शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
5
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
6
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
7
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
8
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
9
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
10
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
11
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
12
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
13
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
14
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
15
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
16
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
17
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
18
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
19
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
20
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर

...आता करावी लागणार अर्ध रब्बी पिकांंची पेरणी!

By admin | Updated: July 11, 2017 02:15 IST

कृषी विद्यापीठाचे नियोजन तयार

राजरत्न सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : यावर्षी खरीप हंगामातील महत्त्वाच्या पिकांच्या पेरणीची वेळ संपली आहे. दीड महिन्यांपासून सार्वत्रिक पाऊस नसल्याने आता अर्ध रब्बी पिकांची पेरणी करावी लागणार आहे. विदर्भासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने यासाठीचे नवे पीक नियोजन तयार केले आहे. आणखी हीच परिस्थिती आठ दिवस राहिल्यास विदर्भातील शेतकऱ्यांना तूर व सूर्यफूल पिकांचा अर्ध रब्बी पेरणीसाठी पर्याय निवडावा लागणार आहे. विदर्भातील कोरडवाहू पिकाखाली ९० टक्के क्षेत्र असून, पिकांची उत्पादन क्षमता ही वेळेवर व नियमित पावसावरच अवलंबूून आहे. अलीकडच्या तीन-चार वर्षांच्या काळात पावसाच्या अनियमिततेच्या समस्या वारंवार उद्भवत असून, शेतकऱ्यांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. यावर्षी एक महिन्यापासून विदर्भात सार्वत्रिक पाऊस झाला नसल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. ज्यांनी पेरणी केली त्यांच्यावर दुबार, तिबार पेरणीची वेळ आली आहे. तापमानात प्रचंड वाढ झाल्याने अंकुरलेल्या पिकांवर प्रतिकूल परिणाम झाले आहेत. यावर्षी जुलै महिन्याचा दुसरा आठवडा संपत आला, तरी पावसाचा थांगपत्ता नसल्याने शेतकऱ्यांना नव्याने पीक पेरणीत बदल करावे लागणार आहेत. त्या अनुुषंगाने या कृषी विद्यापीठाने आपत्कालीन पीक नियोजन तयार केले आहे. पावसाचे भाकीत, वेगवेगळे अंदाज पुन्हा वर्तविण्यात येत असले, तरी या अंदाजावर कितपत निर्भर राहायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्याच अनुषंगाने कृषी विद्यापीठाने आता आपत्कालीन सोबतच अर्ध रब्बी पिकांचे नियोजन केले आहे.नियमित पावसाळा चार आठवड्यांपेक्षा जास्त १६ ते २२ जुलैपर्यंत उशिरा सुरू होत असेल, तर पेरणी करताना २० ते २५ टक्के बियाण्यांचा अधिक वापर करावा लागेल. संकरित वाणाखालील क्षेत्र कमी करू न सुधारित वाणांचा अधिक प्रमाणात वापर करावा लागणार आहे.मूग, उडीद या पिकांची पेरणी अजिबात करू नये, २३ ते २९ जुलैपर्यंत पाऊस न आल्यास शेतकऱ्यांनी कपाशीची पेरणी शक्यतो करू नये, केल्यास २५ ते ३० टक्के अधिक बियाणे पेरणीसाठी वापरावे, सोयाबीनची पेरणी २५ जुलैपर्यंतच करावी, असा सल्ला कृषी विद्यापीठाने दिला आहे. ज्वारी पिकाबाबत याच पद्धतीने नियोजन करावे लागेल. पूर्व विदर्भात ७५ ते १०० मि.मी. पाऊस पडल्यास, धान पिकाची पेरणी सलग दोन दिवस करावी, धान पिकाच्या लवकर येणाऱ्या व मध्यम कालावधीच्या वाणांची पेरणी १५ जुलैपर्यंत रोपवाटिकेत करावी. पावसाळ््याच्या सुरुवातीचे दोन महिने हे अंत्यत महत्वाचे असून, या महिन्यात पडणाऱ्या पावसावरच शेतीचे भवितव्य अवलंबूून असते. यावर्षी थोडा पावसाळा लांबल्याने आपत्कालीन पीक नियोजन तयार केले आहे. या परिस्थितीत पीक पेरणीच्या तारखात बदल, पावसाच्या पडणाऱ्या कालावधीनुसार पिकांची निवड, मशागत करावी लागते. या दोन-तीन दिवसांत पावसाची अपेक्षा आहे. पाऊस आणखी लांबल्यास अर्ध रब्बी पिकांचा पर्याय निवडावा लागेल.- डॉ. दिलीप एम. मानकर, संचालक संशोधन,डॉ. पंदेकृवि, अकोला.