरच अवलंबूून आहे. अलीकडच्या तीन-चार वर्षांच्या काळात पावसाच्या अनियमिततेच्या समस्या वारंवार उद्भवत असून, शेतकऱ्यांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. यावर्षी एक महिन्यापासून विदर्भात सार्वत्रिक पाऊस झाला नसल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. ज्यांनी पेरणी केली त्यांच्यावर दुबार, तिबार पेरणीची वेळ आली आहे. तापमानात प्रचंड वाढ झाल्याने अंकुरलेल्या पिकांवर प्रतिकूल परिणाम झाले आहेत. यावर्षी जुलै महिन्याचा दुसरा आठवडा संपत आला, तरी पावसाचा थांगपत्ता नसल्याने शेतकऱ्यांना नव्याने पीक पेरणीत बदल करावे लागणार आहेत. त्या अनुुषंगाने या कृषी विद्यापीठाने आपत्कालीन पीक नियोजन तयार केले आहे. पावसाचे भाकीत, वेगवेगळे अंदाज पुन्हा वर्तविण्यात येत असले, तरी या अंदाजावर कितपत निर्भर राहायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्याच अनुषंगाने कृषी विद्यापीठाने आता आपत्कालीन सोबतच अर्ध रब्बी पिकांचे नियोजन केले आहे.नियमित पावसाळा चार आठवड्यांपेक्षा जास्त १६ ते २२ जुलैपर्यंत उशिरा सुरू होत असेल, तर पेरणी करताना २० ते २५ टक्के बियाण्यांचा अधिक वापर करावा लागेल. संकरित वाणाखालील क्षेत्र कमी करू न सुधारित वाणांचा अधिक प्रमाणात वापर करावा लागणार आहे.मूग, उडीद या पिकांची पेरणी अजिबात करू नये, २३ ते २९ जुलैपर्यंत पाऊस न आल्यास शेतकऱ्यांनी कपाशीची पेरणी शक्यतो करू नये, केल्यास २५ ते ३० टक्के अधिक बियाणे पेरणीसाठी वापरावे, सोयाबीनची पेरणी २५ जुलैपर्यंतच करावी, असा सल्ला कृषी विद्यापीठाने दिला आहे. ज्वारी पिकाबाबत याच पद्धतीने नियोजन करावे लागेल. पूर्व विदर्भात ७५ ते १०० मि.मी. पाऊस पडल्यास, धान पिकाची पेरणी सलग दोन दिवस करावी, धान पिकाच्या लवकर येणाऱ्या व मध्यम कालावधीच्या वाणांची पेरणी १५ जुलैपर्यंत रोपवाटिकेत करावी. पावसाळ््याच्या सुरुवातीचे दोन महिने हे अंत्यत महत्वाचे असून, या महिन्यात पडणाऱ्या पावसावरच शेतीचे भवितव्य अवलंबूून असते. यावर्षी थोडा पावसाळा लांबल्याने आपत्कालीन पीक नियोजन तयार केले आहे. या परिस्थितीत पीक पेरणीच्या तारखात बदल, पावसाच्या पडणाऱ्या कालावधीनुसार पिकांची निवड, मशागत करावी लागते. या दोन-तीन दिवसांत पावसाची अपेक्षा आहे. पाऊस आणखी लांबल्यास अर्ध रब्बी पिकांचा पर्याय निवडावा लागेल.- डॉ. दिलीप एम. मानकर, संचालक संशोधन,डॉ. पंदेकृवि, अकोला.